गाव
गाव
1 min
1.2K
हंगाम सरताच पाखरे
परत जाती त्यांच्या देशी ,
मग माणसं न परतल्याची
खंत का गावाच्या उराशी ,
दिवाळी दसरा रंग पंचमी
असो पोळा ,
आसवातच विरतो गावातील
माय बापाचा सोहळा ,
गावातील चौका चौकात जिथ
तरूणाई बसायची
तिचं तरूणाई जेरबंद झाली
शहरातल्या दहा बाय दहाच्या खोलीत ,
भविष्या पाई जिवणाची गुलामगीरी
उपभोगत असतात ते दर दिवशी ,
मग वाटत गावातील स्वातंत्र्यच
ओरबडुन नेलं शहरातील झगमगाटानं ,
हि शोकांतीका आहे कृषिप्रधान
भारताची जिथं उभारल्या जातात
मोठ मोठे कारखाने आपली भाकर
परकीयांच्या घश्यात घालुन ,
आजही वसान पडलेल्या
गावांना आस आहे की
हंगाम सरताच पाखरे
परत जाती त्यांच्या देशी ,
मग माणसं न परतल्याची
खंत का गावाच्या उराशी ,
