vishwanath shirdhonkar

Others

4  

vishwanath shirdhonkar

Others

मराठी कथा - नावात काय आहे ?

मराठी कथा - नावात काय आहे ?

11 mins
15.9K


लक्ष्मीपूजनाची वेळ आली . सर्व उत्सुकतेने वाट पाहत होते की नवीन नवरीचे काय 

नाव ठेवण्यात येते . खरं तर नुकतीच पंचविशी गाठलेल्या कुमारी निशा गोरेचे लग्न 

श्रीयुत रवि काळे बरोबर होणे हे काही ' लव्ह मेरेज ' वगैरे नव्हते . नावात आणि 

आडनावात कितीही विरोधाभास असला तरी हे लग्न दोघांच्याही घरच्यांच्या संमतीने व पसंदीने ठरलेले , ' अरेंज्ड मेरेज ' होते . ठरल्याप्रमाणे सर्व सुरळीत चालले होते व आता शेवटचा अंक रंगला होता . 

- सौ.कां. कुमारी निशा गोरे म्हणजे शिक्षणात खूप हुशार अशी आपल्या आई वडिलांची 

एकुलती एक लाडकी लेक होती . लहानशा खेड्यातली राहणारी सुंदर , देखणी , आणि 

नाजूक सौ .कां . कुमारी निशा गोरे , पुणे शहरात एका मल्टीनेशनल कंपनीत कामाला 

होती . आई वडील खेड्यातले असले तरी त्यांनी सौ .कां .कुमारी निशा गोरेची प्रत्येक 

हौस पुरविली होती , या मुळे सौ . कां . निशा गोरे थोडी जास्तच लाडावलेली होती . 

गांव खेड्यातून आली असली तरी पुण्याचं हवामान तिला बरंच मानवलेल होतं , आणि शहरातल्या रंगात रंगायलाहि तिला फारसा वेळ लागला नाही .  

- तर अशा या सौ . कां . निशा गोरेची लग्ना पूर्वी आपल्या होणाऱ्या नवऱ्याशी म्हणजे श्रीयुत रवि काळेशी जेमतेमच भेट झाली होती . सकाळी बघण्याचा कार्यक्रम झाला व संध्याकाळी साखरपुडा उरकला गेला , आणि मुलगा लगेच परदेशात जाणार म्हणून दहा दिवसातच लग्नाचा बेत ठरला . साखरपुड्याच्या दिवशी सतत तिला कोणी न कोणी घेरूनंच होतं म्हणून  तिला श्रीयुत रवि काळेशी धड बोलताहि आलं नव्हतं . त्या दिवशी तिला श्रीयुत रवि काळेला बरंच काहीं विचारायचं होतं . तिच्या बऱ्याच अटी तिला श्रीयुत रवि काळेला सांगायच्या होत्या . म्हणजे जसं  स्वयंपाक करणार नाहीं , धुणं धुणार नाहीं , केर वारा , जागा पुसणे , व कोणतेही घर काम करणार नाहीं . सासू सासऱ्यांची सेवा करणं जमणार नाहीं . वगैरे वगैरे . या शिवाय तिला एक दुसऱ्यांच्या आवडी निवडी , आणि एक दुसऱ्यांच्या स्वभावा बद्धल पण सविस्तर बोलायचं होतं . पण हे शक्य न झाल्याने ती थोडी फार नव्हे तर जास्तचं अस्वस्थ होती आणि  तिच्या मनात सारखी एक हुरहूर होती . बरं , लग्न सोहळा गावांत करण्याचे ठरले असल्या मुळे , तयारी करण्यासाठी ,लगेच पंधरा दिवसाची रजा काढून तिला आई वडिलांसोबतच गावाला जावेच लागले . या सगळ्या बाबतीत विरस झाल्या मुळे ,एकूण काय सौ . कां . निशा गोरेच्या चेहऱ्यावर , लग्न मंडपात एकाच वेळी अनेक भाव तरंगत होते . 

- आई वडिलांच्या लाडात वाढली असली तरी सौ कां निशा गोरे ही फार स्वाभिमानी मुलगी होती . वयाच्या इक्विसाव्या वर्षीच नोकरी करून आत्मनिर्भर झाली व आत्मविश्वास आणि स्वाभिमान जास्तच वाढला . पण इतकं असूनही अद्याप तरी  ती आईवडिलांच्या धाकात होती .म्हणून पटकन लग्नालाहि तयार झाली . पण असं असलं तरी तिचं आपलं स्वतंत्र जग होतं , स्वतंत्र व्यक्तिमत्व होतं , स्वतंत्र अस्तित्व तर होतचं . आणि विशेष म्हणजे ती आपल्या मतांवर ठाम असायची .  

