“
रंगात रंगु या ....
तुझं माझं नातं काय..?
जय जिजाऊ जय शिवराय
मोठ्या अभिमानाने
घसा तानुन म्हणणारे आपण
सजीव निर्जीव काल्पनिक वस्तूला
जात ऊभी केली हाय...
ह्या जातीचे विभाजन मात्र...
आम्ही आमच्या रंगात केले हाय...
इथ शब्दाला,साहित्याला,गलबत्याला
जाती निहाय रंग दिले हाय...
भीमशक्ती-शिवशक्ती एकत्र म्हणणा-यांनीच
सरणावर जाणा-या कपड्यांचा रंग देखील बदलला हाय....
सुमनांजली बनसोडे
औरंगाबाद
”