Meenakshi Kilawat

Others

5.0  

Meenakshi Kilawat

Others

"दीपावळी दिव्यांचा सण "

"दीपावळी दिव्यांचा सण "

3 mins
738


  दीपावळी म्हणजे फक्त दिव्यांचा सण नसुन मनातील दिवे उजळावयाला पर्यायी सण म्हणजे दिपोत्सव हा भारतात सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरा केल्या जात असतो. हा सण सतयुग काळा पासुन सुरु झाल्याची नोंद वेद शास्त्रात सांगितलेले आहे.


       श्रीराम वणवास भोगुन सिते सह जेंव्हा परत अयोध्येला आले तेंव्हा नगर जनांना अतीशय आनंदाने साजरा केलांय आणि उत्सवाचे रुपांतर दिपावळीच्या रुपात प्रगटला,पुर्ण नगर दिपाच्या झगमगाटाने सुशोभित करुन श्रीरामचंद्राचे स्वागत नगरवासीयांनी केले होते. दीपावळीचा सण आजही मोठ्या थाटात मनवतात.त्या दिवशी अमावस्या असते.असंख्य दिपांनी तीमिर नाहीसा करतात. त्या रात्री लक्ष्मीचे पुजन करतात,आणि लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा महत्वकांशी प्रयोग करतात. घरात सुख,शांतता,आनंद लाभावा म्हणुन हा प्रयत्न असतो. तो प्रयत्न सफल ही होतो सर्व कुटूंब एकत्र येवून हा सण अतिशय उल्हासाने साजरा करतात. 

   सर्वीकडे सुगीचे दिवस चहुकडे हिरवळ बहरलेली फुंलझाडे,वेली अनेक रंगाच्या फुलांनी नटलेले ताटवे,फळांच्या बागा फळांनी लगडलेल्या असतात.चहूकडे निसर्गाचे अप्रतिम लावण्य कसे जीवाला वेड लावत असतं त्यात सागर,सरिता,झरे,फवारे पुर्णतया चीर तरुन भासत असतं.अन्न धाण्याचा, भाजीपाल्याचा सुकाळ,मनाला भावनारी गुलाबी थंडी,आल्हादपुुर्ण वातावरण दिपावळी सणाला पुरक असते.

   आजकालची दिपावळी जरा वेगळ्या पद्धतिने साजरी करतांना दिसतात.धावपळीचे जन जीवन असल्यामुळे दोन दिवसात दिवाळी सारखा सन आटोपता घ्यावा लागतो.ऑफिसला सुट्या नसतात मुलांना पण सुट्या नसतात.अश्यावेळी काय करावे काही सुचत नाही. मग आपन रेडिमेटचा सर्रास वापर करीत असतो. कपड्यापासुन तर खाण्यापिण्याच्या वस्तू देखिल रेडीमेट वापरतो ,या सर्व व्यस्तते मुळे नुकसान मात्र आरोग्याला भोगावे लागतात हे वेगळे,

    सनातन काळी अस नव्हते,१५ दिवस आधीपासूनच सारखी धावपळ असायची,घर अगदी साधी रहायची,दर वर्षी रंगरोगन व्हायचे,घराचा कानाकोपरा स्वच्छ व्हायचा सजावटी करीता जे करता येईल ते करायचे आम्हि घरातच निसर्ग फुलवायचो आमच्या लहानपणी सिंधीच्या झाडाची मोठाली पाने आणुन त्यावर झेंडूची फुले खोवून सुंदर सुशोभित कमान तयार करुन ती आपल्या मेनगेटवर किंवा दरवाज्याला लावुन शोभा वाढविण्याचा प्रयत्न करित होतो. झेंडुच्या फुलांची हार करुन सर्व दरवाज्याला लावुन त्या दरवळणाऱ्या सुंगधात मनसोक्त सर्वांगात भिनवत होतो.आंब्याची पाने तऱ्हेतऱ्हेनी गुंफुन तोरणे लावित होतो. मातीची पनती कुंभाराकडुन दरवर्षी नविनच आणायचो,सर्व वातावरण कसे प्रफल्लीत गांधाळलेले असायचे.

   घरातील थोरांनाही उत्साह यायचा,बसल्या जागेवरच त्यांच्यापरीने ते काहीतरी मदत करायचे आईला तर मुळी वेळच मिळायचा नाही. पहाटे उठून अंभ्यगस्नान म्हणजे अंगाला तेलमालीश करुन आंघोळ करुन टिळा लावून सर्व भांवडांना अन बांबांना ओवाळणी करीत असे. अभ्यगस्नान झाल्यावर फराळ करुनच कामाला लागायचो,आणि चार दिवस आधीच अनारसे करण्या साठी आई तयारी करायची,प्रत्येक दिवशी नविन गोड पदार्थ खायला बनवित असे. करंज्या, लाडु, चकल्या, शंकरपाळे, शेव,चिवडा,जेवना सोबत खीर किंवा हलवा गरमागरम असायचा.खुप खेळने खाणे ते जीवन काही वेगळेच होते ती मजा आता नाही राहिली.


     परंतु दीपावळीची सर्वानाच गोडी असते तशातही आपण वेळ काढून नविन मार्ग काढतोच की,खान्यापूर्ति व नवीन कपड्यापूर्तिच वेळ न काढता दीपावळीत चांगल काही कार्य करू शकतोय जनसेवा करू शकतोय गरजू लोकांचे अश्रु थोड्या प्रमाणात का होई ना पुसू शकतोय. 

अनाथालयात, वृद्धाश्रमात जावून प्रेमाने त्यांना सहानूभुती व स्नेह देवून त्यांची उदासीनता दूर करुन त्यांचा विरंगुळा दूर करू शकतोय.कधी वेळ काढायचा अपंग,अनाथ बालंका साठी काही खावू देवुन आत्मीयता प्रगट करावी. त्यांना प्रेम दिले असता तेच प्रेम आपणास परत मिळत असते.मानवता जगात श्रेष्ठ आहे.प्रत्येक मानव परोपकारी असायला हवा.यामुळे आपणास मनशांती लाभ मिळत असतेय.            


 पैश्याने सर्व काही मिळत नसते,दुखीतांचे दु:ख दुर करण्याचा थोडा जरी प्रयत्न केल्यास दिव्य अनुभूती मिळूनी मनाला आनंद व समाधान मिळत असते. वयक्तीक दु:खाचा क्षणात विसर पडतोय.


अश्या प्रकारे आपण आपली दिवाळी साजरी करुन या धावपळीच्या आयुष्यात आपले जीवन सार्थक करु शकतोय.आणि ह्रदयदिपांजली शुद्ध स्वास्थ्य सुदृढ करु शकतोय. तिमीर दुर करण्याचा थोडा का होईना प्रयत्न करुन प्रकाश किरणे पसरवू शकतो.  


Rate this content
Log in