बाप
बाप
बापावर प्रेम करणारी, बापाची म्हातारपणाची काठी बनणारी सुज्ञ मुलं लावणे ही फार मोठी उपलब्धी मानली जाते. संपत्ती कितीही असूनही मुलं नीट नसेल तर ती आपत्ती ठरते..ज्यांना चांगली मुलं लागतात खरच ती माणसं भाग्यवान. अनेकांना मुलाचे प्रेम मिळत नाही, सन्मान मिळत नाही.
मुलांच्या प्रेमासाठी तरसणाऱ्या बापाच्या हृदयाच्या होतात. हे किती जणांच्या लक्षात येते. बापाच्या हृदयाला झालेल्या जखमांवर कोणताही डाॅक्टर उपचार करु शकत नाही.यावर मुलाचे प्रेम हेच एकमेव औषध रामबान औषध ठरते. मुलाची अधोगती पाहून माझं कसे होईल याची चिंता बाप करत नाही.
लेकराचं कसं होईल म्हणून बाप तळमळतो.हे समजायला बापच व्हावे लागते. आईच्या तुलनेत बापाला फारच महत्त्व कमी दिले गेले आहे.
आई जितकी म्हत्वाचीी असते तितकेच बाापही महत्त्वाचा असतो. परंतु अगदी सर्वानीच आईची महती सांगितली आहे. आणि बापाकडे दूर्लक्ष झाले आहे..
आई प्ररेम व्यक्त करते,आई म्हणजे प्रेमाचा सागर असेच मुलाांंना ऐकायला मिळाले. बाप म्हणजेे अव्यक्त प्ररेम असते.याची जाणीव मुलांना करून देेण्याची गरज असते. आई सतत कृतीतून आणि उक््त्ती तुुन व्यक्त होत असते आणि बापाची किमत फक्त मुलीलाच समजते.