महाभारत रामायण...!
महाभारत रामायण...!
महाभारता नंतर रामायण
येईल काय...?
चोहो बाजूंनी मोर्चे निघता
महाभारताचा भास होतो
वस्त्र हरण कितीही झालं
तरी निसर्गच मोठी साथ देतो
कोणत्याही प्रश्नाला
उत्तर होकार अर्थीच मिळतं
100% मार्कांनी टेकूच
सरकार आपलं पास होतं
ज्याचं जळत त्याला कळतं
तरीही कालच्या पेक्षा आज बर वाटत
सरकार तरी निदान जागेवर आहे
याचं भान प्रत्येकाच्या मनात घर करतं
उद्याच्या दिवसावर आजच मरण
रोज एक एक दिवस पुढे जातं
आंधळं दळत कुत्रं पीठ खातं
अस होत नाही याची खात्री तरी सरकार देतं
वाटत काल चक्र वेगात फिरत आहे
महाभारत संपता संपता आता
पुन्हा रामायण येत आहे
त्याचीच नांदी कदाचित नित्य होत आहे....!