समीरला न्याय
समीरला न्याय
मकर संक्रन्ती जवळ येत होती. अनील उत्साही होता. तो म्हणाला.
" मकरसाणक्रांतीनिम्मित उत्साही आहे माझे मन
घेऊया तीळगुळाचे लाडवांचे आनंद आपण. "
सुनील म्हणाला.
" तिळगुलासोबत घेऊया पतंग उडवण्याचा आनंद
पतंग उडवण्याचा गर्व असणाऱ्या लोकांचा करूया स्वर बंद. "
दोघे ही बाजारात तिळगुळ व पतंग विकत घ्यायला जातात. त्यांना समीर दिसतो. एका दुर्घटनेत त्याचा चेहरा
भाजल्यामुळे तो कुरूप दिसत असे.
अनील ने समीर ची म्हस्करी केली.
" याचे आगमन जर का असेल सक्रिय
तर आपल्या आनंदाचा बेत शंभर टक्के निष्क्रिय. "
सुनील म्हणाला.
" आपल्या सोबत हा मनुष्य असेल तर पतंगाची झुंज देण्याची गरजच नसेल
याला बघूनच प्रतिस्पर्धी पळेल. "
समीर ला वाईट वाटले. तो रडून गेला. राजेश काकांनी हे संभाषण ऐकले.
राजेश काकांनी अनील व सुनील ला तीळगुळाचे लाडू खायला बोलवले.
दोघांनी तिलगुळाचा लाडू खाल्यानंतर ठसका दिला.
अनील म्हणाला.
या लाडवाची चव होती फार बेकार.
असे पाहुणचार आम्हाला नाही स्वीकार. "
अनील म्हणाला.
" अस्या लाडवांची वाटणी
म्हणजे रुग्णालयात जाणे क्षणोक्षणी. "
राजेश काका म्हणाले.
" तुम्हाला असे लाडू दिल्याबद्दल मी क्षमस्व आहे.
पण या लाडवाचे एक वैशिष्ट आहे.
असे की माणसाच्या स्वभावाप्रमाणे हे चव देते.
जे समजतात समाजात त्यांचे वर्चस्व आहे. "
दोघे म्हणाले.
" तुमचा आशय आम्हाला समजण्यात नाही आला
काय सांगायचा प्रयत्न करताय आम्हाला. "
राजेश काका हसले.
" जसे तिळगुळ खाऊन गोड असण्याची असते अपेक्षा.
मग खऱ्या जीवनमध्ये कडवटपणा दाखवून का करता कोणाची उपेक्षा. "
राजेश काका म्हणाले.
" जेव्हा स्वभावाच्या रूपात लोकं समाजात आपला गोडवा पसरवतील
तेव्हाच मित्रता चे पतंग स्थिरपणे आकाशात जातील. "
अनील व सुनील ला कळले की राजेश काका समीरशी झालेल्या दुरव्याहाराबद्दल बोलत होते.
दोघे म्हणाले.
"सर्वाना एक सम्मान समाजात असू दे प्रेम व मित्रता.
सर्व लोकांबद्दल एक सम्मान भाव ही एक अत्यावश्यकता."
दोघांनी समीरशी माफी मागितली व त्याच्याबरोबर मकर संक्राती साजरा केली.
सर्वाना मकर संक्रन्तीचे हार्दीक शुभेच्छा.