आजची स्त्री सुरक्षित आहे का?
आजची स्त्री सुरक्षित आहे का?
ती आई आहे . ती बहिण आहे
ती पत्नी आहे . ती मुलगी आहे
आयुष्याच्या प्रत्येक सुखदुःखात
सोबत असनारी ती एक स्त्री आहे .
हे सर्वांना माहीत आहे . पण हेच काही व्यक्ती हे कुठपर्यंत मानतात .?
स्त्री ही स्त्री असते ती प्रत्येक रुपात प्रत्येकाच्या सुखदुःखात खंबीरपणे सोबत असते तरी ही तिला अबलाच मानल्या जाते .
" आजची स्त्री पूर्वीच्या स्त्रियांपेक्षा सुरक्षित व स्वावलंबी आहे का ." ?
विषय खरंच खुप सुंदर आहे .
हो . आजची स्त्री ही स्वावलंबी आहे पण सुरक्षित नाही. पूर्वीच्या काळात मुलींचे बालपणी लग्न व्हायचे त्या अशिक्षित . मोठे कुटुंब त्यासाठी त्यांना खुप राबवले जात .
त्यांना स्वातंत्र्य नव्हते पण त्या सुरक्षित होत्या . त्यांना कसली भीती नव्हती कारण त्यावेळेस हुंडाबळी व बलात्कार होत नव्हते .
काळ बदलत गेला आणि स्त्री शिक्षणाकडे वळाली .त्या शिक्षण घेत यशाचे ध्येय गाठत गेल्या . त्या स्वावलंबी झाल्या पण सुरक्षित नाही .ती उंच झेप घेण्यापूर्वी च काही समाजकंटक पंख छाटायला तयार असतात .
" स्त्रीला स्वातंत्र्य मिळाले . पण कुठे "?
बऱ्याच ठिकाणी स्त्रीचे असित्व अजूनही चार भिंतीत दडपले आहे .
आजही स्त्री घरात समाजात सुरक्षित नाही .
विनयभंग . हुंडाबळी .बलात्काराच्या शिकार होऊन कित्येकांना आपला जीव गमवावा लागतो .
स्त्री आहे म्हणून विश्व आहे
घराला घरपण आहे
नात्यात जिवंतपणा आहे
कोणत्याही नात्यात तिचा सन्मान करा
हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे ।
