दु:खाची जाणीव
दु:खाची जाणीव
संतश्रेष्ठ श्री संत नामदेव यांच्या आईने त्यांना बालपणापासूनच चांगली शिकवण दिली होती. त्यामुळे कोणाच्या मनाला एखादी गोष्ट लागेल असे वक्तव्य ते करित नसत. कोणतेही काम करताना ते अजमावत की ते करताना माझ्यावर काय परिणाम होईल?
एकदा घरातील जळण संपले होते. नामदेवांच्या आईने नामदेवांना हाक मारली आणि सांगितले, " जा परसातल्या पळसाच्या झाडाची साल सोलून आणि. "
आई म्हणजे नामदेवांचे दैवत. तिच्या आज्ञेचे ते त्वरित पालन करीत. त्यांनी कोयता घेतला आणि ते झाडाकडे पळाले. झाडांची साल त्यांनी सोलून काढली. आणि आईला आणून दिले. नंतर नामदेव महाराज खेळायला गेले. लपाछपीचा खेळ चांगलाच रंगात आला होता. नामदेव महाराज खेळत खेळत असताना त्यांच्यावर राज्य आलं डोळे बंद करून आपल्यावर आलेले राज्य चतुर्थी होते. नामदेव आकडे मोजत पळसाच्या झाडाजवळ उभे होते. मित्राचा आवाज येईना तेव्हा त्यांनी डोळे उघडले. मित्रांना शोधायला जाणार तितक्यात त्यांचे लक्ष त्यांनी सकाळी साल सोललेल्या पळसाच्या झाडाकडे गेले. झाडाचा बुंदा ओलसर झाला होता. ते झाड जणू रडतच होते असे त्यांना वाटते. नामदेवांना गलबला आले. झाडाखाली बसले. आणि आपल्या पायावर त्यांनी कोयत्याने तासायला सुरुवात केली. पहिल्याच आघाताने ते कळवळले. पायातून रक्त वाहू लागले. कातडी कोळी लागली. नामदेवांचा 'आई गं' असा आवाज ऐकून लपलेले मित्र बाहेर आले. बघतात तर त्यांच्या पायाची कातडी लोंबत होती. रक्त वाहत होते. घाबरून त्यांनी त्यांच्या आईला हाक मारली. नामदेवांची आई घाबरून जाऊन पळतच आली. नामदेवाजवळ पाहते तर काय नामदेवांच्या पायाला मोठी जखम झालेली. तिने स्वत:च्या साडीचा पदर फाडून नामदेवांच्या पायाला बांधला. आणि नामदेवांना घेऊन घराकडे नेले. घरी जाऊन जखम धुतली. हळद लावून पट्टी बांधली. मग नामदेवांना विचारले, कशी झाली ही जखम? तेव्हा नामदेव म्हणाले, झाडाची साल काढल्यावर त्याला काय वेदना होतात ते पाहण्यासाठी पायाची कातडी सोडण्याचा प्रयत्न केला.
जगद्गुरु श्री संत तुकोबाराय सांगितल्याप्रमाणें वृक्ष वल्ली आम्हा सोयरे यांच्यानुसार नामदेव पण विचार केला. तेव्हा आपण झाडावर, वृक्षावर हल्ला करायचा नाही. वृक्षांना सुद्धा त्रास होतो. वृक्ष आपल्याला सावली देतात, फळे देतात मग अशा वृक्षावर आपण कुऱ्हाडीने घाव घालायचा. नाही नाही हे वृक्ष सर्वांना अगदी सर्वांनाच साधूंना, गरिबांना, श्रीमंतांना व वाईटांना पण सावली, फळे देतात त्यांनी कधीही दुजाभाव केला नाही. आणि करिता नाही. तसेच वृक्ष आपल्याला आॅक्सिजन देतात, उन्हा, तान्हातून आल्यावर अशा वृक्षांच्या आश्रय घेतल्यानंतर समाधान वाटते.....
संत नामदेव यांना दु:खाची जाणीव झाली. दु:ख हे सर्वांनाच सारखे असते. हे नामदेव महाराज यांना समजले.