STORYMIRROR

Chandrakant Pawar

Others

2  

Chandrakant Pawar

Others

छ.शिवाजी प्रशिक्षक शिक्षक होते - 4

छ.शिवाजी प्रशिक्षक शिक्षक होते - 4

23 mins
190

अत्यंत कमी सैनिक बळावर गनिमी कावा पद्धती वापरणे खूपच फायद्याचे ठरते. त्यासाठी महाराष्ट्रातील निसर्ग फारच अनुकूल होता. गनिमीकावा पद्धतीत कमी सैनिक असताना .तिथे भरपूर सैनिक आहेत असा शत्रू पक्षाला भास निर्माण करून द्यायचा किंवा खूपच कमी सैनिकांची संख्या दाखवून शत्रूला गाफील ठेवायचे. आजूबाजूला असलेल्या जागेत अधिकचे गनीमी काव्याने युद्ध करणारे व गनिमी शस्त्रे वापरणारे मावळे किंवा सैनिक लपवून ठेवायचे .

योग्य वेळ येताच त्यांच्या साह्याने शत्रूवर तुटून पडायचे अशी पद्धत गनिमी काव्याच्या आधारे त्या काळी प्रचलित होती . त्यात शिवाजी महाराजांची गनिमी कावा पद्धती खूपच निर्दोष आणि आधुनिक होती. ती खूपच सोपी होती. भरवशाची होती .त्यांचे मावळे खूप वेगाने शत्रूवर हल्ला करायचे आणि त्याच वेगाने सुरक्षित स्थळी जाऊन थांबायचे. जगात अशा अनेक गनिमी पद्धती वेगवेगळ्या राष्ट्रात त्यावेळी अस्तित्वात होत्या.

    

    शहाजी राजांनी शिवाजी महाराजांना दोन हजार सैनिक स्वराज्यासाठी दिले होते. या दोन हजार सैनिकांच्या बळावर राजांनी स्वराज्याची घोडदौड सुरू केली . स्वतःची अशी माणसे त्याला जोडली. स्वतःचे मावळे त्यामध्ये मोठ्या हुद्यावर नेमले. शिवाजी महाराजांचा वडीलांवर आणि शहाजी महाराजांचा शिवाजी महाराजांवर खूप विश्वास होता आणि प्रेम सुद्धा होते. धन्य धन्य ते पितापुत्राचे प्रेम ....

ज्या शहाजी राजांनी त दोन हजार सैनिक दिले होते. त्या सैनिकांची संख्या राजांनी हळूहळू एक लाख लष्कर अशी वाढवली आणि ती वाढतच राहिली. शिवाजीराजे हे प्रतिहल्ला करणारे राजे होते. त्यांनी मावळ्यांमध्ये स्वराज्याची शिकवण देऊन राष्ट्रीयत्वाची पार्श्वभूमी निर्माण केली.

शिस्तबंद लष्कर , सुसंघटित यंत्रणेच्या बळावर राजांनी सामर्थ्यशाली राज्य निर्माण केले होते. त्यांच्या लष्कराच्या हालचाली अत्यंत वेगवान होत्या . आश्चर्यजनक प्रकारे त्यांचे मावळे गनिमीकावा करून शत्रूला चकवून पुन्हा सुरक्षित जागी परत जात होते.

राजांनी स्वराज्याच्या राज्यकारभारात मराठी भाषेचा वापर सुरू केला. जे फारशी शब्द होते ते टाळून त्यांच्या जागी मराठी शब्द वापरण्याची सुरुवात केली . इतरांना सुद्धा तशाच प्रकारची शिकवणी त्यांनी दिली. भाषा सुधारणा करायला शिवाजीराजांनी कडक आदेश दिले. त्यासाठी राज्यव्यवहार कोश करण्याची सुद्धा सूचना दिली . त्याप्रमाणे अष्टप्रधान मंडळ आणि पंडित यांनी त्यामध्ये लक्ष घालावं असं राजांनी सुचवलं होतं. त्याप्रमाणे सर्वजण कामाला लागले होते. आता थोड्याच दिवसात भाषा सुधारणा होणारच होती. परदेशी शब्द मराठी भाषेतून बाहेर पडणार होते.

छत्रपती शिवाजी महाराज हे उत्तम शिक्षक, प्रशिक्षक होते हे वेळोवेळी सिद्ध होते...

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याच्या झेंड्यासाठी लाल रंगाची निवड केली नाही .तर भगवा रंग त्यासाठी त्यांनी निवडला. याचा अर्थ शिवाजी महाराजांना रंगांचे विविध ज्ञान होते. कोणता रंग कशासाठी वापरला जातो याची त्यांना निश्चितच उत्तम प्रकारे माहिती असावी.

ते रंगपारखी होते.

रत्नपारखी होते.

शिवाजी महाराज रंग पारखी होते. 

हे शिक्षकी पेशाला निश्चित भूषणावह होते. एक शिक्षक चांगले रंग ओळखू शकतो.

तो साधा शिक्षक असला तरी अथवा चित्रकार शिक्षक असला तरी.

किंवा शिल्पकार शिक्षक असला तरी...

शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शिक्षक हा पेशा नव्हता. तर तो शिक्षकी धर्म होता. शिक्षकांचा धर्म. स्वराज्य रक्षक शिवाजी महाराजांचे बुध्दी मिश्रण शिक्षकी धर्मात दिसत होते.

देवळामध्ये लाल रंगाची फुले वाहिली जातात.

पांढऱ्या रंगाची फुले वाहिली जातात.

पिवळ्या रंगाची फुले वाली जातात .

शिवाजी महाराजांचे आजोबा

शिवाजी महाराजांची आजी.

लाल रंगाची व विविध रंगाची वस्त्रे वापरत होती. शिवाजी महाराजांच्या सणासुदीचे कपडे सुद्धा छान रंगाचे आणि वेगळ्या रंगाचे होते. महालात वावरणाऱ्या स्त्रिया विविध रंगाच्या साड्या आणि लुगडी वापरत होत्या .

त्यामध्ये गुलाबी रंग .

हिरवा साडीचा रंग सुद्धा होता.

अनेकजण फेटा गुलाबी रंगाचा वापरत.

शहाजीराजांनी खास दहा माणसे शिवाजीराजांच्या मदतीसाठी पाठवली होती. त्यामध्ये एक माणूस होता माणकोजी दहातोंडे... त्या नावावरून शिवाजी महाराज शहाजीराजांना नेहमी विनोदाने म्हणत की आबा तुम्ही मला दहा माणसं दिलीत्. परंतु ती दहा संख्या माझ्या लक्षात राहावी म्हणून तुम्ही दहातोंडे आडनावाचा सुद्धा एक सरदार मला दिलात.

यावर शहाजीराजे आणि शिवाजी महाराजे आणि दहातोंडे नावाचा सरदार सुद्धा दिलखुलास हसे. माणकोजी दहातोंडे शहाजीराजां सोबत वावरलेला होता. शहाजीराजे कोणते निशाण वापरतात. हे त्याला माहीती होतं.

शिवाजी महाराजांनी भगवा रंग वापरला . शहाजी राजांनी दोन वेळा स्वराज्य स्थापनेचा असफल प्रयत्न केला होता. त्यावेळी त्यांच्याकडे निशान होतं भगवा... तेच निशान शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी घेतले.

भगवा रंग किंवा शेंद्री रंग आहे तो जास्त प्रसिद्ध आहे कारण शेंदूर हनुमानाला सुद्धा जास्त प्रिय आहे . हनुमान म्हणजे महाशक्तीचे प्रतीक .

त्यामध्ये जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना लहानपणी रामकृष्णांच्या कथा सांगितल्या. त्या मध्ये सुद्धा रामभक्त हनुमानाला शेद्रि रंग म्हणजे भगवा रंग प्रिय आहे हे त्याला दिसून आले. भगव्या रंगाचे निशाण शिवाजी महाराजांच्या हाती त्यांच्या वडिलांनी दिले होते शहाजीराजांनी...

