Meenakshi Kilawat

Others

5.0  

Meenakshi Kilawat

Others

स्वप्नातली बाग

स्वप्नातली बाग

4 mins
723


   आपल्या घरीच हिरवळीला आणायची राहायला.जर घरीच हिरवळीला आपल्या घरात राहायला जागा मिळाली तर हिरवळीला किती आनंद होईल आणि ती आपणास किती तरी देवून जाईल. तशी आपणा सर्वानाच हिरवा बाग आवडतो.पण आपण तो स्वप्नातच बघतो परंतू आपण त्या स्वप्नातली बाग कृतीत उतरवली तर आपल्या घरातच सुंदर बाग तयार होईल. त्यात अशक्य काहीच नाही. त्यासाठी आवड महत्वाची आहे.आपणास पहायला मिळत असेल, मोठ्या शहरांमध्ये टेरेसवर बाग तयार करतात.हिरवळ ही मातीवर कुठेही उगविते. ती  एकटी रानावनात जगते तिला कोणाचा आश्रय नसतो तरी ती प्रफुल्लित होवून हसत राहाते. जरा आपण विचार करावा की जर ती आपल्या घरी आली राहायला तर तिला किती आनंद होईल आणि किती हर्षाने जोमाने ती बहरेल, फुलेल, फळेल आणि अापला पूर्ण खजीना ती आनंदाने रिता करेल.तिच्या अंगातले समुळ गुणधर्म ती मानव कल्याणाकरीता खर्च करीत आहे आणि करीतच जाणार आहे.

  आपणही काही प्रमाणात प्रेम,माया देवून तिला आपल्या घरात मानाचे स्थान देवूया.पोषकतत्वाने भरपुर व्यंजन भाजीरूपात ती अापल्याला परत देईल.ही गोष्ट शंभर टक्के खरी आहे.आपल्या शरीराला तनामनाला तिच्या पासून मिळेल सुख,समाधान,आरोग्य.चला तर मग या शुद्ध औषधीतत्वाने भरलेल्या फळभाज्या कश्या पद्धतीने तयार करू शकतो व त्याचे भरपूर उपयोग घेवू शकतो. थोडक्यात बघूया! 

आपण जर हिरवळीला घरीच नेहमीसाठी ठेवायचा विचार असेल तर आपल्याला थोडी थोडीशी मेहनत करावी लागेल निरनिराळ्या प्रकारच्या फळभाज्या फुललेली, फळाने लगडलेली बाग आपल्या नजरे समोर तयार करूया.ती आपणास उत्साह देऊन जाईल.

आपण थोड्या जागेत आपल्या घरीच फळे भाज्या आणि सुंदर रंगीबेरंगी फुलांच बाग तयार करूया.आपले मन आल्हादक सुंगधाने नाचू गावू लागेल.आपला बागीचा तयार होण्यासाठी आपणास पूर्व तयारी करावी लागेल.सर्व प्रकारचे बी-बियाणे आपणास बाजारातून आणावे लागेल काही घरी किचनमध्येच उपलब्ध असतात. तसेच माती आणून त्यास उन्हाळ्यातच थोडी वाळवून ठेवावी आणि शेणखत जैविक खत कृषी केंद्रातून विकत आणावे लागेल. आपल्या घरी पुरेशी जागा नसेल तर आपण आपल्या बाल्कनीत किंवा गच्चीवर काही वृक्ष लावू शकतोय. त्यासाठी आपल्याला मोठे डबे, तेलाची कॅन, तुटलेले ड्रम्स, कुलरची टंकी, बकेट्स, बॉटल्स ज्या वस्तू आपण भंगारात फेकत असतोय त्या वस्तू जमा करून त्याचा आपण भरपूर उपयोग घेऊ शकतोय.

 आधी आपण कोणती वृक्ष लावावयाची आहे.हे ठरवून विचारपुर्वक बी-बियाण्याची निवड करायची.जागा जर लहान असेल तर त्यानुसार वृक्षांची निवड करायची आणि आपण थोड्या जागेत कोणती वृक्षवल्ली होईल किंवा फळभाजी होईल त्याची आधी आखणी करून घ्यायची. "पेराल तेच उगवेल"

कोणती भाजी लावायची ते आधी ठरवून घेवूया.

पालक,मेथी,सांबार, गवार,भेंडी, तुरई, दोडकी, कोहळे, दुधी, कारली, वालशेंग, वांगी, टोमॅटो, हिरवी मिरची, या सर्व भाज्या आपण छोट्याही जागेत लावू शकतोय. फक्त आपणास थोडी मेहनत करावी लागेल.

