बळकट लोकशाही
बळकट लोकशाही


लोकशाहीत जात, धर्म, पंथ, भाषा, प्रदेश याचा स्वीकार न करता ,बुद्धिमान व उच्च शिक्षण घेतलेले लोक असावेत. वास्तव, चिकित्सक, वैद्न्यानिक दृष्टिकोण यावर भरोसा ठेवणारे, मानवतेचा विचार जतन करणारे, प्राणिमात्रावर दया दाखवनारे व विश्व विचार असणारे ,राजकीय लोकनेते असावेत तरच सर्व मानवजातीचा विकास होईल .लोकशाही यशस्वी होईल. राजकारणात सर्व जाती धर्माचा समावेश असावा. सर्व जाती धर्माच्या महिलांना राजकारणात आरक्षण असायलाच पाहिजे.समाजसेवक ही त्याच विचारांचे असावेत.मानव हाच विकासाचा केंद्र बिंदू असावा.नेता जनतेसाठी असावा. फक्त स्वार्थासाठी नसावा.जनतेने जनहिताची कामे पाहून मतदान निर्भिडपने करा.अन्यथा आपल्या हक्काची त्याना किंमत कळणार नाही.जात, प्रांत , धर्म, नाती ह्या गोष्टीला स्थान न देता, जनसेवक लोकप्रतिनिधी लोकशाहीत निवडून दया. सर्वधर्म पालन करावे. लोकशाहीत मतदान हे दान झाले पाहिजे. ते विकले जाऊ नये.