अमोल धों सुर्यवंशी

Others

3  

अमोल धों सुर्यवंशी

Others

प्रेम भोग

प्रेम भोग

11 mins
1.0K


काल मी एक चित्र बघितले एक जोडप एका झाडाखाली बसले होते. आणि त्यांच्या समोर एक कुत्रा आणि कूत्री पण उभी होती.त्या चित्रातील मजकूर वाचला तेव्हा खुप हासू फुटले त्यामध्ये लिहिलं होते दोघांना पण एकाच गोष्टीची खाज आहे म्हणजे ज्यांने हे चित्र काढले त्याला सांगायचे होते प्रेम हे असच आहे. आज कल का, असो दुनियेत भाड यांचीही कमी नाही किंवा त्याचा विरोधा भास असू शकतो असे हि प्रेमाचे खरे रूप समाजात आडळते तरी कुठे काही ना वगळता म्हणून तो चुकीचा आहे हे मी ठरवू शकत नाही. त्याला जे सांगायचे आहे ते त्यांने बेधडक रेखाटले आज कालच प्रेम हे हापापलेल्या वृत्तीचे आहे हे कळते गोलपीठा वाचला की समजते लेखकांने चोरून शब्द नाही वापराचे तर छाताडावर फेकून माराचे नामदेव ढसाळ यांची लेखणी ,

जखमी कळल्याशिवाय सोडतच नाही.ज्यांने तो मजकूर लिहिला आहे तो या काळाला उब देणारा बर्फ आहे नक्कीच. उदाहरणे खूप आहेत भोगण्यासाठी प्रेम अशा पवित्र जाणीवेचा खून केला जातो हे लज्जास्पद आहे .लग्न झाल्यानंतर हि लफडी करतात त्याचे नाव पण प्रेम आहे ? प्रेमाला वय नाही लाज नाही भीती नाही प्रेम हे स्वतंत्र सागर आहे मग लग्नच कशाला करा हे पण उत्तर आहे पण म्हणतात ना हात धूण घेणार्‍याची कमी नाही.तरी ही सार मान्य नाजाईस संबंध ठेवून प्रेम जपने कसे जमत पण संसार का नाही नात्यांच्या पुढे जाऊन प्रेम करतील .करा पण डोळे उघडून जाण ठेवून दुसर्‍याच्या घरावर काडी फेकून शेखत बसणे भोगणारी निर्जीव वस्तू नाही प्रेम काळजातील धग आहे प्रेम.

आजकालचा नविनच फंडा बाबा हा शत्रू जणू आणि फन्टंर हा हिरो त्याला शेंबूड काढायला नाही आला तरी चालल पण ती शेंबडी जीव ओवाळील की हा शाहरूखच असो नाव ठेवायचे नाही.

तेरा वर्षाची मुलगी जीला हागाच चिंपाट माहित नाही कूठे ठेवायचे घरात चुलीच्या बाजूला ठेवते, ती बापाला म्हणते आज कालच प्रेम असचं असतं तूम्हाला नाही समजणार.माझी लाईप मी काय पण करील आई घाल तू जगवल त्याची परत फेड आशीच कर बाई हे पण प्रेमच आहे..मग बदनाम कोण?हा सारा बाजार आहे हिते कोण काय आणि कोणी काय सार लफडच.एकावर प्रेम करावं पण ते खर कराव ....

प्रेमावर कविता करायला 

कोणावर तरी प्रेम करावे लागते

त्याला सांगितले नसले तरी

मनातून अनुभवावे लागते.

 प्रेम पाजर निर्माण करणारी ईच्छा शक्ती आता लुप्त होत आहे हे नक्कीच

विंदा करंदीकर यांची हि कविता वाचली की प्रेम समजते त्या युगातले. काही हि प्रेम असो कोणवर हि प्रेम असो ते मना पासून करावे तेही दुसऱ्याला न दुखवता.आज हिला पटवली उद्या दुसरीला फिरवली तीसरीला लाॅजवर घेऊन गेला. चौथीचा चप्पलाचा मार खाला. मग काय प्रेम आहे आमचं कुत्र्यांसारखे म्हणून त्या चित्रातील मजकूरकारांने दाखवलेले योग्यच.