मुसलमानांच्या झेंड्याचा रंग हिरवा होता. त्या काळामध्ये सुद्धा वेगवेगळे सरदार वेगवेगळ्या रंगाचे झेंडे घेऊन किंवा निशाण घेऊन लढाईला जात असत.मात्र स्वराज्याच्या झेंड्याचा रंग भगवा होता जो शिवाजी महाराजांनी निवडला होता.

भगवे निशाण...

भगवे वस्त्र...

भगवी फुले...

भगवा गंध ...

अशा गोष्टीमधून स्वराज्यासाठी भगव्या रंगाची निवड करण्यात आली होती.

    भारताच्या तिरंग्याचा रंग केसरी आहे. परंतु स्वातंत्र्याच्या काळात तिरंग्यातील रंग हा केशरी नव्हता. केशरी रंगाच्या स्थानी भगवा रंग होता.

मात्र त्यावर संशोधन होऊन त्या वेळच्या नेत्यांनी चर्चेअंती भगव्या रंगाच्या जागी केशरी रंग घेतला . नंतर केशरी रंग भारताच्या झेंडा तिरंग्यावर विराजमान झाला. त्याला कदाचित प्रादेशिक विचार कारणीभूत असावेत केशरी रंग मानणारे त्या वेळी देशाच्या राजकारणात जास्त होते .त्यामुळे भगवा रंग जाऊन त्या ठिकाणी केशरी रंग भरला गेला होता. असे असले तरी तिरंगाची शान कमी झाली नव्हती.

भगवा रंग हा सर्व मंदिरात व अध्यात्मिक आश्रमात लावला जातो .साधुसंत यावेळी भगव्या रंगाचे निशाण वापरत होते .

यात्रेला, जत्रेला जाताना वारकरी खांद्यावर भगव्या रंगाचा झेंडा घेत होते. श्रीकृष्ण आणि अर्जुन सुद्धा भगव्या रंगाचा झेंडा त्यांच्या रथावर लावत होते. उगवत्या सूर्याचा रंग सुद्धा भगवा आहे . बौध्द भिक्षुक भगवा रंग वापरत असत. भगवा रंग म्हणजे एक प्रतिक आहे .

तो रंग ..

.त्याग

बलिदान....

ज्ञान...

सेवेचे प्रतीक आहे .

यासाठी शिवाजी महाराजांनी भगवा रंग आपल्या स्वराज्याच्या झेंड्यासाठी निवडला होता. त्यामागे त्यांचा किती मोठा वैचारिक दृष्टिकोन होता. हे दिसून येते .असा वैचारिक दृष्टिकोन शिक्षकाच्या मुशीतून तयार झालेल्या प्रशिक्षक राजाकडे असू शकतो. बोलताना सुद्धा माझा महाराष्ट्र मी पूर्णपणे भगवा करीन असे बोलल्यामुळे त्या ठिकाणी एक वेगळेच वातावरण तयार होते. स्वराज्य भगवती शिकवण्यासाठी शिवाजी महाराज अनेक युक्त्या करीत होते. त्याप्रमाणे ते त्यांच्या सहकार्‍यांच्या मनावर बिंबवत होते .त्यांना शिकवत होती.

शिकवतो तोच जो खरा शिक्षक असतो. वेळोवेळी शिवाजी महाराजांचे शिक्षकी गुण दिसून येतात.

भगव्या रंगाचे निशाण किंवा झेंडा दूरवरुन घोडे स्वारांना दिसत असे. गडाच्या उंचावर लावलेला भगवा ध्वज गडाच्या पायथ्यासाठी लढणाऱ्या मावळ्यांना भरपूर स्फूर्ती देत होता. गडावरती झेंडा लावलेला आहे .त्या झेंड्याच्या रक्षणासाठीच आपण लढतो आहे अशी भावना त्यांच्या जागी होत असे.

शत्रूच्या तावडीतून निसटून सुरक्षित स्थळी यायचे झाल्यास किल्ल्याला लावलेल्या भगव्या झेंड्या यावरून त्यांना अंदाज घ्यायचा . जवळचा कुठचा किल्ला आहे . कितीवेळा मध्ये आपण त्या किल्ल्यामध्ये सुरक्षितपणे पोहोचू शकतो. असाही एक उपयोग भगव्या झेंड्याचा होत असे. खरं म्हणजे भगवा झेंडा दूरवरून स्पष्ट दिसत असायचा...

बोलतानासुद्धा माझा महाराष्ट्र मी पूर्णपणे भगवा करीन बोलल्यामुळे त्या ठिकाणी वेगळा भाव तयार व्हायच्या. .. जर लाल झेंडा भगव्याच्या ठिकाणी असता तर मी माझा महाराष्ट्र पूर्णपणे लाल रंगाचे करीन .असे म्हटले गेले तर ते ऐकायला विचित्र वाटते.

लाल रंग हा रक्ताचा आहे. त्यामुळे त्यातून वेगळा संदेश जाऊ शकतो. ऐवढे रंगसंगतीचे ज्ञान शिवाजी महाराजांना उत्तम प्रकारे अवगत होते....

      शिवाजी महाराजांनी त्यांच्या झेंड्यासाठी भगवा रंग निवडला...

त्यांना भगव्या रंगाचे आकर्षण कसं काय निर्माण झालं.

भगव्या रंगांमध्ये तेजस्विता आहे. भगवा रंग सरसकट सर्व लोक परिधान करत नाहीत .स्त्रीयाही भगव्या रंगाच्या साड्या सहसा घालत नाहीत. पुरुष सुद्धा जास्त भगव्या रंगाचे कपडे व्यवहारात वापरत नाहीत. भगवा रंग कोणालाही शोभून आणि उठून दिसतो. भगवा रंग एक वेगळाच रंग आहे. असा त्याचा अर्थ होतो . त्याचा अपमान सतत होत नाही. यासाठी शिवाजी महाराजांनी भगवा रंग निवडला असावा...

जर निरीक्षण बुद्धी शाबूत असेल तर पाहणाऱ्याच्या असे लक्षात येईल की पायाखाली लाल रंग आल्यावर काही वाटत नाही. परंतु भगवा रंग पायाखाली आला तर लोकं त्याच्यावर पाय ठेवत नाहीत. श्रद्धापूर्वक बाजूला सरकतात.

सध्याच्या काळात पाहिले तर असे दिसून येईल. तीन चाकी, चार चाकी, दुचाकी वाहने आहेत .इतर गाड्या आहेत. मोठ्या एसटी बसेस आहेत .त्यांचे रंग सहसा भगवे नसतात . क्वचितच एखादी गाडी भगव्या रंगाची दिसते. मात्र भगवा रंग विशिष्ट रंग असल्यामुळे तो धर्माच्या बाबतीत भाग्यशाली आहे .त्यामुळे त्याची निवड शिवाजी महाराजांनी स्वतंत्र स्वराज्यासाठी व झेंड्यासाठी केली असावी. ज्याप्रकारे तिरंगा रंग स्वातंत्र्याचा वाटतो.तसा भगवा रंग सुद्धा निर्भयतेचा आहे.

महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात भगवा रंग सर्व ठिकाणी वापरला जात नाही. लाल रंग वापरला जातो. त्याचप्रमाणे जर कुठे  भगव्या रंगाची पट्टी अचानक नजरेला पडली तर ती एकदम उठून दिसते. थोडक्यात भगव्या रंगावर नजर खिळून रहाते.भगवा रंग स्वराज्य अस्मितेचा रंग आहे. राजांना हे पूर्वीपासून ठाऊक असणार . भगवा रंग रहस्यमयी आहे. त्याचे रहस्य म्हणजे तो रंग संमोहनकारक वाटतो. त्या रंगाच्या अधीन जर कुणी गेला तर त्या रंगात रंगून जातो. त्या रंगाचा होऊन जातो. सारा परिसर भगवामय होऊन जातो. पहाणार्‍याला एकदम छान बदल जाणवतो. भगव्या रंगाची लाट लहरत जाते असा पहाणाऱ्याला भास होतो...

