कागद आणि शाई
कागद आणि शाई
1 min
181
कागद आणि शाई च नातंच निराळं असतं..
शाई लेखणीत टाकताच लेखणीला महत्त्व येत..
व लेखणीने कागदावर अक्षर गिरवायला लागलो की
कागदाचही उद्दिष्ट सार्थक होत..
शाई शिवाय लेखणी निरर्थक..
बिना अक्षरांच्या कागदही निरर्थक..
आपलं जीवनही असच असत..
छोट्या छोट्या गोष्टींना महत्त्व असतं..
फरक फक्त इतकाच असतो ..
की काही गोष्टी आपण गृहीत धरतो..
तर काही नाही...
जसं शाई शिवाय लेखणीला महत्त्व नाही ..
तसचं परिवार व माणुसकी शिवाय आपल्या जिवणालाही अर्थ नाही ...
परिवाराने माणूस घडतो तर माणुसकीने नाती व माणसं दुरावत नाही...
