जाळाशिवाय कढ नाही
जाळाशिवाय कढ नाही
जाळाशिवाय कढ नाही
मायेशिवाय रड नाही
ही एक अस्सल ग्रामीण पारंपारिक म्हण आहे. याच्या शब्दांमध्येच अर्थ प्रतीत होतो.
म्हणजे जर तुम्हाला आमटी ,भाजी, वरण, हे काही शिजवायचं असेल तर! त्याला भरपूर जाळ पाहिजे. त्याशिवाय ती गोष्ट उकळत नाही.
म्हणजे जाळा शिवाय त्याला कढ येत नाही.
आणि बऱ्याच वेळा खोटं खोटं बेगडी ❤️,प्रेम दाखवणारी माणसे असतात.
पण जी खरी प्रेमाची असतात, किंवा ज्यांना खरी माया असते ती तुम्हाला काटा जरी टोचला तरी त्यांच्या डोळ्यात टचकन पाणी येते.
कारण तेवढी माया असते, तेवढा जीव असतो, म्हणून मायेशिवाय रड नाही.