व्यथा शेतकऱ्याची
व्यथा शेतकऱ्याची
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
दिवस रात्र काबाड कष्ट करतो शेतकरी माझा
तरी तुम्हाला त्याची दया नाही
आमच्या मालाला भाव कमी
तुमच्या बियाण्याला भाव जास्त
शेतकरी माझा स्वतः उपाशी राहून
तुमच्या गरजा पूर्ण करतो
तरी पण त्याच्या मालाला योग्य भाव मिळत नाही
म्हणजे त्यांनी फक्त कष्ट करायचं स्वतः डेव्हलप नाही व्हायच??
तुम्हाला फक्त दिसतं त्याच्या शेतात किती माल आहे
तुम्हाला त्याची मेहनत दिसत नाही
दुष्काळग्रस्तांसाठी पॅकेज येतात
खरंच त्याच्यापर्यंत पोहोचतात का ??
माझा देश कृषिप्रधान देश आहे
फक्त नावाला आहे का??
विचार करा विचार करा
कधीतरी शेतकऱ्यांचा विचार करा
शेती कमी कमी होत चालली आहे
याचे कारण हेच आहे योग्य भाव मिळत नाही
त्याच्या संसाराचा गाडा त्यांनी कसा चालवायचा
मुला मुलीचे लग्न कर्ज काढून थाटामाटात करतो
कशाच्या जीवावर शेताच्या जीवावर
आणि तुम्ही त्याच्या मालाला योग्य भाव देत नाही
आत्महत्या होतात का होतात माहित आहे ना??