STORYMIRROR

Govind Gorde

Others

4  

Govind Gorde

Others

स्वातंत्र्य

स्वातंत्र्य

1 min
675

स्वातंत्र्याची ज्योत पेटली खरी

पण ज्योतीचा प्रकाश हरवला आहे

देशात महागाईच्या प्रमाणाची वाढत आहे दरी

वाढत्या भ्रष्टाचाराने देश पोखरला आहे


हक्काची जाणीव नसल्याने हक्कच हिसकावून घेतले जात आहे

मग अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळवून मिळवले तरी काय

वाढती दहशत बघून धरती माय रडत आहे

मग स्वातंत्र्य मिळवून मिळवले तरी काय


ब्रिटिश देश सोडून गेले खरे

पण गुलामी काय गेली नाही

स्वातंत्र्य मिळवून वाटले होते बरे

पण आपल्या राजकारणांनी अन्याय करणे सोडले नाही


अन्यायाविरुध्द पेटून उठायची आता हिम्मतच उरली नाही

कारण देशामध्ये समाजकंटकांचा अंहकार उसळला आहे

देशभक्ती आणि समाज हित याला आता अर्थच उरला नाही

कारण गुलामी पत्कारायची आता सवय लागली आहे


अभिव्यक्ती स्वातंत्र्याची देखील आता भीती वाटू लागली आहे

कारण अन्यायाची जाणीवच कोणाला राहिली नाही

माणसातला माणूसपणच आता हरवत चालला आहे

कारण फुकट मिळालेल्या स्वातंत्र्याची किंमत कोणालाच राहिली नाही


साहित्याला गुण द्या
लॉग इन