शिक्षणातील सावळा गोंधळ!
शिक्षणातील सावळा गोंधळ!
शिक्षणच शिकविते आपल्याला माणसातला माणुस बनायला,
हेच तर समजत नाही हो आमच्यातील निम्या जनायला.
समजले तरी ते केवळ शिक्षण घेतात फक्त पैका कमवायला,
शिक्षण घेऊन त्यांना संधी मिळते गरिब गरजूंना सावरायला.
परंतू सरकारने राबविलेल्या गरजु-साठींच्या योजना बिनधास्त लागलेत हे साहेबच लाटायला,
अन् खर सांगा मला हेच शिकविते का हो आपले शिक्षण या नालायकायला.
म्हणूनच म्हणतो आधुनिक भारतात शिक्षणाचा मतीत अर्थच नाही कळला होता बर्याच जनायला,
म्हणूनच तर शिक्षण लागलय एक व्यापार बनायला.
आणि म्हणूनच भारतातील विषमता लागलीय झपाट्याने वाढायला,
हे सर्व रोखण्यासाठी आपण आपल्या शिक्षणाचा उपयोग करायला पाहिजे गरजूंना सावरायला,
नाहीतर माणसातील माणुसकी लागेल आटायला.
आणि मग आम्ही कस म्हणाव कि,
शिक्षणच शिकविते माणसाला माणसातला माणुस बनायला.