शिवाजी महाराज अध्यात्मिक वृत्तीचे होते. अध्यात्माचे अधिष्ठान त्यांच्या राज्यात महाराष्ट्रात स्थिरस्थावर झाले होते. तरीसुद्धा परकीयाकडून मंदिरे लुटली जात होती .मंदिरे पाडली जात होती. पूजा बंदी होती .उत्सव बंदी होती .अशा अनेक घटना या काळात घडत होत्या त्याचा शिवाजीमहाराजांच्या मनावर खूपच परिणाम होत होता. स्वराज्याचे परकीय शत्रू म्हणजे इराणी, पठाण , मुस्लिम , इंग्रज  होते. शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या दरबारात प्रवेश करणाऱ्या मावळ्यांच्या रूपात पक्के गुप्तहेर खाते तयार केले होते. याचा अर्थ औरंगजेबाच्या दरबारात शिवाजी महाराजांचे असंख्य गुप्तहेर होते. त्यामुळे तिकडची माहिती इकडे महाराष्ट्रात लगेच कळत होती.

राजांनी सैनिकांमध्ये, मावळ्यामध्ये समानतेचे तत्व ठेवले होते. त्यांच्याशी जिवाभावाची मैत्री निर्माण केली होती. त्यामुळे एकोपा वाढायला मदत झाली होती. स्वतः शिवाजी महाराज मावळ्यांच्या मांडीला मांडी लावून त्यांच्यासोबत त्यांनी आणलेल्या भाकरी आणि भाजीची चव घेत होते. त्यामुळे मावळ्यांना समजत होते की आपला राजा हा आपल्या स्वतःचा आहे. आपल्या प्रमाणे जगतो...

आपल्याप्रमाणेच खातो

अनेक गोष्टी करतो.

आपल्याप्रमाणेच विचार करतो.

या गोष्टीमुळे मावळे आणि शिवाजी महाराज यांच्यामधील अंतर खूपच कमी झाले होते . त्यांच्यामध्ये मैत्री वाढत होती. ती मैत्री अधिकच दृढ होत होती. अशाप्रकारे एका शिक्षकाच्या रूपात प्रत्यक्ष अनुभव घेऊन शिवाजी महाराज प्रत्येकाला प्रात्यक्षिका सहित स्वराज्य प्रशिक्षण देत होते. त्यामुळे आयत्या वेळेस त्यांचा रणांगणावर गडबड गोंधळ उडत नव्हता.

शिवाजीमहाराज साम-दाम-दंड-भेद अशी नीती वापरून स्वराज्याचा विस्तार करीत होते आणि शत्रूचे मनोधैर्य कमी करीत होते. आदिलशहा जनतेला क्रूर शिक्षा द्यायचा.

डोळे फोडणे. 

मालमत्ता जाळणे ..

दंड बसवणे.

शेती जाळणे

कुटुंबासह तोफेच्या तोंडी देणे.

हत्तीच्या पायाखाली किंवा घोड्याच्या टापा खाली चिरडून मारणे.

अशा प्रकारच्या क्रुर शिक्षा तो देत होता. त्या शिक्षा खरोखरच भयंकर होत्या. 

शिवाजी महाराजांचे अनेक नातलग स्वराज्याच्या विरोधात उभे होते. तरी पण अत्यंत नियोजनपूर्वक शिवाजी महाराजांनी स्वराज्य शून्यातून निर्माण केले

आदिलशहा जुलूम जबरदस्ती करणारा होता.

मात्र शिवाजीराजांकडे स्वराज्याचे तत्वज्ञान होते. शिवाजीराजांनी मावळ्यांना ध्येयवाद शिकवला. मग मात्र एकदा शिकवलेला ध्येयवाद मावळे कधीच विसरले नाहीत. शिवाजी महाराज काही काळी प्रसंगी कल्पक बुद्धी वापरत .ते शत्रूला स्वतःच्या जाळ्यात अलगद अडकवत.

राजांनी शेतकरी, सामान्य माणूस या सर्वांना स्वराज्याच्या सेवेत सामावून घेतले होते. शेतकरी, सामान्य माणूस ,गरीब माणूस या सर्वांना विनाअट स्वराज्याच्या कार्यात शिवाजीराजांनी सामावून घेतले होते.. इतका दिलदारपणा त्यांच्याकडे नक्कीच होता. शिवाजी महाराजांचा दिल दर्या होता.

शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे यांचा एक भाऊ होता. त्याचे नाव शरीफजी...

हे नाव ऐकायला थोडे वेगळे वाटते. आदिलशहाच्या बाजूने शहाजीराजे आणि शरीफजी एका लढाईत लढत होते .त्यामध्ये शहाजी राजांचा भाऊ शरीफजी ठार झाला. त्या लढाईनंतर आदिलशहाने शहाजीराजांना 'सरलष्कर' अशी पदवी बहाल केली. शहाजीराजे खूपच पराक्रमी होते.

मावळे बोलताना शिवाजीराजांना ' राजे ' असे हाक मारत . तो ' ' राजे ' नावाचा शब्द मावळ्यांना शक्ती देणारा होता. त्या शब्दातूनच मावळ्यांना जाणीव व्हायची. आपला पण एक राजा आहे. शिवाजी महाराजांच्या राजेपणाच्या रूपाने रयतेला जगण्याचे उदात्त कारण मिळाले होते. छत्रपती शिवाजी महाराज वाचन, युद्धकला ,घोडेस्वारी व लेखन करायला शिकले होते. रायरेश्वराच्या देवळात शिवरायांनी जेव्हा स्वराज्याची शपथ घेतली तो काळ सोळाशे पंचेचाळीसचा आहे...

शिवाजी राजांचे मावळे गनिमी कावा शिकत होते.

म्हणजे ते नक्की काय शिकत होते .हे पाहिल्यावर आपल्याला समजते की शिवाजी महाराजांचे मावळे तलवार चालवणे दांडपट्टा फिरवणे घोडेस्वारी, शस्त्रविद्या अशा प्रकारचे शिक्षण घेत होते. आजच्या भाषेत याला ट्रेनिंग म्हणतात. अशा प्रकारचे ट्रेनिंग सर्व मावळ्यांना विनामूल्य दिले जात होते. हे इथे लक्षात घेण्यासारखे आहे. कारण आजकाल अनेक कोर्सेस आहेत. त्या प्रत्येक कोर्सला विद्यार्थ्यांना फी द्यावी लागते. मात्र या ठिकाणी शिवाजी महाराज प्रत्येकाला मोफत शिक्षण देत होते. हल्ली सैन्यात जायचे असेल अथवा पोलीस भरतीमध्ये जायचे असेल तर अनेक क्लासेस निघाले आहेत. त्या क्लासेस मध्ये जाऊन विद्यार्थ्यांना फी भरावी लागते. त्यांना शिक्षण दिले जाते. थोडक्यात आज-काल पैसे भरून ट्रेनिंग मिळते.

शिवाजी राजांच्या काळात बेरोजगारी नव्हती. कारण लोकांना कामच नव्हते. ते माती, शेती, जंगलातली कामे करायची. एवढेच त्यांना माहीत होते. त्यामुळे प्रथमच सैन्यामध्ये भरती व्हायला . मावळे म्हणून भरती व्हायला स्वेच्छेने अनेक तरुण येत होते. शस्त्रविद्या शिकून स्वराज्याच्या रक्षणासाठी प्राण अर्पण तयार करायला सिद्ध होते. जसजशी स्वराज्याची सीमा वाढत राहिली. तसतसे शिवाजीराजांना शत्रूची लूट किंवा महसूल मिळत राहिला.