प्रेम भोग तूझ्या नजरेने स्पर्श करून माझ्या ह्दयी राज करेल सजणी हे प्रेम भेटल पहिले....खरे

हल्लीच्या जनरेशन मध्ये गरमा गरम जोरात आहे असो नशा तेरा प्यार का डोक्यावर पालता ग बाई . चाळीतील वळू रग्या या वेळी चाळीत गाजत आहे रग्या म्हणजे रगील रंगील साला वासूच चमडी जणू काॅलेज मध्ये एक पण कळी फुलवू शकला नाही. पण गल्लीतील मोगरा आणि चाफ्याचा सुगंध वरबडत असतो रोज नविन लपड करत असतो म्हणून त्याला गल्लीतील पोर टेकडीवरील वासू म्हणतात . तो खेळ खेळतांना , मूताय जाताना रोज गरम गोष्टीच्या उकळया फोडत असतो सर्वांना माहिती होत हा पक्का फेकू चंद आहे म्हणून त्याच्यावर कोणीच विश्वास ठेवत नाही दचकिचा खोटे बोलतो कोणाला ना कोणाला फसवी एक मुलगा फसला त्याच्या स्टोरी मध्ये गोद्यांचा भाचा गजानन गावावरून आलेला तो गल्लीच्या कोपर्‍यावर बसाय यायचा की रग्या सुरू हे सांग ते सांग त्यान त्याला विचारल कामाला कूठे आहेस तो बोला कुंभार वाडा स्टार मेडिकल आयला तूला फाॅकल्यान गल्लीतील कांड सांगतो.त्याचा रटा चालूच आरे माझा मित्र गोवंडी मधील ईशमाईल गेला होता तिकडे भावाच्या कामात पण कंटाळा आला आणि रग्या नाकावर हात खुणावत त्या गल्लीत गेला भेंचो लोच्या ना भाई  खोसकोंड शोधत निघाला साला पैसे पण होता मग काय

एक समोरच्या लाईनला चकमकीत साडी मध्ये दिसली ना आणि भाई गळपाटला सगळ फिक्स केल देनेका दोसो मग भाई गेला आत आणि तयारीला लागण्यापुर्वी मागील पडद्यातून कोणी तरी त्याची पाॅनट ढस केली (ओडली)आणि साला धडपडला त्याची पॅन्ट कोणी तरी ओडून त्यातील पैसे चोरले भाऊ .रांडा बेकार लूटला भाई त्याला खाल बिल काही नाही उलट पेकाटात लाथ भेटली मग काय भांडला पैसे माघी नाही दिले म्हणून मारामारी झाली तिथील दलालांनी पण झोडपून काढला ना त्याला गजानन पैसे मिळाले त्याला पैसे नाही मिळाले पण पॅन्ट दिली भाई रडतरडत जवळच पोलीस ठानात गेला तिथे जाऊन सर्व घटना सांगू लागला आणि राहिलेली रग पोलीसांनी हि काढली त्याच्या गालावार आवाज काढून बोले तू गेलासच कशाला ? काही नाही होणार तू जा हितून मग परंत घरी आला आणि घरी खोट सांगीतले चोरी झाली चोरांनी मला खूप मारल आणि पैसे चोरून नेहेले परत कधीच तिकडे गेला नाही. अस आहे तिथेच तू आहेस ना जरा जपून भाऊ. गजानन मेडिकल मध्ये काम करतो बाहेर काही जात नाही आत मध्येच काम असल्याने तो बोला काही धोका नाही मला रग्या येताना जाताना हेरतील आणि पकडतील.पोरगा चार दिवस घरी राहिला मामाला सांगितल मी कामावर जाणार नाही मला दूसर काम बघ मामा विचारल काय झाल कोण काय बोल का तेव्हा त्याने मामाला सांगितल की रग्या बोला मामाने समजावले व महिनाभर त्याला सोडायला जाऊ लागला आसा रग्या आहे वाटलाव्या. गजाननच्या मेडिकलवर मुली जर आल्या झगामगा आणि बघा दिसणार्‍या तर तो बघितल्यावर आत सरळ गोदाम मध्ये पळायचा शेट्ट नी सांगितले होते भित नको जाऊ माझ्या कामगारांना कोणी त्रास देत नाही माझी ओळख आहे तू बिनधास्त राहा. पण रग्याचे शब्द आठवायचे डोळ्याला डोळा भिडला खेळ खलास भेटणार तर काही नाही पण लुटणार आशा असतात त्या बाया. मग काय गजानन ची फाटे त्यांना बघून आणि जर चुकून रस्त्यावर दिसलीतर एकादी बाई तर सुसाट पळे सवय झाली त्या वातावरणाची भीती हाळूहाळू कमी होत गेली 

