जीवन
जीवन
1 min
542
दुःखाच्या क्षणांना आठवतेस का तू।
सुखाच्या गोळा-बेरजा करत जा तू।।
मृगजळाच्या मागे अशी धावतो का आहेस
जरा आळोशाला निवांत, बसत जा तू।।
पिवळे पान जरी गळून पडले असले।
तरी आठवणींच्या वहीत त्याला जपत जा तू।।
झाले गेले विघटित,विसरत जा तु
येणाऱ्या क्षाणांचा उत्साह करत जा तू।।
आरश्यात प्रतिबिंब शोधते का असे।
मनात आठवणींची, कास धरत जा तू।।
हे शल्य जगण्याचे बोचरे जरी असले।
कट्यांना फुला परी,उरी जपत जा तू।।
हिरावुन घेतले जरी सर्व काही तुझे।
पुण्य:चे घडे तरी डोळे झाक भरत जा तू।।