     आपल्या संसारात पुरेल इतका भाजीपाला जरी आपण काढला तर आपल्या संसाराला हातभार लावू शकतो. आरोग्याच्या दृष्टिने ही स्वास्थ्य चांगले राहील .छोटी झाडे छोट्या कुंडीत लावायची.मोठी फळझाडे मोठ्या वस्तुत लावायची.

जशी भेंडी,गवार, मेथी,पालक,हिरवी मिरची, कोथंबीर, या छोट्या वस्तुत किंवा पसरट भांड्यात लावायची. वालाची वेल,काकडीवेल, दुधी भोपळावेल,कारलीवेल. कोहळ्याचीवेल, पडवळवेल या वेलीना मोठीच वस्तू किवा जमिनित लावायचे. सोबत कढीपता ,पदिना अवश्य लावावी .मुळे गाजर, वांगी ,टोमेटो या सारख्या भाज्या आपण उंचीप्रमाणे वस्तू मधे लावू शकतो. या सर्वसाधारण सूर्य प्रकाश व तापमान लक्षपुर्वक हाताळावी.या वृक्षवल्लीची किमया ओळखून जातीने लक्ष दिल्यास आपल्या मेहनतीचे फळ जरूर मिळेल चांगला परिणाम म्हणजे आपला रिकामा वेळ कामी लागेल.जर अापणास शेती मातीचे ज्ञान नसेल तर ना फुले मिळेल ना फळे मिळेल .त्यासाठी घरच्या मोठ्यांचे किंवा शेजारचे वयस्क व्यक्तीची मदत आपण घेवू शकतो.आणि या हिरवळीचा भरपूर प्रमाणात फायदा घेवू शकतोय.

    बीया लावण्या आधी आपल्याला आदल्या दिवशी पाण्यात टाकून ठेवले असता त्या बिया मातीत लवकर रूजून वर येतात.काही बीया आधिच छोट्या छोट्या पॉट किंवा जमिनीमध्ये वेगळ्या मातीत लावावे.ते अंकुरलेले रोप मोठे होतात दोन-अडीच इंच झाल्यावरती ते आपण दुसऱ्या ठिकानी लावू शकतो. जे वृक्ष मोठे होतात त्यासाठी मोठा पिंप किंवा ड्रम घ्यायचा त्याच्यात आधी विटांचे तुकडे किंवा कौलांचे तुकडे खाली टाकून पाणी निघून जायला व्यवस्था केली पाहिजे. त्यानंतर रेती,माती,शेणखत टाकून तीन भाग भरले पाहिजे. त्यानंतर व्यवस्थित मोठी झालेली रोप त्याठिकीनी लावावित. पाण्याचा हलक्या हाताने शिडकावा करावा. ती रोप लवकरच मोठी होतात. जसजसे मोठे होतात आपल्याला खुप आनंद होतो.त्यामुळे आपले रक्तभिसरण छान होवून आरोग्य छान रहातय. घरच्या घरी व्यायाम होऊन आपण तरतरीत होतो. हिरवळ ही जीवनात खुप आवश्यक गोष्ट आहे तिच्याशिवाय आपण जगू शकत नाही किंवा विचार देखील करू शकत नाही आपण वृक्षवल्लीला जर मायेने गोंजारले तर ती देखिल आपल्याला माया प्रेम आणि वासल्य देते ती आपल्याशी बोलते सुद्धा पण तिची भाषा समजायला आपले मन मायाळु पाहिजे. प्रेम द्यावे प्रेम घ्यावे हां सृष्टिचा नियम आहे.

  लाल,गुलाबी, केशरी, अबोली, जाई, जुई, चमेली, चाफा आकाशी रंगाच्या फुलांचे वेगवेगळे रंग सौदंर्य पाहूण मन मुग्ध होते. तसेच अनेक फळे पेरू,निंबू,अंजिर यासारखी फळे चाखायला मिळतात .मन प्रसन्न होवून आपण पुढिल वर्षी अधिक जोमाने आपली बाग फुलविण्याच्या प्रयत्नात असतोय.या सर्वासाठी पाणी आवश्यक आहे आणि सध्या पावसाळा असल्यामुळे आपण हिरव्या बागेला आणुन खुप सजवूया.ती बागेचा संसार आपल्याला भरभरून बहरदार नजराना हमखास देईलच. 


Rate this content
Log in