vaishali vartak

Children Stories Children

2  

vaishali vartak

Children Stories Children

बालपण

बालपण

4 mins
53


बालपण काल नातीच्या शाळेत कॉन्सर्ट होता .त्यामुळे त्या कॉन्सर्ट प्रोग्रामा ला गेले होते. लहान मुले छानच परफॉरम करत होती. मुलांपेक्षा त्यांचे पालकच फार उत्साहात होते ..मुले पालकांकडे पहात परफॉर्म करत होती तर मधेच इकडे तिकडे पहात हाताने एॕकशन आणि नजर कुठे तरी भिर भिरती होती . कोरिओग्राफर बिचारी मनापासून मुलांच्या कडे तोंड करून, त्यांना कसे करावयाचे ते दाखवीत होती . फार मजा वाटत होती तो सर्व प्रकार पाहून. छाया चित्रणे घेण्यात पालक दंग होते . केवढे ते फोटो , किती वेळा ,..so sweet ,.. so cute वगैरे शब्द कानावर येत होते . मी त्या निरागस बालकांकडे पाहता पाहता मला माझी बालपणातील मुले दिसू लागली . योगायोग असा की ज्या बालमंदिरात मी जात होते त्याच बालमंदिरात माझी मुले पण शिकली होती . त्यामुळे विचारांच्या तंद्रीत मी गुंतत गेले . दोरीचे रीळ उलगडावे तसे काळाचे रीळ उलगडत गेले . मी मुलांच्या काळातून ,आपल्या स्वतःच्या काळात मी मला विचारांच्या तंद्रीत पाहू लागले. त्यावेळचा, त्या काळातला वार्षिक उत्सव अंधुकसा आठवणीत आला. हो ! बरे आठविले. बालमंदिरावरून .... .त्या बालमंदिरात जाताना, मी जेवढा त्रास दिला होता ना त्या काळात आई बाबांना ! तेवढा माझ्या मुलांनी पण ,मला ...त्रास दिला नव्हता . मी एकतर फार आजी वेडी होते . आणि आजी पण नेमकी जून महिन्यात तिच्या भावाकडे गेल्याने सुरुवातीस मी बालमंदिरात जाण्यास फार कटकट केली होती. अजूनही मला ती स्मरते , आठवते ... आणि आई पण सर्विसला शाळेत जावयाची ..तर मी बस स्टॅन्ड पर्यंत तिच्या मागे पळत जायची . मला पकडून पकडून आणावयाचे . पण आजी आली व मग माझी गाडी रुळावर आली . नाहीतर नुसता खाऊचा डबा खाऊन घरी जायचे म्हणायची . पुढे शाळेतील तिसरी वा चौथीतील गोष्ट असावी . माझी शाळा घराच्या अगदी जवळ होती. जसे बालमंदिर जवळ होते . त्यामुळे सोडायला व घ्यायला येणे भानगड नव्हती . शाळा प्रायमरी म्युनिसिपाल्टीची व हायस्कूल फक्त महाराष्ट्र शिक्षण मंडळ चे . सर्व मराठी लोकांसाठी एकमेव एकच होते .. प्रायमरी शाळा मावळंकरांच्या जुन्या वाड्यात भरायची . एक ते सातवी पर्यंतचे वर्ग चालायचे . मुनिसिपाल्टीच्या प्रायमरी शाळा बऱ्याच आहेत . बऱ्याच एरिया प्रमाणे , आमच्या शाळे च्या बाजूला छोटी दुकाने जेथे गोळ्या , पेपरमिंट , बोरे , विलायती चिंचा घेऊन बाई बसायची . मुली तिच्या कडून विकत घ्यायच्या . माझ्या बाल मनास पण विकत घेण्याचे मन झाले . आई बाबा आमच्या घरी पैसे कधीच कडी कुलूपात ठेवत नव्हते . स्वयंपाक खोलीत एक भिंतींतले कपाट होते .