- मैत्रिणीशी कधी चर्चा होत असता मैत्रिणींना तिचे विचार कळायचे . एकदा शाळेत असताना , ' स्त्री मुक्ती साठी स्त्रियांनीच पुढाकार घ्यायला हवा ' या विषयावर स्पर्धेत निशा गोरेनी भाग काय घेतला , व तिला बक्षीस काय मिळाले , तिचा पुरुषांकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला .पुढे महाविद्यालयात देखील ती स्त्री मुक्तीचा झेंडा फडकावू 

लागली . स्त्रियांवर अत्याचार हा आता तिचा आवडता विषय होत चालला होता . पुढे ती स्त्री चळवळीच्या क्षेत्रात कार्यरत अनेक संगठनांबरोबर जुळली . 

- कु . निशा गोरेचे विचार मैत्रिणींमध्ये वेगवेगळ्या चर्चेचे विषय असायचे . मग वाद हि व्हायचे . ' तुझ्या  इतक्या प्रयत्नानंतर देखील खऱ्या अर्थाने स्त्रियां अद्याप हि स्वतंत्र व विकसित नाही , मग तुझा काय उपयोग ? 'असे म्हणून तिच्या मैत्रिणी तिला सारख्या चिथवत असे . मग कु. निशा गोरे अगोदर चिडायची , मग भडकायची , पण शेवट मात्र सर्वाना समजविण्याने आणि गोडी गुलाबीने व्हायचा . मग चर्चा परत आणखीनच 

रंगायची , सर्व विषयांना वेगवेगळे फाटे फुटायचे , व कु. निशा गोरे आपले विचार ठामपणे मांडायची . ' स्त्रियांना पुरुषांच्या कचाट्यातून स्वत:च मोकळं व्हावं लागेल . स्वत:चे स्वातंत्र्य बळकवावे लागेल . हे स्वातंत्र्य किती टक्के आणि कितपत हवे आहे , जेणे करून प्रत्येक स्त्रीला समाजात सन्मानाने जगता येईल याचा सारासार विचार प्रत्येक स्त्री ने खुद्द  आपल्या पुरता करावा . ' ती सर्वाना सतत सांगायची

- एकदा एका मैत्रिणी बरोबर कु. निशा गोरेचा असाच खूप वाद झाला . त्या मैत्रिणीनी तिला चिडून विचारले , " काय ग निशा , सारख्या सारख्या स्त्री स्वातंत्र्याच्या गोष्टी काय करत असते तू ?प्रत्येक गोष्टीची एक सीमा असते . तुझा आपला एकच पाढा . कंटाळा आला आहे तुझ्या एकाचएक गोष्टीचा . अग मला सांग , लग्नानंतर तू कुठं स्वतंत्र राहणार आहे ? तुझं अस्तित्वच बदलून टाकेल तो पुरुषांचा समाज , ती पुरुषांची  सत्ता आणि पुरुषी अहंकार . अग तुझ तर नाव सुद्धा बदलून टाकतील ते सर्व . ओळख हि बदलून टाकतील . तुझी स्वत:ची अशी वेगळी ओळखंच राहणार नाही . मग तेव्हा काय करणार आहेस तू ? "

- बस झालं . त्या दिवशी पहिल्यांदाच कु. निशी गोरेला रात्रभर झोप लागली नव्हती . त्या रात्री पहिल्यांदाच तिच्या मनात लग्नाचाही विचार आला . पुरुषाचे महत्व जास्त कां  स्त्री चे महत्व जास्त ? असलं  द्वंद रात्र भर सुरु होतं . मनातलं विचार मंथन काही केल्या थांबेच ना . अनेक प्रश्न मनात निर्माण होत होते , आणि उत्तर तिला सापडत नव्हते . लग्न झाल्यावर मुलीच सासरी कां जातात ? ईश्वराने स्त्रियांनाच मात्रत्वाच्या 

