“
माणपाणाच्या पलीकडचे स्वावलंबी जग कधी
मी पाहिलेच नाही...
स्वतःच्या चुकीला थारा देणारे सोडून
कधी माघार घेणारे मी पाहिलेच नाही...
मान-अपमान याचा विचार कधी नाते तोडतो पण
तुटलेली मनं जोडणारा कधी पाहिलाच नाही.
जीवाला जीव देणारा आपली सहनशक्ती जपतो खरा पण
त्याच्या ह्रदयात दाटलेल्या वेदना कधी समजल्याच नाही.
मनस्वी विचारांचा पडदा,सोबत स्वकर्तुत्वाचा झेंडा फडकवला असेलही तुम्ही ,
त्यामागे जाणारे दिसलेच नाही
”