आंधळं प्रेम
आंधळं प्रेम
1 min
311
कधी होतं कळत नाही,
कारण प्रेम हे आंधळ असतं
उठता,बसता, रात्री झोपेत
मनात घर करत असतं
कधी होतं कळत नाही,
कारण प्रेम हे आंधळ असतं
प्रेम म्हणजे दोन धारी तलवार
जिला दोन्ही बाजूनेे तेज असतं,
टिकलं तर काहीही करू शकत
नाहीतर आपलच हृदय जखमी करून टाकत
शरीराला जखम झाली
तर रक्तत बाहेर पडते,
पण अश्रूंना बाहेर पडण्यासाठी
मनाला जखमी व्हावं लागतं
प्रेम सर्वात मोठी शक्ती आहे
जेेेे जग जिंकण्यास सक्षम बनवतं,
जितकंं देतो त्याच्या हजारो पट परत मिळते,
पण त्यासाठी मनापासून प्रेम असाव लागतंं,
कधी होतं कळत नाही
कारण प्रेम हे आंधळ असतं
तुमचेेेही कोणावर तरी प्रेम आहे
असं तुमचं मन तुम्हाला सांगत असतं,
पण त्या प्रेमाला प्रेमाची जाणीव नसता
त्यातून बाहेर पडणं खूप अवघड असतं,
कधी होतं कळत नाही
कारण प्रेम हे आंधळ असतं
