धुळीतले शब्दभाव
धुळीतले शब्दभाव
कश्याला छापायची पुस्तके
धुळीत पडतात सारे...
भावनांना येथे नसे मोलच
ह्रदयास न मिळे निवारे...
किंमत कुठे उरली त्यांना
ते शब्द रडतात बिचारे...
सत्य समजावुन जगातले
तेही होतात हो पसारे..
वचनांचे नुसतेस उरलेत
कामा पुरतेच साचा रे...
मन फिरे भिरभिरा सर्वे
बनुन मोकाट ते वारे...
वादळ शांत होईना कुढते
कुचकामी झाले विचारे...
अंत होईना समस्यांचा तो
समिक्षा न जमे कोणा रे...
बुडवलेत हित स्वत:चेच
स्वहाताने तू मानवा रे...
हुडकीतोस मानपान का
भुलतोस मृगजळा रे...?
साहित्या गुदमरून चाले,
बनले पिसाट वाचा रे...!
मरणं ना, म्हणून भाव जगे,
"तू ते समजुन घे जरा रे...!!"