माझे पहिले पत्र
माझे पहिले पत्र
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
२००५, २७ जानेवारी रोजी माझा साखरपुडा झाला. त्यानंतर लग्नाची तारीख १७ मे काढण्यात आली. मधील चार महिन्यांच्या काळात एकमेकांना संपर्क करायचा हा प्रश्न आम्हां दोघांना पडायचा कारण त्यावेळी आता सारखे मोबाईल नसायचे. एसटीडी बुथ वर जाउन मी फोन करायचे पण कधी कधी फोन करायला उशीर झाला की ते भेटायचेच नाही मन नाराज व्हायचे मग मी त्यांना माझे पहिले पत्र लिहिले पत्रातुन माझ्या भावना त्यांच्या पर्यंत पोहोचवायचे पत्राच्या माध्यमातुन ते पण माझ्या पत्राला उत्तर पत्राद्वारे द्यायचे हे पत्र माझ्या अजुन आठवणीत आहे माझे पत्र त्यांनी आणि त्यांचे पत्र मी अगदी मोरपिसाप्रमाणे जतन करुन ठेवले आहे आठवण आली की ते पत्र काढुन वाचते व भुतकाळातील आठवणी जाग्या होतात त्या आठवणींना उजाळा मिळतो मन ताजेतवाने होते आणि पुन्हा चिरतरूण झाल्याचा भास होतो.