जाणीव
जाणीव


मित्रहो आज खूपच वेगळा दिवस आहे त्याची महती खूप मोठी आहे आजच्या दिवसातील , 2 महत्वाच्या घटना ह्या आपल्या साठी खूपच प्रेरणादायी आहेत त्यात पहिली घटना म्हणजे आज भारतात पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी झाल्या तो दिवस आणि दुसरी महत्वाची घटना म्हणजे आप च्या पक्षाचे अरविंद केजरीवाल हे3 ऱ्या नंदा मुख्यमंत्री होत आहेत
ह्या घटना कर्तृत्ववान वयक्ती च्या बाबतीत आहेत कारण ह्या असामान्य वयक्ती नि कर्तृत्व सिद्ध केले संघर्ष केला आणि यशाचं उंच शिखर प्राप्त केले.
ही एक बाजू दुसऱ्या बाजूला करोना ची भीती महिलांना सुरक्षित जगण्याची भीती अवकाळी पावसाची शेतकऱ्यांना भीती विद्यार्थ्यांना परीक्षेची भीती कामगार मालक नोकर राज्यकर्ते सगळ्या ना भीती
मग थोडा आपण विचार करूया त्या निष्प्रभ निष्पाप ऑस्ट्रेलिया मध्ये अचानकपणे लागलेल्या आगीच्या भक्ष्य स्थानि पडलेल्या त्या एक कोटी प्राणी पक्षी ह्यांचा काय दोष होता त्यांचा कोणतं पाप होत जळणाऱ्या अमेझॉन जंगलात जळालेल्या त्या वनस्पती आणि जीव ह्यांच ह्या मध्ये एकच गोस्ट नक्की की जेव्हा तुमचा विनाश येतो तेव्हा संघर्ष करण्यासाठी तुमच्याकडे ताकद नसते म्हणून तुम्ही हतबल होऊन पराभव स्वीकार करत असता
मग एक विचार नेमका करुयाकी फक्त सुख आणि पैसे ह्यात आनंद शोधणाऱ्या सामान्य दुनियेत आपण एक क्षणभंगुर आयुष्य जगत आहोत विनाश आपण ओढवून घेत आहोत कारण स्वार्थासाठी आपण आपल्या वरती आक्रमणं करतोय कधी तरी स्वतः च्या आतील मनाला एकच विचारा मरायचं आहे तर संघर्ष कशाला जगायचं आहे तर ताण तणाव कशाला
एकच बोध घेऊ स्वतः जगू आनंदात सहभागी होऊ, दुसऱ्या च्या दुःखात न सुखात फक्त हाव हव्यास नको स्वातंत्र्य मिळाले आहे त्यात स्वैराचार नको. आपल्या मुळे दुसऱ्या ना दुःख नको मग एकच गोष्ट दिसेल न कोणी रुसले फक्त दिसले की मनापासून हसेल