आपण ज्या गोष्टी पासून दूर पळतो नेमके तीच गोष्ट आपल्याकडे धाव घेती.

 एक दिवसी आसीच नजरेची चकमक झाली बस भेटली नाही म्हणून गोल देवळा जवळ टॅक्सी पकडण्यासाठी जात असताना समोर उभी असणार्‍या एक सुंदर परी कडे लक्ष जाते हिरव्या साडी मध्ये दिसणारी मुलगी मनाला भुरळ पाडणारी अशी सुंदरी जणू. टपरीवर उभी होती सिगारेटचे मस्त मगन जूरके घेत होती तिला पाहून गजानन हारपला मग परत रग्या खवीस आठवला आणि गजानन तिथून निघून गेला. मनात भरावी आशी मुलगी बघितल्यावर मैत्रांना किंवा आपल्या जवळच्या माणसाला सांगतोच आपण .पण गजानन आपली कोणतीच गोष्ट कोणाला सांगत नसे आशा शांत स्वभावाचा होता तो त्या दिवसा पासून कामावरून घरी येणारा रस्ता बदला त्यांने बस पकडणे बंद केले टॅक्सीने टेन्शन वर येने चालू कामावरून सुटणारा वेळ आणि तीचा कामवर जाण्याचा वेळा एकसारखाचं होता त्याला रस्त्यावर ती काही ना काही करताना दिसत आसे तीला बघण्यासाठी ते ही तिला न कळता हे छान वाटे त्याला ती नेहमी नटलेली दिसे पण साडीत सिगारेटचे झूरके घेतांना पहिल्यांदा बघितलेली ती मुलगी तीला पाहून अबजूक वाटे गजानन ला खात्री होती की तीच्याबद्दल आपल्याला 

आकर्षण आहे नक्कीच .पण तीला विचारायचे नाही फक्त बघत राहायचे खूप भारी वाटत. त्यामूळे रोज चोरून बघे ती मेडिकल मध्ये आली कि तो आत पळून जात नसे तीला बघत रहाणे जाम आवठत असे त्याला. बोलायची हिमत करी पण रग्या आठवायचा नाहीतर लूटून नेहेतील. तो सन्डेला पण कामावर जाऊ लागला एकटाच घरात बसे जास्त बाहेर दिसत नव्हता गल्लीच्या कोपर्‍यावरील कट्ट्यावर सर्व मित्र बसले होते रग्या नव्हता गोद्यांन गजानन ला आवाज दिला व बोलवल मी बघतोय तूला शांत असतोस घरात पण काही बोलत नाही काय मॅर्डर झाला आहे का घरात विचारत नाही म्हणून बाहेर विचारतो तूला बोल गजानन नाही गावची आठवण येते कधी कधी म्हणून शांत असतो बाकी काही नाही. रवी प्रेमात पडला नाहीस ना गजानन नाही रे दादा तितक्यात ती नाव राधा वैगरे नाही गजानन नाही रे अस असेल तर सांगेन रवी भुकड प्रेम सम्राट आले रग्या शांत होता काय झाल विचाराची गरज नाही आल्या आल्या सुरू दिपा नाय बोली रवी आरे तूझी आयटम तर पुजा होती ना ती आहे रे हे दुसर भरगच्च होत रे पाखरू नाय भेटल गोंद्या गजानन लवकर घरी ये जेवायला आणि गोंद्या निघून गेला रग्या रवी काय झाल काय .गजानन मी शांत असतो म्हणून जरा लोड घेतलाय मामान बाकी काही नाही. रग्या जन्नत मध्ये भेटला की काय एकादा बाॅम गजू .गजानन भडकून आरे हिजडापण सोडणार नाहीस साला तू आणि निघून गेला. रग्या रवी याला काय झाल. 

