पान आयुष्याच......
पान आयुष्याच......
1 min
543
पान आयुष्याच वाचायला
घेतले हाती
तेव्हा कळाल मला
किती महत्वाची असतात नाती...
कितिही दुर असलो तरी
आठवण येते क्षणोक्षणी
एकांतात शांत बसून
डोळ्यातून निघते पाणी...
लोकांच्या मनातील विचारांची पाने
असतात नेहमीच भरलेली
त्यातील चांगले वाईट शब्द
मनावर आपल्या जातात कोरली....
मित्राच पान हे नेहमीच
ठेवले आहे कोरे
त्यासाठी शब्द नाही सुचत
कारण ते आहे खरे ......