52आठवडे लिखाण आव्हान स्पर्धेसा
52आठवडे लिखाण आव्हान स्पर्धेसा
आयुष्य म्हणजे आणखी
वेगळं असं काय असतं,
समोर येणा-या संकटांचा
निर्भिड सामना करायचं असतं.
दु:खानंतर आनंद मिळतो
याच आशेवर जगायचं असतं,
प्रेमळ नाती माणुसकीने जपत
आपलं जीवन गुजरायचं असतं.
मनाच्या होणा-या फरफटीवर
संयमाचं पांघरुन घालायचं असतं,
दुस-याच्या सुखात आनंद मानून
दु:खातही सुखाला शोधायचं असतं.
सर्वच मनासारखं नसतं होत, हे
जाणून पुढं चालायचं असतं,
हाव करत कशाच्याहीमागे
वा-यासारखं धावायचं नसतं.
आपल्या अनावर भावनांना
बंधनाचं लगाम घालायचं असतं,
मनास असह्य वेदना देणा-या
जखमांना विसरायचं असतं.
दु:खाशिवाय जीवन म्हणजे
केवळ एक शुन्यच राहतं,
म्हणूनच दु:खांनाच आपण
आपलसं करायचं असतं.
आठवणींच्या साठवणीत
सुख दु:खांना स्मरायचं असतं,
आयुष्य म्हणजे सांगा! आणखी
वेगळ असं काय असतं ?