गजाननला रात्री एकच विचार आला त्या मुली बद्दल काय करू आकर्षण आहे ठिक आहे जाऊदे उद्या भाव विचारून बघू सकाळी सगळे पैसे घरी ठेवून पाचसे घेतले खिशात आणि कामावर आला शेट्टला बोला मी लवकर घरी जाणार आहे नतंर परत काय झाल ते नाही जाणार बोला. पुरा दिवस विचार ऐवढा करत होता कि त्याने तापच्या गोळ्या खाल्या कामावरून सुटला जायच नाही तीला भेटायला हे नक्की केल लांबूनच बघायच पान टपरी जवळ आला पण ती दिसेना लवकर गेली असेल म्हणून पुढे गेला टॅक्सी मध्ये बसला परत काही तरी विचार मनात आला तो परत उतरून पान टपरीवर आला ती नव्हती तिथे .मग उद्या पासून नाही बघाच विषय संपला गेली उडत आणि निघून गेला.पण मनात तिचे विचार येत होते म्हणून तीला उद्या बघणार आणि परत कधीच नाही बघाणार. दुसर्‍या दिवशी कामावर जातानाच दिसली खूप वेळ बघत होता पण यावेळी घावला ईलीन त्याच्या मागे उभी होती खांद्यावर हात मारून बोली काय हि पायजे गजानन हो नाही नाही आणि पळून सरळ मेडीकल मध्येच गेला. आता तर त्याला घाम फुटला साला ठार मेलो आता ईलीन हि त्या मुलगीची मैत्रीन म्हणजे सौधाची तिने गजाननच्या डोळयातील काजळ टीपले होते आणि सौधाला तीने सांगीतले तो मुलगा आहे ना मेडीकल मधला तो तूझाकडे बघतो मी बघितल त्याला खुप हुशर बघत होता नविन बकरा सापडला मेडीकलवाला तूला सौधा आ ग घाबरा आहे तो बघितलं कुठल्याही बाईला तर पळतो सोड त्याचा विचार ईलीन खर बोलतो तूला खूप वेळ न्याहाळत होता

गजानन कोंडल्या वाणी दिवस घालवत होता त्या दिवशी बस पकडून पळाला दुसऱ्या दिवशी सुट्टी टाकली पण दिवश नकोशा वाटे मग निघून गेला तिकडे काय होईल ते होईल बघू.......

 पण सौधा तिथे नव्हती ती दुसरी कडून बघत होती हा गेला मग थोड्या वेळाने परत आला तेव्हा टपरीवरी सिगारेट पेटवत उभी असणारी सौधा त्याच्याकडे बघून हासली गजानन चपापला आणि त्याने तिथून धूम ठोकली तीला खात्रीच पटली की हा बघतो सौधा डांन्स बार मध्ये नाचणारी होती बाकी पण उद्योग होते उठाठेव पण प्रेम म्हणजे भोग कोणी हि येतो मजा घेतो निघून जातो नजरेने स्पर्श करणारा गजानन आवडू लागल तीला म्हणून त्याच्याबरोबर बोलत नसे आणि हा पण नव्या नवरीसारखा लाजणारा थांबत नसे .मग ईलीन ला बोला मला छान वाटते पण सांगू नको तीला सौधाला कळले कि ओरडे त्याला या पापत नाय ओडायचा तो बर्बाद होईल त्याला सांग नांद सोडून दे किती हि पैसे दिलेस ना तरी तूला नाय मिळणार मग काय गजाननच्या मनात भरत गेली

