STORYMIRROR

Sunayana Borude

Others

4  

Sunayana Borude

Others

नवा महाराष्ट्र

नवा महाराष्ट्र

1 min
274

गडाच्या भिंती

म्हणजे एक साक्ष असते

संरक्षणाची...कर्तव्याची

हुतात्म्याची...विजयाची

त्यांच्या स्पर्शातून जाणवतात

तलवारींचे घाव..

शत्रूवर मात करण्यासाठी

उभारलेले गनिमी कावे..

स्वराज्याचे स्वप्न

अन शिवबाचे छावे..

म्हणुनच शिवरायंचा आदर्श म्हणुन आपल्याला

ते जपायचे आहेत.

शिवबांच्या संस्काराने

नवा महाराष्ट्र घडवायचा आहे..


साहित्याला गुण द्या
लॉग इन