यातना कां दिल्या ? स्त्रीनेच चूल आणि मुल कां सांभाळावे ? पुरुषांच्या वाट्यात हे सगळे का नसावे ? समाज पुरुष सत्तात्मकचं का आहे ? सर्व महत्वपूर्ण निर्णय पुरुषचं कां घेतात ? मुलांना बापाचे नावंच का दिले जाते ? लग्न म्हणजे स्त्रीचं अस्तित्व व स्वातंत्र्य संपणं असतं का ? लग्न म्हणजे स्त्रीची ओळख कायमची पुसली जाणं असतं कां ? माझ्या हि बरोबर हे सर्व असचं घडणार आहे कां ? जर पुरुषाची ओळख समाजात तीच राहते , तर मग लग्न झाल्याने स्त्रीची ओळख का बदलली जाते ? तिचं तर नाव सुद्धा बदलतात . 

नाही नाही हा स्त्रीचा अपमान आहे . असं चालणार नाही . मी असं होऊ देणार नाही . कु. निशा गोरे चवताळली , ' लग्ना नंतर मी माझं  नाव बदलू देणार नाही .' कु .निशा गोरेनी

सूर्योदयाच्या अगोदर जणू शपथचं घेतली , ' वेळ आली तर नवऱ्याला त्याचे नाव बदलायला भाग पाडेन .' हा निर्धार झाल्यावरच कु. निशा गोरेला पहाटे का होईना स्वस्थ झोप आली .   

- - श्रीयुत रवि काळेच्या हातात अंगठी होती . चांदीच्या ताटात असलेल्या तांदुळात , त्यानं ठरविल्या प्रमाणे त्याचे आवडते नाव तो अंगठीने कोरणार होता . तेवढ्यात सौ . कां . निशा गोरे ( भावी काळे ) त्याला म्हणाली , " थांब. "

- श्रीयुत रवि काळेनं एक क्षण सौ . कां . निशा गोरेकडे बघितलं . 

- " माझं नाव बदलायचं नाही . "

- श्रीयुत रवि काळे गोंधळला . 

- " चांगलं गोरे आहे . काळे करण्याची गरज नाही . " सौ . कां . निशा गोरेने लग्न मंडपात जणू एकादा बॉम्बच फोडला .

- श्रीयुत रवि काळे चपापला . त्यानं आपला हात मागे घेतला आणि आपल्या आईकडे बघितलं . 

- " काय म्हणते सुनबाई तू ? अगं, लग्ना नंतर तर प्रत्येक मुलीला आपलं नाव बदलावचं लागतं . " सासूबाईना वाटलं हत्ती गेला अनं शेपूट राहिली . 

- " मला माझी ओळख बदलता येणार नाही . मला लोकांनी  निशा गोरे म्हणूनचं ओळखायला हवं . " सौ . कां . निशा गोरेला एका पहाटे सूर्योदयाच्या पूर्वी  घेतलेली आपली शपथ आठविली . 

- " म्हणजे ? " आता श्रीयुत रवि काळे थोडा गोंधळला  .

- " म्हणजे , माझं नाव बदलायचं नाही . " न घाबरता  सौ . कां . निशा गोरे म्हणाली . 

- " आणि आडनावं ? " सासूबाईला आता राग आला होता . 

- " ते हि बदलायचं नाही . " तितक्याच ठामपणे शांत गंभीर स्वरात सौ . कां . निशा गोरे म्हणाली .

- " हे कसं शक्य आहे ? " आता श्रीयुत रवि काळेच्या आईनी सौ.कां .निशा गोरेच्या आई कडे बघितलं . 

- " अगं पोरी तू हे काय म्हणते ? " आता सौ . कां . निशा गोरेचे वडील पुढे आले .  

- " बरोबर आहे बाबा . मी माझं नाव आणि आडनाव बदलणार नाही . लग्न नावाचे नावाशी नाहीं , आणि आडनावाचे आडनावाशी हि नाहीं . लग्न एका मुलाचे एका मुलीशी होत आहे . " सौ . निशा गोरे ने वडिलांना हि तेच उत्तर ठामपणे दिलं . 

- " हा काय नवीन प्रकार आहे ? " आता गुरुजी मध्ये पडले , " अगं पोरी लग्न म्हणजे दोन घराण्यांचे संबंध जुळतात . कुटुंबाचे कुटुंबाशी च नाती जुळतात ."