त्या आधारे विविध रकमेत शिवाजी महाराजांनी त्यांच्या मावळ्यांना सैनिकांना पगार द्यायला सुरुवात केली. याचाच अर्थ असा आहे की शिवाजी महाराजांचे साम्राज्य वाढत होते . स्वराज्यामध्ये पैशाचा ओघ यायला सुरुवात झाली होती. हे महाराष्ट्रातील मावळ्यांना नवीन होते. नोकरी देणारा राजा. आपला मराठी राजा आहे .त्या मराठी राजाच्या हाताखाली काम करायचे. तर अजिबात भिती नव्हती. उलट उत्साहच होता. मोठ्या संख्येने तरुण मावळे बनायला येत होते. थोडक्यात महाराजांनी एक राष्ट्र संघटना निर्माण केली होती. त्या कार्याला महाराष्ट्रातील बहुतेक जणांनी डोक्यावर उचलून घेतले होते. त्यामध्ये सामील होण्यासाठी प्रत्येक जण आतुर होता. मावळा बनायला तयार होता..

त्यावेळचा तरुण किंवा वयस्कर माणूस सुद्धा तत्पर होता. स्वराज्याच्या सैनिक भरती मध्ये वयाची अट नव्हती. शिक्षणाची अट नव्हती. शारीरिक पात्रतेची अट खास नव्हती. फक्त होते... स्वराज्यासाठीचे झपाटलेपण...

त्यासाठी अनेकांना पगार सुद्धा नको होता. त्यांना पगाराची अपेक्षा सुद्धा नव्हती. मात्र शिवाजीराजांनी स्वतःहून त्यांना पगार दिला होता.

त्या वेळच्या तरुणी सुद्धा स्वराज्यासाठी लढायला तयार होत्या. परंतु त्यांच्या अडीअडचणी वाढू नयेत म्हणून त्यांना मावळा बनण्यास इच्छा असून सुद्धा मावळा शिक्षण जमणारे नव्हते. कारण शत्रु इतका भयंकर होता की स्त्री किंवा महिला दिसली की शत्रु सरळ त्यांच्यावर बलात्कार करायला कमी करीत नव्हता. अनेकांच्या आया-बहिणी ,मुली यांच्या अब्रूचे धिंडवडे निघाले होते. त्यामुळे स्त्रियांची जोखीम नको म्हणून त्यांना मावळा बनण्यास संधी मिळत नव्हती. तरीही काही स्त्रिया या ना त्या कारणाने स्वराज्याला मदत करणाऱ्या होत्या. त्या गुप्तपणे स्वराज्याला सहाय्य करत होत्या. त्यांची संख्या अगदीच कमी होती.तरी ते स्वराज्याच्या हिताचे होते.... अनेक बेरोजगार लोकांना राजांनी स्वराज्य निर्माण करून रोजगार पुरवला होता.

असा महान राजा या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाला होता. बेरोजगार हातांना काम आणि गरिबांना शेतकऱ्यांना सुद्धा कामे देऊन त्यांचं जीवन स्थिरस्थावर करणारा मराठी राजामाणूस बनण्याचा सन्मान छत्रपतींना मिळाला होता.लाखो बेरोजगार लोकांना स्वराज्याच्या निमित्ताने काम मिळाले होते. अनेक प्रकारच्या नोकऱ्या त्यावेळी निर्माण झाल्या होत्या. होन चलनाच्या रोख स्वरूपात नोकरी करणाऱ्यांना पगार मिळत होता. होन स्वराज्याचे स्वदेशी चलन होते. स्वराज्याच्या नोकराच्या हाती सोन्याचे होन मुद्रेचे असलेले चलन खणखणत होते. लाखो लोकांना हवी तशी कामे मिळत होते. बारा बलुतेदारांच्या हातांना काम मिळत होते. ज्यांना युद्ध करायचे होते. त्यांना युद्धाची प्रशिक्षण मिळत होते. ज्या हातांना पोट भरायचे होत. त्याला पोट भरण्यासाठी रोजगार मिळत होता. प्रत्येकाच्या कलेला सन्मान होता .प्रत्येकाच्या कलेचं चीज होत होते. एवढे प्रचंड सामर्थ्य स्वराज्यात निर्माण केले होते. लाखोचा व्यवहार रायगडावर बाजारात होत होता. रायगडावरची बाजारपेठ फुलून जात होती. जिथे स्वराज्याची घडामोड होत होती तिथेच माणसांना जगण्याची उमेद निर्माण करून दिली जात होती. त्यामुळेच स्वराज्यात राहण्यासाठी अनेकांची धडपड चालली होती.

मावळ्यांच्या सोबत जर स्त्रियांना मावळा बनण्याची संधी मिळाली असती तर स्वराज्यावर अनेक संकटे वाढली असती. कारण आक्रमण करणार हे परकीय होते. फक्त संपत्तीसाठी आणि स्त्रीसाठी परकीय लढत होते. धर्मांतर करण्यासाठी ते आग्रही होते. अनेक गुणवंत स्त्रियांना बाटवून त्यांनी त्यांच्यावर जबरदस्ती केली होती . त्यांच्यावर जुलूम करीत जनानखान्यात बसवले होते. त्या मार्फत ते धर्माचा प्रसार करीत होते. मुसलमान हे परकीय होते . त्यानी इकडे येताना सोबत काही आणले नव्हते. त्यांच्या स्त्रिया मुले भारतीय भूमीतले धर्मांतरीत केलेले होते.

या सर्व अन्यायाविरुद्ध छत्रपती शिवाजी महाराज सर्वांना एकत्रित करीत होते. अनेक प्रकारे रयतेला स्वराज्य शिकवीत होते. त्या गोष्टीला हळूहळू यश येत होते.

स्वतःची जात ,

स्वतःचा धर्म,

स्वतःचे कुटुंब,

स्वतःची भूमी,

स्वतःचे घर

स्वतःचा गाव

याबाबत रयतेमध्ये जागृती होत होती. त्याचे प्रणेते शिवाजी महाराज होते.

शिवाजी महाराजांच्या अतुलनीय कामगिरीमुळे हे घडत होते. त्याचा फायदा हळूहळू सर्वांना दिसत होता. स्वराज्याची शिकवणूक जनमानसात रुजत होती. अनेक गोष्टींचे नेतृत्व करण्यासाठी माणसे स्वतःहून पुढे येत होती. माणसांना आता शिकायची ओढ लागली होती. तरुणांना शिकण्यासाठी संधी उपलब्ध झाली होती. त्या तरुणाची आणि मावळ्याची इच्छा या द्वारे शिवाजी महाराज त्यांना शस्त्रविद्या शिकवत व प्रशिक्षण देऊन पूर्ण मावळ्यात रूपांतर करीत होते.


वेडात दौडले वीर मराठी सात. याची महती काव्यातून खूप वेळा बहुतेकांनी ऐकलेली आहे.

बहलोलखानाला पकडण्यासाठी राजांनी प्रतापराव गुजर यांना पत्र पाठवले. त्यावर लिहिले होते . बहलोलखानाला मारल्याशिवाय मला तुम्ही तुमची तोंडें दाखवू नका .ते वाक्य प्रतापराव गुजर यांच्या जिव्हारी लागले होते. मग बहलोल खानाचा शोध सुरू झाला. शेवटी खानाचा सुगावा लागला. त्याप्रमाणे प्रतापराव गुजर आणि त्यांच्यासोबत असलेले सहा मावळे असे एकूण सात वीर दौडत बहलोल खानावर चालून येऊ लागले. परंतु खानाच्या सेने पुढे त्यांचा टिकाव लागला नाही. मात्र प्रताप राव गुजरांनी चांगले काम केले होते. प्रतापराव गुजर यांना सरसेनापतीची पदवी महाराजांनी दिली होती.

.

प्रतापराव गुजर यांचे खरे नाव प्रतापराव नव्हते.

