The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

Meenakshi Kilawat

Others

5.0  

Meenakshi Kilawat

Others

लेखणीचा साथ मिळाला

लेखणीचा साथ मिळाला

3 mins
791


मी व माझी लेखणी, रात्रंदिन सोबत असतोय. तिने मला जगण्याचा अमूल्य असा मार्ग दाखविला. मी जिवंत असेपर्यंत पूर्ण साहित्याची व खास कवितेची मनापासून ऋणी राहील. ब्रम्हांडात होणाऱ्या प्रत्येक हालचालीवर लेखणीचे साम्राज्य असतं. मानवाच्या अवतीभवती फिरून वेध घेणारी बोध देणारी तिच खरी लेखणी असते. लहान असतानाच आईबाबांनी हाती लेखणी दिली होती. पण दहावीला गेल्यानंतर म्हणाले, आता बस शिक्षण ! पुरे झालंय मुलीच्या जातीला काय करायचं शिक्षण शिकून, पण मला शिकण्याची खूप हौस होती. हुशार विद्यार्थ्यांमध्ये गणना व्हायची.


        तिथे हिंदी भाषी जुन्या विचारांची लोकं होती, पाचवी किंवा खूप झाले तर सातवीपर्यंत शिकवायचे, पण माझ्या आईबाबांनी मला दहावीपर्यंत काहीच बोलले नाही. तसे बाबा तहसिलदार असल्यामुळे प्रगत विचाराचे होते, आणि आईपण छान समजदार होती. पण गावातील काही आजोबा-आजी त्यांना टोकायचे, म्हणायचे झालं असेल ना शिक्षण, लग्न (ब्याहाव) करून मोकळे व्हा. पण माझ्या मोठ्या भावाने मला शिकवायचा मार्ग मोकळा करून दिला. त्यांनी विरोध केला म्हणून मला शिकता आले. ग्रज्युएशऩ पूर्ण करून लगेच लग्न करून सासरी आले, तर तिथेही जुन्या पद्धतीची लोकं होती.


      पण मी कधीच या लेखणीला सोडले नाही. लेखणीचा अन माझा साथ जन्मभऱ्यासाठीच करारबद्ध केला होता. लेखणी माझी सर्वस्व होती. सारख तिला हाती ठेवत असे ,पण आधी शिक्षण घेण्यासाठी लेखणीचा भरपूर फायदा उचलला. शिक्षण पुर्ण झाल्यावरही माझे स्वप्न संसाराच्या बेडीत अडकले होते. लेखणी सतत हाती रहायची.कधी सामानाची लिस्ट बनवायची कधी किराण्याचा हिशोब करायचा कधी रेसिपी लिहायची, बहिण भावाला पत्र आईबाबाला पत्र पतीला पत्र लिहायची.किंवा वेळ मिळाल्यास कविता चारोळ्या उखाणे लिहायचे. पेन्टिंग, ड्रॉईंग, कलाकृती, रांगोळ्या या सर्व हौस मोठ्या आनंदाने मी करायची. 


      काळानुसार कमीजास्त लिहायचं काम पडतच गेले. वाचनाचीही तेवढीच आवड होती. मग काय तर घरीच छानछान व्यंजन बनवायचे व सर्व कुटूंबीयांना, मित्र परिवाराला खाऊ घालायचे व आनंद भोगायचा. पण शिकल्यानंतर रांधा, वाढा करायला जरा जडच जातंय.पण नाईलाजास्तव लेखणीला मागे सारून कुटुंबीयाना सावरण्यात वर्ष गेले, साऱ्यांना माझी आवडीची चाहूल लागली आणि खरी लेखणीची गाठभेट अश्याच परिस्थितीत झाली. माझ्या पतीने मला खूप प्रोत्साहन दिले, माझ्या प्रत्येक कलेचं भरभरून कौतुक केलंय. आधी कधीतरी मी एक कविता लिहिली होती, मला आठवतो तो दिवस, घरी कशाचातरी उत्सव होता. त्या दिवशी माझी कविता, सर्वांना स्वत: त्यांनी वाचून दाखविली होती. मी लाजेने गोंधळले होते. पण त्या दिवशी साऱ्यांनी माझं भरपूर कौतुकही केलेलं होतं. झालं गेलं मी संसाराच्या व्यापात विसरले होते. नंतर मला पतीने संस्था रजिस्टर्ड करण्यात मदत केली. शासनमान्यता प्राप्त इन्स्टिट्यूट, महिलांसाठी प्रशिक्षण केंद्र, व तांत्रिक विद्यालयास खूपच मदत केली. 


     अतिशय गरीब, निराधार मुली व महिला माझ्या संपर्कात आल्या. दररोज एक ना दोन नवीन दैन्यकथा त्यांच्या डोळ्यात मला दिसायची. माझ्या जीवनात मी सर्व सुखच बघितले होते त्यामुळे मला गरीबीची किंवा दुःखाची जाण नव्हती असे म्हटले तरी चालेल, कधीच असल्या दीनहीन परिस्थितीशी माझा सामना झाला नव्हता. अशा गोष्टींवर माझा विश्वासच बसेना. पण त्या दुःखी, कष्टी स्त्रियांचे हाल पाहून, माझ्या डोळ्यातून अश्रू वाहायचे, मन ढवळून यायचं, मनात सारखा ध्यास असायचा, या क्षेत्रातील स्त्रियांसाठी काहीतरी करायचे, आणि मी करून दाखविले, त्यांना आपल्यी पायावर उभे केले, त्यांना सक्षम केले. त्या आताशी सर्व सुखी उद्योजिका झाल्या आहेत व होत आहेत. मला त्या स्त्रिया व मुलींकडून संवेदना मिळाल्या, त्या संवेदना मी माझ्या लेखणीत भरतेय. ज्वलंत उदाहरण माझ्या नजरेसमोरच असतात. म्हणूनच मी साहित्यातही थोडीशी लेखणी चालवत असते. तसा वेळ नसतो पण आवड ही कुणाच्या बंधनात नसते, ती वेळ काढूनच घेते. 


विश्वातल्या अनेक संतांची शिकवण मनी ठेवून वेळ मिळाल्यास वाचन करत असते. आपल्या या अल्पबुद्धीला चालना देते. घडण्याच्या नादात मी पण घडतच गेले. माझ्या मन्तव्यानुसार प्रयत्नांती परमेश्वर मिळतोय...म्हणजेच आत्मानंद मिळतो.


Rate this content
Log in