ऐतिहासिक
ऐतिहासिक
समृद्ध ऐतिहासिक वारसा
भारताला लाभलाय विलोभनीय
स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाने
सुवर्णाक्षरांनी कोरलाय अतुलनीय १
गेटवे ऑफ इंडिया,इंडिया गेट
प्राचीन इतिहासाची साक्ष देतात
ऐतिहासिक गडकिल्ले,शनिवार वाडा
शिवाजी राजे,पेशव्यांची आठवण करतात २
अजिंठा,वेरूळ,बेलूर,हळेबीड, हंपी
सारे शिलालेख,लेण्यांनी कोरलेले
कुतुबमीनार,ताजमहल,लाल किल्ला
सारे प्रेक्षणीय स्थळांनी भारलेले ३
अंदमान निकोबार,मंडालेचे तुरुंग
सावरकर,टिळकांच्या काळ्या पाण्याचे
फुले,आंबेडकर,गांधीजी,नेहरू
स्वातंत्र्य संग्रामातील नेते धाडसाचे ४
संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी
तीर्थक्षेत्रे,अष्टविनायकांच्या दर्शनाची
नृत्य,नाट्य,संगीत,चित्रकला, विद्याभ्यास
अशा चौसष्ट कलांची पुण्याई भारताची ५
महान,थोर,दिग्गज साहित्यिकांनी
ऋचा,पंथ,ग्रंथांचा वारसा जपलेला
केरळ,काश्मीर,कन्याकुमारी, दक्षिण भारत
निसर्गसौंदर्य,सुंदर कळसाच्या देवळांनी भारलेला ७
वंदेमातरम,राष्ट्रगीत,प्रतिज्ञा, संविधान
सारेच महान आहेत भारताचे खंदक
रामायण,महाभारताने घालून दिलेला
चांगल्या--वाईट गोष्टींचा खराखुरा दंडक ८
इंग्रजांचा अघोरी जुलूम सोसून
क्रांतिकारकांनी इतिहास घडवला
स्वातंत्र्याची सुंदर पहाट दाखवून
भारत देश यशोशिखरावर ठेवला ९