ग्रामीण भारत !!
ग्रामीण भारत !!
1 min
360
भारता सारख्या विकसनशील देशांला
आवश्यकता आहे ग्रामीण विकासाची
ग्राम जनतेला देवून आधुनिक दृष्टिकोन
काळजी घ्यावी त्यांच्या आर्थिक विकासाची
अनेक गावांत अभाव आहे रस्त्यांचा
पिण्याच्या पाण्याचा, पथ दिव्यांचा
समस्या आहे सांड पाण्याची
नाले सफाईची, अस्वच्छतेची
आवश्यकता आहे समस्या दूर करण्याची
गावा गावात किमान सुविधा पुरविण्याची
सत्तर टक्के जनता राहते ग्रामीण भागात
करावा विकास व ठेवावे त्यांना आनंदात
