STORYMIRROR

Abha Valavalkar

Others

4  

Abha Valavalkar

Others

हाथ रे कर्मा राहिली 3 सत्कार्य

हाथ रे कर्मा राहिली 3 सत्कार्य

1 min
192

जेव्हा रावण रामाच्या बाणाने धारातीर्थी पडला 

तेव्हा प्रभू रामचंद्रांनी आलिंगन दिले रावणाला


  म्हणाला रावण प्रभू रामचंद्राला त्यावेळेला

  कधीही तात्काळ सुरुवात करावी शुभ कार्याला   


जर राहून गेले बाकी सत्कर्म करावयाचे 

तर नाही येत संधी पुन्हा ते पूर्ण करावयाचे  


  सत्कार्ये करावयाची रावणाने ठरवली होती तीन   

भूलोक सोडून स्वर्गवासी होण्यापूर्वी म्हणे पुरी करीन

   

लंकाधीशाने काम ठरवले होते पहिले 

मार्ग नरकाचाच प्रथम बंद करायचे ठरवले


  खारट पाणी समुद्रातले काढायचे दुसरे काम ठरले

  संपूर्ण समुद्रच भरून टाकायचा दुधाने असे त्याने ठरवले

   

स्वर्ग प्रवेशासाठी शिडी बनवणे निश्चित केले काम तिसरे

पापी अन् पुण्यावानाला सरळ प्रवेश मिळेल स्वर्गात त्याने

    

   इतकी चांगली कामे सोडली अर्धवट त्या रावणाने

   जर केली असती जिकरीने अर्धवट कामे पूर्ण त्याने 

   

अहो मग

  पापी अन् पुण्यवान थेट पोहचले असते स्वर्गात

  रावणाने स्वर्गापर्यंत तयार करावयाच्या त्या शिडीने 


Rate this content
Log in