त्यांचे खरे नाव होते कुडतोजी गुजर... परंतु स्वराज्यासाठी लढायचे या एकाच चिकाटीने ते स्वराज्याला सामील झाले होते. कुडतोजी गुजर यांना शिवाजी महाराजांनी प्रतापराव ही पदवी बहाल केली होती. त्यामुळे पुढे कुडतोजी गुजर हे प्रतापराव गुजर असे नाव लावत. जेव्हा राजांनी प्रथम कुडतोजी गुजर यांना स्वराज्याचा विचार सांगितला तेव्हा त्या विचाराने कुडतोजी गुजर एकदम प्रेरित झाले. स्वराज्याच्या कामासाठी तयार झाले.

शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ व्यंकोजी हे तामिळनाडू तंजावर येथे जहागीरदार होते .मात्र त्या दोघांचे मतभेद होते. एकदा चेन्नई जवळच्या जिंजीचा किल्ला राजांनी जिंकून घेतला .नंतर कर्नाटकात अनेक किल्ले जिंकत गेले. दोघांची भेट झाली. परंतु त्यांनी शिवाजी महाराजां वर हल्ला केला. परंतु आपल्याच सावत्र भावावर काय कारवाई करणार .... त्यामुळे शिवाजी महाराज रायगडावर परत आले

हिरोजी इंदुलकर राजांचे बांधकाम प्रमुख होते. ते रायगड किल्ला डागडुजी करण्याचे काम करत होते शिवराज्याभिषेकाच्या वेळी इंदुलकरांनी रायगडावर नवीन रस्ते,

देवळे ...

मनोरे...

इमारती...

तळी..

 चौक ...

बांधण्याची कामे केली होते .त्यावेळी खुश होऊन राजांनी हिरोजी इंदलकरांना विचारले.

इंदलकर तुमचे नाव कुठच्या ठिकाणी लिहायला तुम्हाला आवडेल.

तेव्हा हिरोजी इंदुलकर शिवाजीराजांना म्हणाले.

शिवाजी राजे माझे नाव जर तुम्हाला स्मृती म्हणून जतन व्हावे असे वाटत असेल .तर ते एका पायरीवर लिहावे.

हिरोजी इंदुलकर महाराजांच्या सदैव तप्तर सेवेस हजर आहे. या अर्थाची ओळ त्यांनी लिहिली.

रायगडावर हिरोजी इंदुलकरांनी एका पायरीवर शिलालेखात स्वतःचे नाव लिहून ठेवले आहे .

सेवेठायी तत्पर....

स्वतःसोबत इतरांचेही नाव मोठे करण्याचा मनाचा मोठेपणा शिवाजी महाराजांकडे निश्चित होता. स्वतः सोबत आपल्या सहकाऱ्यांचे नाव इतिहासात अमर करण्याची इच्छा शिवाजी महाराजांकडे होती. हे काम फक्त इतरांना जगण्याची व शिकवण्याची इच्छा असलेला एक मोठा अवलिया करू शकत होता. त्याचेच नाव म्हणजे शिवाजी महाराज..

खरंच शिवाजी महाराज एक अवलीया राजा होते. शिवाजी महाराज हे असे अवलिया होते की ते आपल्या सहकाऱ्यांच्या जीवावर जगणारे नव्हते .तर आपल्या सहकाऱ्यांना यशामध्ये सहभागी करणारे होते. लोकांनी स्वतः राजां सोबत त्यांच्या सहकाऱ्यांची नावे सुद्धा घ्यावीत अशी राजांची नेहमीच इच्छा होती. स्वराज्यासाठी महाराजांनी खूप मेहनत घेतली होती. ही गोष्ट खरी असली तरी त्या मेहनती मध्ये इतरांचाही वाटा होता . तो वाटा ज्याच्या-त्याच्या प्रमाणे सहकाऱ्यांना मिळावा याबाबत शिवाजी महाराज नेहमीच दक्ष होते. याचे कारण ते दिलदार शिक्षक होते. प्रामाणिक प्रशिक्षक होते. सच्चा मित्र होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांमध्ये अतिशय हुशार आणि धूर्त माणसे होती. शिवाजी महाराजांचे स्वराज्य आता राजसत्ता बनत चालली होती. शिवाजी राजे महाराज सत्तेचे धुरंधर होते. मात्र राजसत्तेला ग्रहण लागावे म्हणून अनेक गद्दार टपून राहिले होते.

खंडोजी खोपडे हे असे एक नाव आहे .ज्याच्यावर राजांनी खूप उपकार केले. तोच खंडोजी खोपडे खानाला जाऊन मिळाला. त्याने राजांविरुद्ध हाती तलवार घेतली . पन्हाळगडच्या वेळी अफजलखानाच्या मुलाला फाजलखानाला वाट दाखवणारा हाच खंडोजी खोपडे होता..... स्वराज्याचा गद्दार.... खंडोजी खोपडे प्रमाणे यांच्याविरोधात अनेक सरदार होते.

खंडोजी खोपडे हा कान्होजीचा मित्र होता. कान्होजीला वाटत होते की खंडोजी खोपडे पुन्हा स्वराज्यी यावा परंतु... खंडोजी उलट्या काळजाचा माणूस होता .कान्होजी जेधेनी त्याला म्हटले.

तुझी आणि शिवाजीं राजांची रूजवात घालून देतो. शिवाजीराजे तुला माफ करतील...

ठीक आहे. तु तसा प्रयत्न कर. बोल ... मी शिवाजी राजांना भेटेल .... नक्कीच.

कान्होजींनी शिवाजीराजांची आणि खोपडीची भेट घालून दिली..... मात्र... खंडोजी खोपडेच्या मनात दुसरेच होते.

खंडोजी खोपडे त्याच्या स्वभावाप्रमाणे कान्होजीच्या विरुद्ध गरळ ओकली. मात्र खंडोजी खोपडेने कितीही गरळ ओकली. छत्रपती राजांना त्याने सांगितले . कान्होजी जेधे हे मोठे गद्दार आहेत. त्याच्या पासून सावधान रहा नाहीतर तुम्ही फसाल...

खंडोजी खोपडेने कान्होजीच्या दोस्ती मध्ये गद्दारी केली होती. ही गोष्ट शिवाजी महाराजांनी ओळखली शिवाजी महाराजांनी तेथल्या तेथे खंडोजी खोपडेचे दोन्ही हात कलम करून टाकण्याचे आदेश दिले. लगोलग शिपायाने त्या आदेशाची अंमलबजावणी केली. खंडोजी खोपडे आता थोटा झाला होता. तेव्हा तू काहीतरी उलट बोलला हे बघून शिपायांने खंडोजी खोपडेवर तलवार उगारली होती. परंतु शिपायाला शिवाजी महाराजांनी आदेश दिले .

थांबा मी जेवढे सांगितले तेवढेच करा...

याला आपल्या दवाखान्यात घेऊन जा आणि तिथे याचा उपचार करा .त्याच्या हाताची जखम बरी करा. त्याला मरू देऊ नका. त्याला आयुष्यभर समजले पाहिजे की आपले हात कशासाठी कापलेले आहेत. त्याला तसाच ठेवा तुरूंगात खितपत .थोटक्या हाता सहित... इतरांना सुद्धा त्यामुळे जरब बसेल... कान्होजींना ही गोष्ट समजली तेव्हा त्यांना धक्काच बसला. त्यांनी राजांना घाबरत घाबरत विचारले.

राजे तुम्ही असे कां केलेत.

तेव्हा राजे म्हणाले. कान्होजी जेधे तुम्ही ज्या विश्वासाने खंडोजी खोपडेला आमच्याकडे परत आणलेत. त्याच विश्वासाच्या जोरावर खंडोजी खोपडे तुमची बदनामी करत होता. माझ्या सहकाऱ्याची बदनामी माझ्यासमोर केलेली. तीही खोटी मला चालणार नाही .म्हणून मी त्याला शिक्षा दिली आहे . कान्होजी काहीच बोलले नाही .राजाने केलेली कृती बरोबर आहे .योग्य आहे हे त्यांना पटले होते...

