STORYMIRROR

Swapna Wankhade

Others

3  

Swapna Wankhade

Others

सत्संग

सत्संग

1 min
267

भाषणात लोक फार बोलतात

आळवतात मोठ मोठाली तत्व

असे लोक कृतीशून्य असतात

प्रत्यक्षात स्वार्थाला देतात महत्त्व


फार कमी लोक असतात जे

खरोखर कार्य करतात अतुल्य

इतके सोपे नसते कलियुगात

जपणे आयुष्यभर नैतिक मूल्य


बोलघेवड्यांवर फार भाळू नये

बनू नये त्यांच्या हातचे बाहुले

संत तुकाराम म्हणतात, बोले 

तैसा चाले त्याची वंदावी पाऊले


सकारात्मक आवडी जपाव्या

असावा वेगळ्या छंदांचा व्यासंग

कुवृत्तीच्या लोकांना दूर सारून

करावा सज्जनांसंगे सदैव सत्संग


Rate this content
Log in