भविष्यातला भारत ...
भविष्यातला भारत ...
आपल्या भारत देशाने खूप वर्ष पहिली ...
आता उत्सुकता आहे ती पुढील वर्षाची ...
काय असेल भविष्यात ....
इंग्लिशचा बोलबाला कमी होऊन आपली राष्ट्रीय भाषा उंचावेल का ?
राष्टीय खेळासाठी गर्दी आणि तो जोश दिसेल का ?
रस्त्यावरून चालताना स्रिया युवतीना सुरक्षित वाटेल का ?
जिम मध्ये जाऊन ताकद मिळवणारे आणि त्याचा रुबाब करणारे
सैनिक म्हूणन देशासाठी उभे राहतील का?
सिग्नल न मोडता नियमाने हेल्मेट सीट बेल्ट घालणाऱ्याची संख्या वाढेल का ?
लाच न घेता" चला तुमचे काम झाले "असे सांगणारे प्रामाणिक मिळतील का ?
खून ,चोरी फसवणूकिची संख्या कमी होईल का ?
मोबाईल ला बाजूला ठेऊन संवाद वाढेल का ?
निवडून आले ले रक्षक आपला स्वार्थ बाजूला देऊन फक्त लोकांचे चांगले रक्षण करतील का?
महागाईचा राक्षसाच वजन कमी होईल का ?
व्यसनाच्या आहारी न जाता युवापिढी सरळ मार्गाने आपले जीवन जगेल का ?
स्त्रीभ्रूण हत्या सारखे प्रकार संपुष्टतात येतील का ?
हुंडया च बळ नाहीस होईल का ?
दुष्काळ या वर काही तोडगा निघेल का ?
बेरोजगारी कधी गार होऊन थंड पडेल का ?
वृथाश्रमात न जाता किती जण घराच्या आश्रमात राहतील का ?
प्रश्न खूप येतात डोक्यात पण उत्तर मात्र निरुत्तर आहे
पाहूया भविष्यात किती का ? चे प्रश्न सुटणार आहेत ......