राजांचे कुलदैवत तुकाईदेवी होती आणि तुकाईचे देऊळ तुळजापूरला होतं ....म्हणजेच तुळजाई... तुळजाभवानी माता... आई भवानी....

तुळजापुरला शाहिस्तेखानाने धुमाकूळ घातला होता .त्यावेळी देवी रक्षणासाठी तिथल्या सरदाराने खूपच चलाखी केली .जेव्हा शाहिस्तेखान तुळजापुरला आला. तेव्हा कदम सरदारांनी तुळजाभवानी मातेच्या मूर्तीच्या जागी दुसरीची मूर्ती ठेवली आणि देवीचे रक्षण केले. खानाने नकली मूर्तीची नासधूस केली .मात्र खरी मूर्ती वाचली होती .कदम सरदाराने ती वाचवली होती. शाहिस्तेखानाने मुद्दाम तुळजाभवानी मातेच्या मंदिरात शिरून मूर्तीचा विध्वंस केला होता. तो शिवाजी महाराजांना डिवचण्यासाठी. मात्र शिवाजी महाराज नेहमीच दक्ष राहत .त्यांनी आधीच तसा संदेश कदम सरदारांना देऊन ठेवला होता. शाहिस्तेखान इकडे येऊन मुद्दाम देवीच्या मंदिराचा विध्वंस करेल .त्यामुळे सावध रहा. त्याप्रमाणेच कदम सरदारांनी सावध होऊन तुळजाभवानी मातेची मूर्ती दुसऱ्या ठिकाणी लपवली होती.

शिवाजी महाराज आध्यात्मिक होते. तो अध्यात्माचा वारसा त्यांना मां साहेबांकडून मिळाला होता. शिवाजी महाराज जगदंब जगदंब असे पुटपुटत . जगदंबा देवीवर त्यांची खूप श्रद्धा होती...

अध्यात्माची प्रेरणा त्यांना जगदंबेमुळेच मिळाली. जगदंबेच्या कृपेने त्यांनी सर्व मनोरथ पूर्ण केले. अशी त्यांची धारणा होती. छत्रपती शिवाजी महाराज निष्ठेने वागले. त्यांनी अपार श्रमे घेतली .त्या श्रमांचे सार्थक झाले होते. राजांचे अंगरक्षक दल नेहमीच सतर्क होते. ती राजांचे नेहमीच रक्षण करीत. राजे शूरवीरांचा नेहमीच सन्मान करीत. त्याना सहसा प्रशंसा आवडत नसे.त्यांचा सत्यावर त्यांचा विश्वास होता. राजांचा स्वभाव मन मोकळा होता. त्यांचे अंतकरण नेहमीच श्रद्धायुक्त असायचे. मात्र कधी कधी राजे संतापत...

फिरंगोजी नरसाळे यांना शिवाजी महाराजांनी जेव्हा शिक्षा दिली तेव्हा सर्वजण अस्वस्थ झाले. फिरंगोजी नरसाळे यांना मासाहेबांनी भोपाळगडचा किल्लेदार बनवला होता. परंतु त्याच भूपाळगडावर दिलेरखाना सोबत युवराज संभाजी राजांनी चढाई केली. तेव्हा संभाजीराजांच्या प्रेमाखातर फिरंगोजी नरसाळ्यांनी भूपाळगड त्यांच्या ताब्यात दिला. त्या कृतीने शिवाजी महाराज रागावले होते. त्यांनी फिरंगोजी नरसाळे यांना अटक करण्याचे आदेश दिले . त्यांना जेरबंद करून त्याला तोफेच्या तोंडी देण्याची शिक्षा फर्मावली.

फिरंगोजी नरसाळ्याने महाराजांच्या मागे धावत जाऊन क्षमा मागितली . शिवाजी राजे यांच्या डोळ्यात अश्रू होते. तरी ते कठोर मनाने म्हणाले...

फिरंगोजी चुकीला माफी नाही. तुम्ही ज्यांच्या नोकरीत आहात. त्या शिवाजी महाराजांचे आदेश पाळण्याच्या ऐवजी तुम्ही संभाजीराजांचे आदेश पाळलेत आणि गड जमीन दोस्त केलात. हे तुमच्या संभाजी प्रेमामुळे झालेलं आहे. पण स्वराज्य मध्ये तिला महत्त्व आहे. शिस्त प्रथम असते. नंतर प्रेम असतं. तुम्ही चुकी केलीत. हुंदके देणाऱ्या फिरंगोजीला छत्रपती शिवाजी महाराज सांगत होते. तेव्हा बघणाऱ्या सगळ्यांच्याच मनाचा थरकाप झाला होता.

महाराज क्षमा करा फिरंगोजी नरसाळा पुन्हा म्हणाला तेव्हा गर्रकन वळून शिवाजी महाराज त्यांना म्हणाले फिरंगोजी तुम्ही राजशिष्टाचारात ढिलाई दिलीत. त्यापेक्षा तुम्ही देशद्रोह केलात. त्याचा दाखला सर्वांना मिळावा म्हणून तुमची मुलाहिजा न राहता. तुम्हाला ही शिक्षा देत आहे असे बोलून ते गर्ककन भराभर चालत त्यांच्या खोलीत गेले...

परंतु दुसर्‍या दिवशी शिवाजीराजांनी फिरंगोजी नरसाळ्याची शिक्षा रद्द केली. फिरंगोजी नरसाळ्याची यामध्ये चुकी नव्हती. राजांच्या मुलाची म्हणजेच संभाजी महाराजांची होती. छत्रपतींचा मुलगा म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज असेच तो समजत होता. त्यात त्यांची काही चूक नव्हती. फिरंगोजी नरसाळ्यांना शिवाजी महाराजांच्या रूपात देव दिसला .त्याचे प्राण वाचले होते. सगळ्यांनीच निश्वास सोडला होता. असे अनेक गुंते शिवाजीराजांनी शिक्षकी भूमिका घेऊन सोडवलेले होते.. शिवाजींचे गुप्तहेर खाते व नजरबाज शिवाजी महाराजांच्या सगळ्या भूमिका आणि बातम्या देत होते .

  संभाजीराजेपण दिलेरखानाला जाऊन मिळाले होते.ते दिलेरखानच्या आश्रयाला गेले तसे थोड्या महिन्यांनी ते परत संभाजी महाराज पुन्हा स्वराज्यात परत आले.

हे ऐकून शिवाजी महाराजांना समाधान वाटले. एका नामुष्कीतून वाचल्याचा आनंद सर्वाना झाला... युवराज संभाजी महाराजांना शिवाजी महाराजांनी पुन्हा सुधारण्याची संधी दिली होती.

मात्र येसूबाईंनी स्वतःच्या मुलाच्या लग्नात युवराजांना बोलावलं नाही आणि युवराज संभाजी येणार नाहीत याची काळजी घेण्यास त्यांनी अनाजीला सांगितले होते. सोयराबाई शिवाजी महाराजांच्या पत्नी होत्या. संभाजी महाराज आणि सोयराबाई मध्ये खटके उडत होते. संभाजी महाराजांची सोयराबाई ही सावत्र आई होती. संभाजी महाराजांची अशी धारणा होती की संभाजी महाराजांवर अष्टप्रधान मंडळातील काही मंत्री नजर ठेवून आहेत. पुढे जाऊन एकदा ते शिवाजी महाराजांना म्हणाले सुद्धा होते. आम्ही दिलेरखानला जाऊन मिळलो. याचं कारण आमच्या महालात आम्ही नजरकैद झालो होतो. हे ऐकूण शिवाजी महाराज सुद्धा दचकले होते. सोयराबाईंचा मुलगा राजाराम महाराज संभाजी महाराजांचा सावत्र भाऊ होता.

राजाराम महाराजांचे लग्न झालं आणि लगेच एक बातमी आली. आलमगीर औरंगजेब दक्षिणेत येतोय.

शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याला आता बळ प्राप्त झालं होतं .इतकी वर्ष शिवाजी महाराज दक्षिणेत येण्याची औरंगजेबाची वाट बघत होते. तो क्षण आता जवळ आला होता. औरंगजेब दक्षिणेच्या मैदानात उतरणार होता. शिवाजी महाराज हळूच पुटपुटले.

हे श्रींचे राज्य आहे ....हे निर्माण करण्याची जबाबदारी आम्ही घेतली आणि आता श्री ची इच्छा पूर्ण व्हायची वेळ आली आहे...

महाराष्ट्रात औरंग्याची कबर बांधली गेली तर...

औरंगजेबाचा पराजय एवढाच हेतू नसून त्यामागे दिल्ली तख्त उलटपालट करून स्वराज्याचं हिंदवी स्वराज्य पूर्ण भारतामध्ये साकार करण्याची संधी मिळणार होती.

शिवाजी महाराज स्वतः औरंगजेबा सोबत लढाई करायला उत्साहीत झाले होते... त्यांनी सर्वांना आदेश दिले. सर्व सरदारांना दक्ष राहायला सांगितले. औरंगजेब दक्षिणेकडे येतो आहे मोठी संधी आहे. औरंगजेबाचा खातमा करून त्याला महाराष्ट्रातच गाडायचा आहे. असा संदेश त्यांनी त्यासोबत पोहोचला होता. मावळ्यांच्या अंगात सुद्धा विरश्री संचारली होती. शिवाजी महाराजांसोबत असलेले मावळे आता वयस्कर झाले होते .त्यासोबत शिवाजी महाराजांचे वय सुद्धा वाढले होते शिवाजी महाराज सुद्धा वयस्कर झाले होते. मात्र त्यांचे लढण्यासाठी मनगट अजूनही शिवशिवत होते....

महाराष्ट्रामध्ये औरंगजेब औरंगाबाद मध्ये तळ ठोकून होता. तो आता दक्षिणेकडे येणार होता. मावळ्यांनी लढाईची तयारी खूप मोठ्या प्रमाणात केली होती. शस्त्रांची जमवाजमव झाली होती. शिवाजी महाराजांच्या आदेशाप्रमाणे नवीन आणि तरुण मावळ्यांची भरती सुद्धा स्वराज्याच्या सैन्यामध्ये सुरू झाली होती. प्रत्यक्ष औरंगजेबाशी आमने सामने लढाई करून खुद्द औरंगजेबाला गनिमी काव्याचे पाणी पाजायचे होते. जो गनीमी कावा शिवाजी महाराजांनी निर्माण केला होता तो गनिमीकावा प्रत्यक्ष याची देही याची डोळा औरंगजेब अनुभव घेणार होता. गनिमी काव्याचे पाणी त्याला पाजायचे होते. शिवाजी राजांनी गनिमी काव्याच्या युद्धतंत्राचा प्रसाद औरंगजेबाला प्रत्यक्ष शिवाजी महाराजांच्या हाताने मिळणार होता. शिवाजी महाराज आणि औरंगजेब दोन्ही युद्धासाठी आतुर झाले होते... औरंगजेब दक्षिणेत येणार.

पण तो तुळजापूर मार्ग येणार याचा शिवाजी महाराजांनी विचार केला होता. तुळजापूर मार्गे कोल्हापूर मार्गे आणि शेवटी राजापुरातून तो येणार होता .त्याच्या मार्गक्रमणाची पुर्ण कुंडली शिवाजी महाराजांनी त्यांच्या गुप्त हेराकडून आणि नजरबाजा कडून काढून घेतली होती... त्याच वेळी मंत्रिमंडळाकडून औरंगजेबाचा कसा खात्मा करायचा याच्या आखण्या सुरू झाली होत्या.

      परंतु अनाजींना हाताशी धरून राजाराम महाराजांवर युवराज पदाच्या शिक्का मारण्यासाठी सोयराबाईंची धावपळ चालली होती. राजाराम महाराजांसाठी सोयराबाई युवराज पदासाठी स्वराज्यावर हक्क सांगत होती. त्यासाठी तिने मंत्रिमंडळतल्याच काही मंत्र्याची चाचपणी करून ठेवली.

याबाबत संभाजी महाराज जरी मोठे असले तरी राजाराम महाराजांना युवराज करायचे याबाबत तिला काहीच वाटत नव्हते. दिवसेदिवस सोयराबाई त्याबाबत खूपच महत्वाकांक्षी बनत चालली होती. याचं दुसरं कारण म्हणजे शिवाजी महाराजांची तब्येत.

शिवाजी महाराजांची तब्येत अधून मधून बिघडत होती.सोयराबाई संभाजी महाराजांना गडावर येऊ देत नव्हती . गडावरून खाली मेणा पाठवून पुतळाबाईना वर आणीत नव्हती. पुतळाबाई शिवाजी महाराजांच्या पत्नी होत्या. शिवाजीराजांना या गोष्टी कळत होत्या. राजांनी ती गोष्ट एक दोन वेळा सोयराबाईंना बोलून सुद्धा दाखवली होती . पण सोयराबाईंनी वेळ मारून नेली होती. हळूहळू गृह कलह वाढू लागला होता. शिवाजी राजांना जे नको होते. तेच उलटपणे घडत होते.

त्यातच औरंगजेब लढाईला दक्षिणेकडे कूच करीत होता. औरंगजेब आणि शिवाजी यांची दुश्मनी खूपच पुरानी होती. त्याच्या हिशोबाची वेळ आता जवळ आली होती. औरंगजेबाचा कायमचा हिशोब आता होणार होता.

शिवाजीराजांच्या प्रशिक्षण केंद्रात .ज्यांनी प्रशिक्षण घेतले होते .ते शिवाजी महाराजा पेक्षा दुप्पट प्रमाणात स्वराज्यरक्षक झाले होते. त्याच प्रमाणे ते तिप्पट कडवे मावळे झाले होते. ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे. शिवाजी महाराजांच्या मावळ्यामध्ये असे अनेक मावळे होते. जे मास्टर मांईडचे काम करायचे. त्यापैकी एक होता. महाराजांचा गुप्तहेर प्रमुख .ज्याच्या हाताखाली तीन हजार गुप्तहेर काम करायचे. तो हिरोजी फर्जद.

हिरोजी फर्जंद हा खतरनाक गुप्तहेर होता. त्याचे प्लान अफलातून असायचे. शत्रूला हुलकावण्या देण्यात तो पटाईत होता आणि शिवाजी महाराजांना सुरक्षित स्थळी नेण्यात तो अव्वल होता. हिरोजी फर्जद कोणाला आपला चेहरा दाखवत नव्हता. त्याला कोण जास्त ओळखत नव्हते. त्याला फक्त शिवाजी महाराजच जास्त ओळखत होते .कोणाच्या बाजूला येऊन तो उभा राहिला कोणत्याही वेशभूषामध्ये तरी तो कुणालाही ओळखू येत नव्हता. मात्र शिवाजी महाराज त्याला चांगले ओळखत असत. याचे कारण तो आपली ओळख लपवून ठेवायचा. फक्त शिवाजी महाराजांना ओळख दाखवायचा.... त्याने बनवलेल्या योजना प्रत्येक वेळी यशस्वी झाल्या होत्या. सुरतेला दोनदा लूट महाराजांनी केली होती. त्या लूटीचा कार्यक्रम यशस्वी करण्यामागे हिरोजी फर्जदचा हात होता.

लूटीसाठी जाताना ...

कसे जावे... केव्हा जावे

कधी लूट करावी

याचं ही सगळी खडानखडा माहिती. त्याने शिवाजी महाराजांना देऊन ठेवली होती. शिवाजी महाराजां शिवाय आयुष्यात हिरोजी फर्जंदला फक्त एकाच माणसाने ओळखले होते .तो होता इंग्रजांचा वकील... हा तोच वकील होता .जो शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी हजर होता.

