“
आठवण
अचानक कधीतरी जुन्या आठवनी जाग्या होतात.
नकळत मग फोटो अल्बम मधून त्या पुन्हा जगल्या जातात.
मन मग तेव्हा हळव होत जात,डोळ्याच्या कड़ा मग अलगद पाणवतात.
काही आठवणी जुन्या जखमांना पुन्हा कुरतडतात.
फोटो मध्ये कैद असतात कीतीतरी अनमोल क्षण.
अल्बम नसून तो असतो आठवनीची साठवण.
”