STORYMIRROR

Surekha Nandardhane

Others

3  

Surekha Nandardhane

Others

खेळ सावल्यांचा ( भाग ५ )

खेळ सावल्यांचा ( भाग ५ )

3 mins
159

     कामावर सुयोगच अजिबात लक्ष लागत नव्हते .त्याला वेदीकाची काळजी वाटत होती म्हणून त्याने ऑफिस मधून सुट्टी घेऊन लवकर घरी गेला .


       -  -   -   -   -   -   -  -


             सुयोग दार वाजविणार तितक्यात दार उघडले . अनामीकला दार उघडताना बघताच सुयोग बोलला .अरे वा मी दार वाजवायच्या अगोदर तुम्हाला कसे कळले . ती त्याच्याकडे बघत हसली .


    वेदिका ला आवाज देत तो घरात गेला . 


     आज तू लवकर घरी आला .

  

   हो ग आज थोडं अस्वस्थ वाटत होते म्हणून सुट्टी घेऊन घरी आलो .


     ये तूला बरं वाटत नाही का ?


  हो ग मी ठीक आहे सुयोग बोलत रूममध्ये गेला .


 वेदिका ने चहा बनविला . एक कप अनामिका ला देऊन सुयोग व तिच्यासाठी चहा घेऊन रूममध्ये गेली .

 

   दोघेही चहा घेत बोलू लागले . सुयोग ने वेदिका ला विचारले अनामिका अजून गेली नाही का !

 

   अरे तिला ताप होता म्हणून मीच बोलले बरं वाटल्या शिवाय जाऊ नको . 


         तिला बरं नाही ती कुठे भटकेल म्हणून मीच थांबऊन घेतले . 

    

   अच्छा बरं केलं तिला थांबवून .माझी बबडी खुप समजदार आहे सुयोग तिचे गाल धरत रोमँटिक मुड मध्ये बोलत होता .


        ये आज छान गरमागरम भजी बनविते का . बाहेर थोडा गारवा आहे म्हणून खावीशी वाटली .


   हो बनविते ना .


  त्या दोघांचे बोलणे अनामिका ऐकत होती .ताई तुम्ही बसा गप्पा करत भजी मी बनविते .


   आग तुला बरं नाही भजी मीच बनविते .


   नाही हो ताई तुम्ही बसा आज माझ्या हातची भजी खाऊन बघा असे बोलत ती किचनमध्ये गेली .


        इकडे सुयोग आणि वेदीकाच्या छान गप्पा रंगल्या होत्या . त्यासोबत अनामिका ने बनविलेले भजी होते सोबतीला .


        तितक्यात मोहित चा फोन आला .

हॅलो . हा बोल ना मोहित कशी काय आठवण केली .

अरे एक ना आपल्याला इगतपुरी ला निघायचे आहे .

का रे काय झालं!


      निखिल ची तब्येत जास्त शिरेस आहे . ज्या वहिनी एकट्याच आहे व त्या खूप घाबरल्या आहे .त्या आता कुठे दुःखातून सावरू लागल्या होत्या आणि आता निखिल ची तब्येत बघून त्यांनी धिरच सोडला .


  तू विकास व अक्षय ला फोन कर मी आवरुन येतोच तिकडे .


असे बोलत सुयोग ने फोन बंद केला व आवरायला लागला .

 

   आवरत असताना तो वेदीकाशी बोलत होता .निखिल च्या तब्येतीबद्दल तो तिला सांगू लागला .


      हे बघ आम्ही सर्व निखिल कडे निघालो आहे परत यायला निदान दोन दिवस लागेल . पण तू स्वतःची काळजी घे जास्त कामे करू नको आणि हो अनामिकाला थांबून घे तुला सोबत होईल त्यामुळे मला जास्त काळजी वाटणार नाही .


     तू निश्चित जा माझी काळजी करू नको आणि हो कितीही घाईत असला तरी मला कॉल करायला विसरू नको .


    हो मी तसा प्रयत्न करेलच .


  अनामिका तिथे जवळच उभी होती . सुयोग अनामिकाला ही वेदिकाची काळजी घ्यायलासांगत होता .


  तुम्ही नका काळजी करू मी घेईल वेदीकाची काळजी .


       वेदिकाला बाय करत सुयोग निघाला . वेदीकाच्या मागे अनामिका ही उभी होती तिने ही हात हलवत त्याला बाय केले .


       सुयोग . विकास . मोहित .अक्षय व निखिल हे शाळेपासून खूप जीग्री मित्र होते . खुप घट्ट मैत्री होती त्यांच्यात .

 शाळेपासून ते कॉलेज पर्यंत त्यांनी सोबत शिक्षण घेतले 

सुयोग आणि विकास एकाच ऑफिस मध्ये कामाला होते .

 बाकी वेगवेगळ्या फिल्ड मध्ये कामाला होते निखिल मात्र सर्वांपासून लांब होता . पण त्यांच्यातली मैत्री प्रेमअजूनही कमी झाली नव्हते .


       ते चौघे ही निखिल कडे निघाले ड्रायव्हिंग मोहित करत होता . मोहित ड्रायव्हिंग करण्यात तरबेज होता कुठल्याही लांबच्या प्रवासात तोच गाडी चालवत असे .


        त्यांचे चौघांचे बोलणे चालू होते . काही महिन्यांपूर्वी कार अपघात मध्ये त्यांनी त्यांचा मुलगा गमावला होता .


 निखिल च्या म्हणण्यानुसार त्या अपघाताला कारणीभूत ती महिलाच होती .

  

    निखिल व त्याची पत्नी जया आपल्या मुलाला घेऊन देवीच्या दर्शनासाठी चालले होते . गावाच्या बाहेर निघाल्यावर त्यांना हायवे लागला .


   रात्रीची वेळ व पाऊस चालू असल्यामुळे रस्त्यावर एखादी गाडी धावायची .


   रात्रीच्या काळोखात निखिल ही गाडी वेगाने चालवत होता . त्याने अचानक गाडीचा ब्रेक लावला ……

(क्रमशः)


Rate this content
Log in