- " ते सर्व जुनं . " सौ . कां . निशा गोरे हि मागार घ्यायला तयार नव्हती , " असं असेल तर मग मुलालाच नाव बदलायला सांगा . "

- " आता अति होतंय बरं . " सौ . कां . निशा गोरेची आई आपल्या मुलीला रागे भरली . 

- " अगं आई , आता जग बदललं . काळ हि बदलला . संसार दोघांना करायचा आहे . मग एकाचेच नाव का बरे बदलायचं ? दोघांच्याही नावाने आमची ओळख व्हायला हवी. मुलीनेच आपली ओळख कायमची का पुसून टाकायची ?तिनंच आपलं अस्तित्व का संपवून टाकायचं ? काही असो , मी वाहून जाणाऱ्यांपैकी नाही आणि प्रत्येक गोष्टीला होकार देणारी सुद्धा नाही . "

- श्रीयुत रवि काळे हे सर्व चुपचाप ऐकत होता . आता तो हि मध्ये पडला , " माझं नाव आणि आडनाव तुला बदलायचं आहे ? मग घे ही अंगठी आणि तुझ्या आवडी प्रमाणे ठेव माझे नाव . अगदी सहज  सरळ भाषेत श्रीयुत रवि काळे म्हणाला आणि त्याने सौ . कां . निशा गोरेच्या हातात अंगठी दिली . 

- आता दचकण्याची वेळ सौ . कां . निशा गोरेची होती .   

- " बरं मला सांग ओळख म्हणजे नक्की काय ? " श्रीयुत रवि काळेने सौ . कां . निशा गोरेला  विचारले . 

- आता पाहुण्यांनाहि या प्रकरणात मौज वाटू लागली होती . प्रकरणाचा छडा काय लागतो याची सर्वाना उत्स्कुता होती .  

- निशा गोरे अजून ही हातात अंगठी घेऊन होती . श्रीयुत रवि काळे कडून तिला ही अपेक्षा नव्हतीच . तिचा अंदाज होता की श्रीयुत रवि काळे तिचा विरोध करेल . मग वाद होतील . 

आणि ती पुन्हा एकदा सर्वांना पटवून देईल की स्त्रियांचे स्वातंत्र्य किती गरजेचे आहे . पण हे असं काही झालचं नाही , उलट श्रीयुत रवि काळे तिला शांतपणे प्रश्न विचारात होता , आणि या नव्या उद्भवलेल्या परिस्थिती मुळे ती गांगरली . 

- "अगं सांग ना ओळख म्हणजे काय ? " श्रीयुत रवि काळेने तिला पुन्हा विचारले . सर्व मंडळी या दोघांकडे आश्चर्याने बघत होती . सर्वांना निकालाची उत्सुकताही होतीच . 

- सौ . कां . निशी गोरेला असं वाटलं की तिच्या स्त्री स्वातंत्र्याच्या मोहिमेला आणि  लढा देण्याच्या वृत्तीला पूर्ण समाजचं जणू आव्हान देत आहे . पण सर्वांच्या समोर दोनदा विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर आता तिला देणे  भाग होते . नाही तर स्त्रियांच्या लढ्यात तिनं माघार घेतली असं तिच्या मनाने सतत तिला दोष दिला असता . 

- " ओळख म्हणजे , जशी मी ' निशा गोरे ' च्या नावाने ओळखली जाते . " तिनं प्रश्नांचे उत्तर दिले . 

-नवीन नवरी बोलली म्हणून सर्वांनी जोराने टाळ्या वाजवून तिचे अभिनंदन केले . 

- " ते झालं तुझ्यासाठी संबोधन . याला एक प्रकारची आपण खूण म्हणू शकतो . पण या जगात निशा नावाच्या अनेक मुली असतील आणि निशा गोरे नावाच्याहि काही मुली सापडतील . मग तुझी ओळख नक्की काय ? "श्रीयुत रवि काळे ने तिला विचारले , " तुझं नाव , तुझा चेहरा , तुझं शिक्षण , तुझी नोकरी , तुझी आवड निवड , तुझा स्वभाव , तुझा व्यवहार , नक्की कशाने आम्ही तुला ओळखावं , अशी तुझी अपेक्षा आहे ?

- आता सौ .कां .निशा गोरे चपापली .तिनं श्रीयुत रवि काळे कडे बघितलं, तो शांत होता . 