 नाही म्हणता म्हणता एकदा भेटलीच 

भेट तूझी पहिली सांगावी माला 

सजना सात तूझी भेटावी पुन्हा पुन्हा 

हादरून जावे मन मुखातू शब्दच फुठेना 

बोलताना मी माझ्यात काही नसेना

तुझ्या नकारने सावरेन 

तूझ्या होकाराला उत्तर सापडेना

उभे अयुष्य तूझ्यासाठी 

या पहिल्या भेटीत बांधलेल्या

 मी सोनेरी या रेश्म गाठी....

त्यांने ईलीन ला सांगितले भेटाच आहे मला आणि सौधा हो बोली पहिली भेट कोणी विसरत नाही मरे पर्यंत गजानन भेटण्यासाठी गेला सौधा आधीच येऊन बसली होती तिथे 

गजानन माप कर मी लेट झालो .सौधा हिते कसाला बोलवलस गजानन का ? सौधा नाही काय नाय बोल तू गजानन काय नाय तुझ्याकडे बघताना छान वाटत सौधा हि बाग खूप छान आहे आवडली मला कोणी तरी पहिल्यांदाच बागेत बोलवल हाॅटेल खूप बघितलेत बाग पहिल्यांदाच सौधा तूझ नाव ना ईलीने सांगितले छान नाव आहे आरे ते माझ्या आईने ठेवले आहे ती रोजच सौधा करी मला हा धंदा न मिळावा म्हणून पण जावदे नाव ठेवल सौधा मी ऐवढी बोलत नाही पण तू रोज पाहतोस आणि पळतोस बर वाट माझ्यावर प्रेम करतोस ना पण नको करू मी प्रेम नाही मानत काम झाल पैसा फेको आपला रस्ता वेगळा त्याचा वेगळा कळल. गजानन किती पैसे देवू तूला सौधा साला तू पण तसाच तूझे पैसे नको मग जाऊया कुठल्या हाॅटेला ती उठली पण हा गप्प बसला काही बोला नाही.मी असा म्हणजे सौधा काही नाही रे. गजानन परत केव्हा तरी जाऊ ती बर झाल आणि न थांबता निघून गेली .तो तिथेच थांबला आपण का विचारल पैसा बदल हे आकर्षणच आहे ना काय कळेना आणि तिथून निघून गेला सौधा ईलीन जवळ गेली आणि वेडा आहे तो कशाला घेऊन बाग मध्ये गेला हाॅटेल वर घेऊन जायचे होते तर ईलीन आग एक महिन्या पासून बघतोय मला छान वाटतो आवडतो खूप तो पण तशाच निघाला किती पैसे घेणार बोला आता तेला सांग सौधाचा सौधा प्रेमाचा धंदा होत नाही एक रांडेचे प्रेम कोणाला भेटत नाही बिस्तर गरम करून पाळणार प्रेम माझ नाही...परत कधीच बघू नकोस ईलीन आग तू कोळसा वाली आहेस फुलवाली नाहीस त्यात त्याच काय चुकल आपला धंदा काय हे नाही माहित तूला

ईलीन मेडिकलवर गेली त्याला बाहेर बोलवून घेतला काय रे बोक्या फसवलस का सौधाला नालयक परत दिसलास ना तर नागडा करून मारीन निघ हितून गजानन काय झाल पैसे विचारले म्हणून प्रेम नाही माझ तीच्यावर कळल का. ईलीन 

आरे ती तूझ्यावर प्रेम करते का आवडतोस तीला तू हे माहित नाही गजानन निघून गेला कामावर