कोकणामध्ये राजापूरच्या लूटीला सुद्धा हिरोजी फर्जंदने मूर्त स्वरूप दिले होते. शिवाजी महाराजांच्या आसपास तो कोणत्या न कोणत्या वेषात असायचा. परंतु त्यांच्या मावळ्यांना सुद्धा कळायचे नाही की हिरोजी फर्जंद कोण आहे ,

तो कुठे राहतो,

कुठून येतो ,कुठे जातो,

कसा दिसतो.... इतकी बेमालूम पणे तो त्याची वेशभूषा आणि रंगभूषा करायचा. अनेकांना तो चकवा द्यायचा. हिरोजी फर्जंदच्या अनेक कामगिरीमुळे शिवाजी महाराजांच्या योजना यशस्वी बनल्या होत्या. मोगली सैन्य हिरोजी फर्जदचा चेहरा ओळखण्यासाठी जंग जंग पछाडलत होते .परंतु त्यांच्या हाताला तो एकदाही लागला नाही. त्याची हालचाल खूपच वेगवान होती. त्याच्याकडची शस्त्रे सुद्धा आधुनिक होती.

हिरोजी फर्जद सहसा शस्त्राचा वापर करत नसे. तो चुका सुद्धा सहसा करायचा नाही. इतका तो कट्टर गुप्तहेर होता. त्याचे गुप्तहेतू तो फक्त शिवाजी महाराजांना कोणी नसताना सांगायचा आणि कोणी आले की लगेच गायब व्हायचा. शिवाजी महाराजांच्या महालात तो वेगवेगळी रूपे घेऊन जायचा. कधी भिकारी घेऊन जायचा तर कधी ज्योतिषी बनून जायचा...

छत्रपती शिवाजी महाराजांना त्याने औरंगजेबाच्या कैदेतून आग्र्याहून सुटका मोठी मदत केली. त्यावेळी शिवाजी महाराज संन्यासी बनले होते. मजल-दरमजल करीत काशी मार्गे ते महाराष्ट्रात परत होते. त्यावेळी शिवाजी महाराजांनी काशी विश्वेश्वराच्या देवळात स्वतः संन्यासाचा रूप घेतले असताना सुद्धा. काशीच्या देवळातल्या दानपेटी मध्ये चार पाच रत्ने टाकली. ते बघून त्यांना आश्रय देणाऱ्या काशीच्या देवळातल्या पंडिताने त्यांच्यावर संशय घेतला होता. कुणाला जर कळले असते की हा संन्यासी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत तर त्या पंडीताच्या जीवाला फारच धोका निर्माण झाला असता... शिवाजी महाराजांना आपली चूक कळली होती. आपण संन्यासाचे रूप घेतले असून एवढी महागडी अनमोल रत्ने त्यांच्याकडे कशी काय.?.. असा प्रश्न त्या पंडिताने केला होता... त्याच क्षणी हिरोजी फर्जदने त्याच्या माहितीनुसार शिवाजीराजांना तिथून निसटण्याचा सल्ला सांगितला. शिवाजी महाराजांनी हिरोजी फर्जंदचा सल्ला ऐकला ... चार-पाच जणांच्या लवाजम्यासह शिवाजीराजे तिथून निघाले. सुखरूपपणे पुढच्या ठिकाणी मार्गक्रमण करू लागले.

    सर्वत्र जगावेगळ्या राजाचा जयजयकार चालला होता. अनेक नवनवीन सुधारणा शिवाजी महाराजांनी जगण्यामध्ये आणि स्वराज्यामध्ये केल्या होत्या. हे बघून निसर्गामध्ये सुद्धा चैतन्य निर्माण झाले होते. यामध्ये सर्वात पुढे आघाडीवर होता सह्याद्रीचा डोंगर.... त्या डोंगराला ही ठाऊक होते . जेव्हा इतिहास लिहिला जाईल. तेव्हा सह्याद्री डोंगराचे नाव सर्वात आधी घेतले जाईल... स्वराज्याच्या कार्य परिसरामध्ये सह्याद्रीला भरपूर महत्त्व दिले जाईल. तिथले पर्वत ,झाडे, भौगोलिक परिस्थिती यांचा पुन्हा पुन्हा उच्चार होत राहील. सह्याद्रीच्या आजूबाजूच्या परिसरामधील डोंगर-दऱ्या, खिंड यांची नोंद इतिहासकार घेतील . इतिहासाच्या पानांमध्ये सुवर्ण अक्षरांमध्ये इथल्या परिसराची माहिती

लिहिली जाईल ,

वाचली जाईल ,

शिकवली जाईल ,

पाहिली जाईल.

स्मरणात ठेवली जाईल

यात अजिबात शंका नव्हती.

कदाचित सह्याद्रीच्या पर्वतांमध्ये जिथे मोठी लढाई झाली स्वराज्यासाठी. तिथे तिथे येऊन इतिहास प्रेमी लुटूपुटूची लढाई निर्माण करून घडलेल्या घटनांची तालमी घेऊन. त्या तालमी नुसार त्या घटनांचा बारकाईने अथवा त्या लढाईचा अभ्यास सुद्धा करतील. त्या रोमांचक क्षणाचा आस्वाद घेतील... स्वतः शिवाजी महाराजांच्या भूमिकेत शिरून आणि मावळ्यांच्या भूमिकेत शिरून अनेक प्रसंगाचे संशोधन करतील.

हे भविष्यात नक्की घडेल .असा विश्वास सह्याद्रीच्या पर्वताला असावा. म्हणूनच त्या क्षणांची वाट बघत सह्याद्रीच्या पर्वतरांगा आज पर्यंत ताठ मानेने उभ्या आहे... येणाऱ्या, पाहणाऱ्या, लिहिणाऱ्या, शिवप्रेमी, इतिहासप्रेमीं किंवा इतिहासाची नोंद घेणार्‍या दुर्गप्रेमी लोकांना शिवाजी महाराजांचा इतिहास सांगण्यासाठी...

किल्ले प्रेमींसाठी.स्वराज्य प्रेमींसाठी.महाराष्ट्र प्रेमींसाठी

छत्रपती शिवाजी महाराजांचा भोसले वंश

त्यांचे आजोबा मालोजीराव भोसले ,.

शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले ,

स्वतः शिवाजी महाराज भोसले यांच्या रूपाने महाराष्ट्रामध्ये उत्तरेतील सिसोदिया घराण्यातून आला होता.


        

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल लिहावे असे अनेक वर्षांपासून वाटत होते. परंतु योग येत नव्हता आणि अचानक या विषयावर लिहावे असे वाटू लागले. वरील विषयावर जेव्हा लेखन होऊ लागले. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा बद्दल खूपच प्रेम आहे. ते सुद्धा खूप जुने आहे असे समजू लागले. पंचवीस वर्षांपूर्वी मुंबई शिवडीला मी राहत होतो .त्या वस्तीचं नाव न्यू शिवाजीनगर असं होतं. शिवाजीनगर नावाच्या दोन वसाहती होत्या. त्यावेळी एक जुनं शिवाजीनगर आणि दुसरे नवीन शिवाजी नगर असे होते. जुने शिवाजीनगर ही मध्यमवर्गीय लोकांची वस्ती होती आणि नवीन शिवाजीनगर म्हणजे चक्क एक झोपडपट्टी होती. त्या झोपडपट्टीमध्ये दर वर्षी न चुकता शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जायची. ती जयंती म्हणजे एक मोठा सण होता. मोठा महोत्सव होता.

त्या दिवशी अनेक प्रकारच्या स्पर्धा होत होत्या. पूजा होत होती.महिलांचे हळदी-कुंकू समारंभ व्हायचे. अनेक कार्यक्रम त्या दिवशी होत असल्यामुळे तो एक जीवनक्षण होता असे भासायचे. त्यामुळे लहानपणापासूनच शिवाजी महाराज या नावाचा एक ऋणानुबंध जुळला होता. त्यामुळे अनेक वर्षांची इच्छा या लिखाणाने पूर्ण झाली....


Rate this content
Log in