मातृसुरक्षा
मातृसुरक्षा
दिनांक १० जुलै २००५ पासून जागतिक आरोग्य संघटनेने च्या सुचनेनुसार "मातृ सुरक्षा दिन " जगभर पाळला जातो . गरोदर माता व स्तनदा माता यांची काळजी कशी घ्यावी या बद्दल आरोग्य शिक्षण दिले जाते . मातांची आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले जातात .
तसे पाहिले तर भारतीय स्त्रियां मधे कुमारवाया पासूनच रक्तातील एच . बी .(लोहाचे) प्रमाण कमी असते . त्यांची शालेय जीवना पासूनच शारीरिक तपासणी करुन रक्तातील लोहाचे प्रमाण योग्य पातळीवर आणण्यासाठी आहाराचे मार्गदर्शन व लोहयुक्त गोळ्या त्यांना देऊन त्यांची देखभाल केली पाहिजे .
गरोदरपणात रक्तदाब वाढणे , शरीरातील साखरेचे प्रमाण वाढणे , अनेमिया ईत्यादी अजार होण्याचा संभव असतो . त्या साठी शासकीय दवाखान्यात किंवा खाजगी मॅटर्निटी होम मधे गरोदर पणातील तिसर्या महिन्यात नोंद करुन तज्ञ डॉक्टर कडून नियमित तपासणी करुन घ्यायला हवी .
ताजा व सकस आहार घ्यायला हवा . विविध प्रकारच्या पालेभाज्या , फळे यांचा आहारात समावेश करावा . भरपूर विश्रांती व अवश्यक व्यायाम , योगा तज्ञांच्या मार्गदर्शनानुसार करावा .
सुरक्षित मातृत्वा साठी दोन मुलात कमीत कमी तीन वर्षाचे अंतर असावे . मुलगाच पाहिजे हा हव्यास केला तर तीन चार मुलीच होतात व मातेचे आरोग्य धोक्यात येऊ शकते .
वय वर्ष १८ नंतर विवाह केला तर मुलींच्या सर्व अवयवांची वाढ पुर्ण झालेली असते त्या मुळे बाळंतपणात त्रास न होता ते सुलभ होते . कमी वयात लग्न झाले आणि लवकर गरोदरपण आले तर अनेक गुंतागुंतीच्या तक्रारी निर्माण होतात प्रसंगी माते च्या व बाळाच्या जिवावर बेतले जाण्याचा संभव असतो .
मातामृत्यू रोखायचे असेल तर , गरोदरपणापासून , बाळंतपणात पर्यंत सर्व उपचार शासकीय रुग्णालयात करावे . शासना तर्फे अनेक सोयी सुविधा गरोदर माता व स्तनदा मातांसाठी उपलब्ध आहेत .
सुरक्षित मातृत्व हे राष्ट्राचे भुषण आहे .