कर्मफळ
कर्मफळ
कर्माची कथा – कर्माचे फळ
एका गावात दोन शेतकरी राहत होते. एकाचे नाव रामू, तर दुसऱ्याचे नाव श्यामू.
रामू प्रामाणिक, मेहनती आणि मदतीला धावून जाणारा होता. तो रोज पहाटे उठून शेतात कष्ट करी. गरीबांना धान्य देई आणि कधीही कोणाची फसवणूक करत नसे.
श्यामू मात्र आळशी आणि कपटी होता. तो दुसऱ्यांच्या शेतातली पिके चोरत असे, खोटे बोलत असे आणि लोकांची फसवणूक करून स्वतःचा फायदा करून घेत असे.
एक वर्ष दुष्काळ पडला. रामूने पूर्वी केलेल्या चांगल्या वागणुकीमुळे गावकऱ्यांनी त्याला बियाणे, पाणी आणि मदत दिली. त्याचे पीक पुन्हा बहरले.
श्यामूला मात्र कोणी मदत केली नाही. कारण त्याने आयुष्यभर लोकांचा विश्वासघात केला होता. शेवटी त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली. त्याने सर्वांची माफी मागितली आणि प्रामाणिकपणे काम करण्यास सुरुवात केली.
काही काळाने त्याच्या आयुष्यातही बदल झाला. लोकांनी त्याच्यावर पुन्हा विश्वास ठेवला आणि त्याचे जीवन आनंदी झाले.
बोध
जसे कर्म, तसे फळ. चांगली कर्मे उशिरा का होईना, पण नेहमीच चांगले फळ देतात. वाईट कर्माचे फळ मात्र दुःखाच्या रूपाने परत येते.
दीपांजली (दीपा शिंपी)
