मान सांगावा जनाला
मान सांगावा जनाला
मान सांगावा जनाला
अपमान सांगावा मनाला
ही एक पारंपरिक ग्रामीण म्हण आहे ,आणि ही खरी पण गोष्ट आहे .
कारण आपण एखाद्याला आपल्या जवळचे समजून, जेव्हा आपल्या मनातली एखादी सल किंवा एखादा अपमान सांगतो.
तेव्हा ती व्यक्ती वर- वर सहानभूती दाखवते. पण पाठीमागे तुमची खिल्ली उडवत असते.
पण जर तुम्हाला एखादा सन्मान मिळाला तर!
तो मात्र लोकांना पचत नाही.
पटकन समोरच्याकडून तुमचे अभिनंदन होत नाही. म्हणून जिथे तुमचा मान सन्मान झाला आहे, तो तुम्ही लोकांना सांगत चला. परंतु तुमचा अपमान झाला आहे तो मात्र कोणाला सांगू नका मनातच ठेवा.