हि गाळ्यात पडणार वाटतय आता काम सोडून गावाला जायचे आयला आकर्षक पण नको आणि प्रेम पण नको. मामाला फोन केला माझी टिकीट काढ मी आज गावी जातोय आरे काय झाल काही नाही मला जायच आहे बस तू काढ टिकिट काही विचारू नको मला जायच आहे फोन ठेवला 

मॅडर वाढणार कोणाला काही समजल नाही पायजे निघून जाऊ मग सगळ पॅकिंग करू लागला. मामी ला सांगितल माझी ट्रेन आहे मी लवकर निघणार आहे मामाला परत फोन केला काय झाल टिकीटाच सांग मला आरे नाही भेटली बर ठिक आहे मी बघतो आणि निघाला आरे थांब मी येतो तूला घालवाय बाळा नको मामा मी जाईन बाय.आणि घरातून निघून गेला 

दुसर्‍या दिवशी गल्लीत गोंध्या सगळ्यांना बोलत होता गजानन चा कोणाला फोन आला होता का आरे तो आजून गावाला पोचला नाही.गल्लीतील चार जण स्टेशन वरून शोधून पण आले पण भेटला नाही पोलिसांन मध्ये कळवले सर्व शोधाशोध कारण तो कोणाला काहीही सांगत नसे मूलगा ट्रेन मधून पडला असेल वैगरे सर्व बोलू लागले . 

पंधरा दिवसानंतर गजानन एका मुली सोबत गावाला पोचला ती सौधा होती गजानन ने देवळात लग्न केल अस सर्वांना सांगितल.माझ्या बाॅसची मुलगी आहे म्हणून बाहेर लपलो होतो

एका दिवसात अस कोणती प्रेम कथा वाचली त्याने की लग्नच करून टाकल...

म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ

प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ

उधळून दे तुफान सारं मनामध्ये साचलेलं

प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं

कुसुमाग्रजांची हि कविता सांगते प्रेम काही करू शकत फक्त विश्वास आणि हिम्मत ठेव

जेव्हा गजानन घरातून निघून गेला तेव्हा तो कुंभार वाडीत गेला ईलीन ला भेटला त्याने विचारले सौधा कुठे आहे मी गावाला जातोय माला शेवटच भेटाच आहे तीला ती अंधेरीला गेल्या उद्या येईल खर बोलतेस ना तू आरे खोट नाही बोलणार तूझ्याशी आई शप्पथ होरे बाबा मग तिथून निघून स्टेशन वर गाडीत चढला गाडी सूटली तरी भेटाव तीला वाटत होत आठवण येऊ लागली रडूच फुटले आता खात्रीच पटली आकर्षण नाही प्रेम आहे नाहितर तीचा विचार नसता आला तो रात्रीचा एक स्टेशनला उतरून तिथेच मुखाम केला स्टेशनवर बसलेल्या बाकड्यावरील सर्व सामन चोरीला गेल पैसे पाॅकिट सकाळी उठला तर काहीच साहित्य नाही मग आता फोन पण नाही परत मुंबई ला रवाना भुके पेक्षा सौधाला भेटायची ओड जास्त होती .ईलीने तीला सर्व सांगितले गजानन आला होता शेवट भेटाचे होत बोलत होता सौधा बर झाल न भेटता गेला आणि ती बाहेर रस्त्यावर येताच बघते तर गजानन समोर दिसला सरळ त्याच्याकडे जाऊन गावी गेला होतास ना कसाला परत आलास काय काम आहे त्रास देतोयस जा ना हितून गजानन लग्न करशील का माझ्याबरोबर.......

शारीरिक भोगा पेक्षा मनातील हुडहुडी जाणीवा प्रेम आहे ज्या गोष्टी मुळे त्रास होतो त्या मध्ये दुसरा सुखी आहे तर साथ द्यावी कोणाला न दुखवता....


Rate this content
Log in