“
पानगळ...होताना....
पानगळ ती तर होणारच,
नव्याने पालवी फुटण्यासाठी पानांना इतका त्याग तर करावाच लागतो..नव्याने उभरायचं म्हटलं तर जुन्याने सुकून जाणं भागच आहे...सृजनशील मनाला समर्पणाच्या कसोटीला सामोरं तर जावंच लागेल..त्याशिवाय काय नवी उमेद जन्म घेणार? नवीन आशेसाठी जुन्या इच्छांना मुरड घालून वाट मोकळी तर करावीच लागते ...सुकून गेलेलं मन सुद्धा असंच पानासारखं बैचेन होतं...मनाची पानगळ होताना ...
”