आयुष्याची गुरुकिल्ली
आयुष्याची गुरुकिल्ली
जीवन जगताना आपले वय काय हे महत्वाचं नसतं
आपण कसा विचार करतो हे महत्वाचं असतं
जीवन जगताना शिक्षणाची डिग्री महत्वाची नसते
घेतलेल्या शिक्षणाचा सदुपयोग हे महत्वाचं असते
जीवन जगताना दिवसामागून रात्र ही येणारच
एकामागून एक स्थिती हे येणारच हे माहिती असावं
जीवन जगताना होणारा बदल महत्वाचा असतो
त्यानुसार आपल्यात होणार बदल महत्वाचा असतो
जीवन जगताना ती किती श्रीमंत हे महत्वाचं नसतं
तर आपल्या मनाची श्रीमंती हे महत्वाचं असतं
जीवन जगताना दूजाभाव करायचा नसतो
तर स्वभावाने सगळ्यांना जिंकायचा असतं
जीवन जगताना आयुष्याशी लढा द्यायचा असतो
सुसंगती तेवढी सगळ्यांमध्ये जपायची असते
