बालभक्त
बालभक्त
भारतीय संस्कृतीत भक्तीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. भक्त हे परमेश्वर भक्तीत जीवन व्यतीत करतात. भजन, चिंतन, नामस्मरण करण्यात मग्न असतात. सुखात राहतात.धार्मिक कथेतल मर्म, उददे्श आणि उद्दिष त्यांना कळते. दुसऱ्याच्या आहारी जाण्याचेही दुष्परीणान ते जातात.
परमेश्वरी भक्ती कृतीत उतरते. हे भक्त समाजात नीतीधर्माचे पालन करतात. शरण जातात फक्त सर्वशक्तिमान परमेश्वरालाच. परमेश्वर भक्तीत रममाण अशा समाजात भेदभाव, अधर्म, , अत्याचार, अनाचार, याला स्थानक नसते. प्रत्येक जीवाप्रती करुणाभाव असतो.असे परमेश्वराचे भक्त समाजच शांततामय जीवन आदर्श समाज ठरतो.
चिलया बाळ असो, भक्त प्रल्हाद असो किंवा या कथातून परमेश्वर भक्तीतील निष्ठेची परीक्षा घेतली गेलीय. कोणतेही ध्येय गाठताना सदाचारी वागणूक, निष्ठा किंवा आत्मविश्वास हवा. प्रयत्नात सातत्य हवे. नीतीनेच कोणताही विजय मिळतो हा संस्कार या कथातून रुजविली गेलाय. भक्तीत रममाण होण्याचा सहज मार्ग म्हणजे भजन .
पावन व्हायचे असेल, चांगले जीवन जगायचे असेल तर करु या भजन. हा भाव बालपणापासूनच रुजविली जातो.