त्यात एका पातेल्यात पैसे ठेवले असायचे . एकतर आजी घरात असायची व घरात दुसरे कोणी येणारे जाणारे नसायचेच. . तेव्हा मी सहज त्या पातेलीतून आजीला न सांगता २ पैसे तर कधी ३ पैसे घेत गेले. व कधी गोळी तर कधी काही विकत घेतले . एक दोनदा तर आजीला पण आणून दिले . तिने विचारले ,"अग तुझ्या जवळ कुठून आली गोळी तर चक्क मैत्रिणींनी दिली असे खोटे सांगितले. असे ३/४ वेळा केले असावे .. तरी आजी म्हणायची अग शाळा सुरु होताच तुझ्या मैत्रिणी बरे विकत घेतात, तर मी चक्क म्हणाली , " हो ना . ,कारण त्या लांबून येतात ना .... ".. . पण एकदा वर्गात ,मराठी विषयात गुरुजी म्हणी शिकवत होते . त्यात एक म्हण शिकवण्यात आली ".झाकली मूठ सव्वालाखाची " गुरुजींनी त्यावेळी काय अर्थ शिकविला तितका लक्षात नाही . पण, माझ्या मनाने मला समजविला शिकविलेला ,अथवा मनाने घेतलेला अर्थ असा की जो पर्यंत चोरी उघडकीस येत नाही तोवर ठीक आहे . आपण पैसे न विचारता घेतले आता अशी चूक करता कामा नाही . आणि त्या दिवसा नंतर मी कधीच न सांगता पैसे घेतले नाहीत. खरच शिकवण , शिक्षण कसे माणसास घडवते हे त्या म्हणींचे ज्वलंत उदाहरण आहे. पुढे प्रायमरीत असतांना ची गोष्ट . दूरच्या मैत्रीणी शाळा सुरु होण्या अगोदर त्यांच्या बस च्या सवलतीने availability प्रमाणे यावयाच्या . माझे तर घर शाळे जवळ , त्यामुळे अगदी शाळा सुरु होण्याच्या वेळेवर मी जावयाची. दूरच्या मुली शाळेच्या आवारात ,वाड्याच्या बाहेर बसल्या असायच्या . त्यातील एका मैत्रिणीचे वडील शाळेच्या जवळ असलेल्या बँकेत सर्विस ला होते , ती नेहमी रिसेस मध्ये पाणी पिण्यास त्यांच्या बँकेत जावयाची. व ती कशी जाते ,तेव्हा दारांत शिपाई ( त्या काळात माहीत नव्हते त्याला सिक्युरीटी गार्ड म्हणतात ) कसा उभा असतो , बँकेत कसा थंडावा असतो ,मी बाबांकडे गेल्यावर कसे चपराशी पाणी आणून देतो. वगैरे खूप खूप वर्णन करून सांगायची . व मला विचारायची यावयाचे आहे का बँकेत पाणी पिण्यास.? पण त्या पाणी पिण्याच्या मोबदल्यात तुला माझा गृहकाम बाकी असेल तर करून द्यावा लागेल. मी किती तरी वेळा त्या बँकेत पाणी पिण्याच्या लालसेने तिचा गृहकाम करून दिला होता . तेव्हा कोठे माहित होते. पुढे ३१ वर्ष त्याच बँकेत पाणी पिणार होते पण तो केलेला गृहकाम मात्र छानच फळला म्हणायचा . असे बालपण कधी अभ्यासासाठी बोलणी खाण्यात ... .कारण swimming ने अभ्यास कमी व्हायचा तर आई बाबांवर चिडून बोलायची . काय पोहण्यात पारितोषिके मिळविते तर तिला डोक्यावर चढवली आहे . अभ्यासाकडे ती लक्ष देत नाही.... आणि असेही मुली बाबांच्या लाडक्या असतातच. ना ! माझ्या बाबतीत तेच व्हायचे. असे "बालपण " आंबट गोड आठवणीत कधी सरले कळलेच नाही . उगाचच का म्हणतात, "बालपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा".


Rate this content
Log in