लोकसंख्या
लोकसंख्या
अश्मयुगीन काळातील लोकं गुहेत राहत होती
वनातील कंदमुळे फळे खाऊन जीवन जगत होती
लागला अग्नीचा शोध मग चाक लागले पळू
आदिमानव स्थिर जीवनाकडे लागला वळू
पाण्याच्या जवळ राहून ते शेती करू लागले
पाहता पाहता मानवांचे राहणीमान बदलून गेले
लोकं वाढू लागली तशी अनेक प्रश्न झाले निर्माण
अन्न वस्त्र निवाऱ्यासाठी निसर्गाचे झाले निर्वाण
बघता बघता कशी जगाची या समस्या ही वाढली
सारी जंगले साफ करून लोकांनी मोठी घरे बांधली
येणारा भविष्यकाळ पहा सर्वांसाठी असेल अवघड
आपलीच माणसं आपल्यासाठी होतील अवजड
लोकसंख्या वाढली तशी झाला पर्यावरणाचा ऱ्हास
खायला मिळेना अन्न जगण्याचा होऊ लागला त्रास
सरकारने केला आहे कायदा हम दो हमारे दो
लोकसंख्या आवरण्यासाठी सर्वांनी मंत्र जपा हो
