रात्र वैऱ्याची असते
रात्र वैऱ्याची असते
अखेर देश स्वातंत्र्य झाले
अनेकांना हक्क मिळाले
जगण्याचे द्वार खुले झाले
पण अजूनही ती स्वतंत्र नाही
मोकळेपणाने फिरू शकत नाही
रात्रीच्या वेळी ......
सर्वच क्षेत्रात तिने बाजी मारली
पुरुषांसोबत काम करू लागली
आरक्षणाचा फायदा ही मिळवली
पण अजूनही तिला कमी लेखले जाते
एकटीला बाहेर जाऊ देत नाहीत
रात्रीच्या वेळी ......
येथे दिवसा फिरणारे सारे मनुष
सायंकाळ होताच हैवान बनतात
दिवसा दिसणारे भोळे चेहरे
रात्र होताच सावज शोधतात
काळजी लागलेली असते तिची
म्हणूनच कोणी तिला जाऊ देत नाही
रात्रीच्या वेळी .......
रात्र हे अंधाराचे प्रतिक आहे
चोर डाकू राक्षसांचा साथी आहे
सर्व काळे कारनामे अंधारात होतात
म्हणून सहसा कोणी फिरकत नाही
रात्रीच्या वेळी .......
