STORYMIRROR

Tukaram Biradar

Children Stories Others

3  

Tukaram Biradar

Children Stories Others

चांगला माणूस

चांगला माणूस

2 mins
291

तो आता फक्त एक खेडेगाव होते, त्या गावात अनेक जातीचे लोक राहत होते. गावातील प्रत्येक जातीत गोरगरीब लोक ं होते. ते दररोज काबाडकष्ट करुन आपली उपजीविका भागवीत असत. काही लोक मजूरी करायचे तर काही लोक आपला उद्योग, व्यवसाय करायचे. असेच एकदा गावातील दोन वेगवेगळ्या जातीतील दोन तरुण वाद करुन घेत होते. वाद विकोपाला गेला होता. दोघेही तोंंडाने वाईट बोलून घेत होते. ते दुसऱ्याने ऐकू नये असे शब्द वापरत होते. 

      ते शब्द एक मुलगा ऐकला. कानाखाली कोणीतरी एक जोराची चपराक मारावी आणि ते आपल्या मेंदूपर्यंत आवाज जाऊन चम्म करावे तसे ते शब्द त्याच्या कानावर पडले. आणि विचाराचे काहूर त्याच्या मनात माजलं. कारण तो असले शब्द आतापर्यंत ऐकले नव्हते. त्याची आग त्याच्या मस्तकापर्यंत गेली. तो विचार करु लागला. 

     आणि माणूस इतका बदलतो का? आपले संपूर्ण आयुष्य वाहून घेणाऱ्या त्या माऊली ची त्याला क्षणभरही आठवण येत नसेल का? आणि येत असेल तर ही जबाबदारी त्याने का झटकावी. सगळच अनुतरीय होतं. त्या मुलागा आपला चेहरा खाली घालून विचार रीत होता. इतक्यात त्याच्या पाठीवर तोच थरथरत्य हात फिरला.तो वर, पाहीले तर तिच बाई त्याला म्हणाली, 'इतका विचार करु नकोस बाळा, तुझ्या आईवडीलांना नीट ंसांभाळ.म्हणजे झालं. 

     मगतर मेल्यानंतर मेल्यासारखे झाले. तो आता फक्त रडायला बाकी होतं. कारण एका क्षणात त्याचे पूर्ण अंतरंग त्या माऊलीने वाचले.पण आम्हाल आमच्या आउवडीलाचं थोडसं दु:ख सुदधा कधीच जाणता येत नाही. जीवनाच्या सचोटीचे एवढी शिक्षण घेऊनही एवढं शिक्षण घेऊनही हे सर्वजण आडानी वाटतो त्यांच्यासमोर. 

      कुठे शिक्षण घेतले असेल यांनी कुणास ठाऊक. शेजारच्या जिल्हा परिषद च्या शाळेत मास्तर मुलांना विचारत होते, आपण काय शिकलो? मी मनाशीच उत्तर दिले, आयुष्यात इंजिनिअर होता नाही आले तरी चालेल पण चांगला जबाबदार माणूस जरुर व्हायचं............. 


Rate this content
Log in