पैशाचा बोलबाला
पैशाचा बोलबाला


चार तासांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर विपुलचा नंबर आला. चेकअप झाल्यावर डॉक्टरांनी औषधे दिली,. विपुल आणि विप्रा दीपक हॉस्पिटलमधून बाहेर आले. वाटेत फार्मसीनमधून सर्व आवश्यक औषधे खरेदी केली. आतापर्यंत दोघांनीही चहा पण पिलेला नाही. दोघेही भुकेले होते. विपुल म्हणाले - "चहा पिऊ." विप्राने कहा- “ हो,चला जाऊ”. दोघेही एका रेस्टॉरंटमध्ये गेले. इथली गर्दी पाहून दोघांनीही आत जावे की नाही याचा विचार केला त्यांना पाहून
मॅनेजर आला आणि त्या दोघांना म्हणाला, "सर, मॅडम कोपरात एक टेबल रिकाम आहे." हे ऐकून हे दोघेही त्याच्यामागे गेले. त्याने रिकाम्या टेबलाकडे इशारा केला आणि ते दोघे तिथेच बसले.
थोड्या वेळाने आदेश घेण्यास वेटर आला.थोड्या वेळात त्यांची दिलेली ऑर्डर आली .न्याहारीनंतर विप्रा हात धुण्यासाठी वॉशबेसनजवळ गेली. तिच्या कानावर काही शब्द पडले.
वेटर म्हणत होता - "तू कॉफी कशी बनविली?"
चहा / कॉफी बनवणारा - "काय झाले?"
वेटर - "तो बिचारा माणूस, कॉफी न पिताच गेला."
चहा / कॉफी बनवणारा - "मग काय झाले? गेला.,तर जाऊ दे न;
हे ऐकून विप्रला आश्चर्य वाटले. पण ती काही न बोलता तिच्या जागी येऊन बसली आणि त्यांच्या संभाषणानं तिला विचार करायला लावलं. तिच्या कानात तेच शब्द घुमत होते.
चहा / कॉफी बनवणारा वेटरला - "काय झाले, तुझ्या चेहरा का पडला आहे?"
दुसरा वेटर रागात - "हा ग्राहक कोठून आला माहित नाही? "
दुसरा वेटर रागात - "हा ग्राहक कोठून आला माहित नाही? "
चहा / कॉफी बनवणारा - "कोणाबरोबर भांडण झाले आहे?"
दुसरा वेटर - "तो पैसे देतो म्हणुन काय घाले ? त्यांचे गुलाम नाही"
चहा / कॉफी बनवणारा - " काय झाले ? काय प्रकरण आहे?"
दुसरा वेटर - "हे ग्राहक पण किती शेफारले किती रुबाब झाडतात, कधी थंड पाणी मागतात तर गरम चहा, कधी थंड लस्सी, मग न्याहारी. एक क्षणपण थांबायला तयार नाही . तोंडातून आर्डर निघताच सर्व काही समोर हवं असत.
मी कंटाळलो. चल लवकर आता साखर दे .ग्राहक ओरडेल.
चहा / कॉफी बनवणआरा - "कां नाही, पैसे देतात, ते फुकटात तर खाऊन निघून जात नाही "असं म्हणत त्याने साखर बाउल काउंटरवर ठेवली वेटर घेऊन तो गेले.
विपुल हात धुऊन, बाहेर आला आणि त्याच्या जागी बसली. बिल भरल्यानंतर दोघेही रिक्षात बसून घरी आले. दोघेही पूर्णपणे गप्प होते.दोघे घडलेल्या घटनेबद्दल विचार करत रहिले. मग विप्राने ऐकलेले संभाषण विपुलला सागितल . तीचे म्हणणे ऐकल्यानंतर विपुलने पण त्याने ऐकलेल संभाषण विप्रला सांगितल. त्यांच्या चर्चेचा एकच निष्कर्ष होता की जगात पैशाचे महत्त्व तृप्तिपेक्षा अधिक आहे. सेवा समाधानकारक आहे की नाही याला काहीच महत्व नाही . सगळीकडे पैशाचा बोलबाला आहे .