तिच्या मनात विचार आला , ' श्रीयुत रवि काळे  जाम भारी आहे . दिसतो तेव्हढा बावळट नक्कीच नाही .' पण आता काय करायचं ? माघार कशी घ्यायची ? हे प्रकरण वाढत चाललंय . तिच्या स्त्री स्वातंत्र्याच्या चळवळीचा असा अंत होणार का ? ' नाही नाही , हे होता कामा नये .' मनातल्या एका कोपऱ्यातून आवाज आली , ' तर्क करता येत नाही म्हणून लगेच हार मानण्याचे काहीच कारण नाही ' . 

- " आश्चर्य वाटतंय ? " श्रीयुत रवि काळे तिला म्हणाला आणि तिची तन्द्रा भंग 

झाली .

- " अगं , नाव म्हणजेच नुसती ओळख नसते . हे म्हणजे आधारकार्ड सारखे आहे . आता येणाऱ्या दिवसांमध्ये सर्व लोक आधारकार्डनेच ओळखले जाणार आहे . यालाच तुझ्या म्हणण्या प्रमाणे ओळख म्हणता येईल कां ? "

-सौ . कां . निशा गोरे हळू हळू निरुत्तर होत चालली होती . काय बोलावे आणि काय करावे हे तिला समजत नव्हतं . 

- " अगं , ओळख म्हणजे माणसाचे संपूर्ण व्यक्तिमत्व . यात सर्व आलं , नाव, चेहरा , गुण , योग्यता , संस्कार , आवडनिवड , वागणूक , वगैरे वगैरे .हेच सर्व गुण माणसाची खरी ओळख .कोणताही अन्याय होणार आहे या कल्पनेने व भीतीपोटी त्या गोष्टीचा विरोध करणे याला कोणाच्याही मुक्तीसाठी चळवळ म्हणता येत नाही . स्त्री आणि पुरुष ईश्वराची अमुल्य देणगी आहे . एक दुसऱ्याचे पूरक आहे . एक दुसऱ्याचे वैरी नाही .  खरं तर कोणीही कोणावर अन्याय करता कामा नये . उत्तम आणि योग्य व्यवस्थेच्या द्रष्टीने समाजानेच विवाहसंस्था बनविली . नंतर आयुष्य सुरळीत जावं , आणि येणाऱ्या घरात निष्ठा वाढावी  म्हणून मुलीचं नाव बदलण्याची परंपरा पडली . पण नाव बदलणं हा कोणताही मुद्दा होऊच शकत नाही .यात फक्त सोयीचाच विचार झाला असावा आणि नंतर हि प्रथा झाली असावी . "

- श्रीयुत रवि काळे जणू न थांबता प्रबोधनच करत होता . आणि सौ .कां .निशा गोरेला आश्चर्याचे धक्के देत होता . "

- " तुम्ही दोघं का स्पर्धेत भाग घ्यायला बसला आहात कां ? " आता गुरुजी 

भडकले , " अहो लवकर करा , लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त निघून जाईल . "

- सौ . कां . निशा गोरेनी चुपचाप श्रीयुत रवि काळेच्या हातात अंगठी ठेवली .

- श्रीयुत रवि काळे नी अंगठीने ताटातल्या तांदुळात नाव कोरले - ' निशा '  

- आता मात्र निशा गोरेला आश्चर्याचा धक्का बसला .      

- सर्वांनी टाळ्या वाजविल्या . दोघांनी सर्वांना पेढे वाटले . मग ' उखाणा घ्या उखाणा घ्या ' असं एक स्वरात सर्व म्हणाले . श्रीयुत रवि काळेनी उखाणा घेतला . 

-- आम्हीं दोघे , आमचा विश्वास , आमचीच आशा 

  सर्वे ऐका आज पासून आमचे आडनाव ' राविनिशा '

- हा उखाणा घेतल्यानंतर श्रीयुत रवि काळेनी सौ . कां . निशा ' गोरेकाळे ' च्या तोंडात पेढा भरविला . 

- सर्व मंडळी टाळ्या वाजवीत होते . -

- श्रीयुत रवि काळेचे आईवडील मात्र आपल्या मुलाच्या ,आडनाव बदलण्याच्या या अनपेक्षित निर्णयाला आश्चर्याने सामोरे जाण्याचा प्रयत्न करीत होते .


Rate this content
Log in