मी आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार
मी आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार
जगात हजारो माणसे जन्माला येतात व काही काळ जगून हे जग सोडतात. अशा रीतीने जन्म-मरणाचे चक्र अव्याहतपणे अनंत काळापासून चालू आहे व अनंत काळ पर्यंत चालूच राहणार आहे. किती पशू-पक्षी जन्माला आले व किती मेले याची नोंद, गणती किंवा शिरगणती कोणीही ठेवीत नाही, त्याचप्रमाणे किती माणसे जन्माला आली व गेली याचा सुध्दा जग विशेष विचार करीत नाही.
माणूस
जन्माला येतो आणि सामान्यपणे आयुष्यभर
रामनाम
घेेेता किंवा रामनाम टाळाटाळी करत व इतरांची कुटाळकी करित
अकस्मात एक दिवस तो राम म्हणतो
व जगाला कायमचा रामराम ठोकतो.
जन्म व मरण यांच्यामध्ये जे असते ते जीवन.
हे जीवन जगत असताना
माणसाला एकच आस असते व ती म्हणजे
जीवनात दु:ख क्षणभरसुद्धधा नसावेे व ते अखंड आनंंदाने फुुलत असावे.त्याला असे
मनापासून वाटते की आयुष्यात दु:खाचे क्षण नसावेत. व जीवनात येणारा प्ररत्येक क्षण हा सण रूपाने समोर यावा. परंतू प्रत्यक्षात मात्र त्याला जो अनुभव येतो तो नेमका यांच्या उलट. सुुुुखाची आस बाळगणारा व
द:ख टाळण्याचा अट्टाहास करणाऱ्या या मानवाला सुुख-दु:खाच्या भाावांंचा जो
अनुभव येतो तो हा की, सुुखाचे आसू आहेत कणभर तर दु:खाचे आसू आहेत मनभर.
याचे एकमेव कारण एकच व ते म्हणजे जीव न जगणे ही एक उत्कृष्ट कला आहे. याची जाणीव बहुसंख्य लोकांना नसते.
इथेेच माणूस आपले कर्तव्य विसरतो.