गुरुंचे महत्व
गुरुंचे महत्व




मुंगी किती लहान, तीला मुंबई ते पुणे प्रवास करायला कदाचित ३/४ जन्म लागतील. पण तीच मुंगी पुण्याला जाणाऱ्या माणसाच्या कपड्यवर चढली तर सहज ३/४ तासात पुण्याला पोचेल कि नाही .
तद्वत आपल्या प्रयत्नाने भवसागर ओलांडणे फार कठिण, कदाचित शेकडो जन्मही लागू शकतील, त्या पेक्षा गुरूचे बोट धट्ट पकडा, त्याने सांगीतलेल्या मार्गावरून श्रध्देने वाटचाल करा, बघा किती सहजपणे ते तुम्हाला सुख, समाधान व अखंड आनंदाच्या नगराकडे घेऊन जातील.
आपण खूप नशीबवान आहोत की आपल्या आयुष्यात सद्गुरु आहेत.