माझा जन्म ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्याच्या पोई या छोट्याशा निसर्ग संपन्न गावी झाला. लेखनाची सुरुवात झाली ती 1993 पासून. स्वतःच्या साठी लिहिलता लिहीता कधी दुस-या साठी लिहायला लागलो ते कळलंच नाही. वर्तमानपत्रात, मग दिवाळी जेथे वाटेल तेथें कविता, कथा, ललित बंध, चारोळ्या ,लेख, वात्रटिका,सर्व... Read more
माझा जन्म ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्याच्या पोई या छोट्याशा निसर्ग संपन्न गावी झाला. लेखनाची सुरुवात झाली ती 1993 पासून. स्वतःच्या साठी लिहिलता लिहीता कधी दुस-या साठी लिहायला लागलो ते कळलंच नाही. वर्तमानपत्रात, मग दिवाळी जेथे वाटेल तेथें कविता, कथा, ललित बंध, चारोळ्या ,लेख, वात्रटिका,सर्व साहित्य प्रकार आधाशा सारखा पाठवत राहिलो.ते प्रकाशित होऊ लागले.
अंकात मग मासिकात करता करता स्वत चा " पळसबहर "हा कविता संग्रह प्रकाशित झाला. मग आकाशवाणी मुंबई केंद्राकडे कविता वाचनाचे कार्यक्रम केले. कथा लेखन ही करायला लागलो. हळूहळू साहित्यातील सर्वच विषय हाताळले. सामाजिक कविता हा माझा आवडीचा विषय. मी जितका या विषयावर लिहतो.त्यासारखेच प्रेम कविता हा पण जिव्हाळ्याचा विषय आत्ता पर्यंत बरीच मुसाफिरी केली.अजुनही काही पुस्तके प्रकाशित व्हायची आहेत तसा माझा मूळ पिंड शिक्षकांचा रान फुलांना शिकवता शिकवता. लिहतो.नव्हे माझ्या आजूबाजूला जे घडते ते मला लेखनाची प्रेरणा देते.आणि मी झपाटून लिहतो. :
कविता करता करता.वाचनाच्या कार्यक्रमात ही जाऊ लागलो.काव्यवाचन स्पर्धेत सादरीकरणाची वाहवा होऊ लागली. फक्त 2016 ते 2018 पर्यंत मला काव्यवाचन स्पर्धेची पंचवीस वक्षीसे मिळाली.त्यातील पंधरा प्रथम क्रमांकांची आहेत हे आनंद देणारी गोष्ट. असो आपणही सारे प्रेम देता हे ही नसे थोडके
" शब्द माझे धन ; शब्द माझे ऋण. शब्द माझे गुण ; ऐकऊ लोका शब्द माझ्या ओठी ; शब्द माझी मिठी शब्द गारगोटी : चेतवू लोका शब्द माझे आहेर ; शब्द आतबाहेर . शब्दांचे काहूर ; माजवू लोकांची धनाजी वाटितो ;शब्दात गोडवा माणूस जोडला; शब्द मध्ये. श्री. धनाजी जनार्दन बुटेरे पोई कल्याण ठाणे djbutere@rediffmil.com Read less