वैभव मराठी भाषेचे
वैभव मराठी भाषेचे
आम्ही महाराष्ट्रातले लोक, आमची मातृभाषा मराठी, आमचा महाराष्ट्र गुजरात,मध्य प्रदेश, छत्तीसगढ, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोवा, इत्यादी प्रांतांना लागून असल्याने आमची मराठी भाषा त्या त्या प्रांतांच्या भाषेत मिसळून आमची मराठी आणखीनच सुरेख भाषा तयार होते. जसे खान्देशाला लागून मध्य प्रदेश, गुजरात, असल्याने आमची मराठी भाषा अहिराणी भाषा म्हणून ओळखली जाते. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे काव्यसुद्धा याच अहिराणी भाषेत रचले आहेत. या खान्देश कन्येचे नाव उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावला देण्यात आलेले आहे.